शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
2
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
3
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
4
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
5
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
6
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
7
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
8
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
9
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
10
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
11
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
12
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
13
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
14
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
15
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
16
पावसाळी शेडसाठी जैन मंदिर हायकोर्टात; ट्रस्टला महापालिकेकडे निवेदन देण्याचे निर्देश
17
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?
18
नागरी संरक्षण दलाच्या मानधन प्रस्तावास वित्त विभागाचा अडसर; काही त्रुटी काढून घातला खोडा
19
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
20
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली

अतिक्रमणे व रहदारीची समस्या सोडविण्याची संधी सोडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:27 IST

नवेगावबांध : सार्वजनिक बांधकाम विभाग अर्जुनी मोरगावच्या दिशानिर्देशात सुरू असलेले शिवालया कंपनीद्वारे केले जाणारे राज्यमार्ग ३६२ हे सानगडी- ...

नवेगावबांध : सार्वजनिक बांधकाम विभाग अर्जुनी मोरगावच्या दिशानिर्देशात सुरू असलेले शिवालया कंपनीद्वारे केले जाणारे राज्यमार्ग ३६२ हे सानगडी- नवेगावबांध व राज्यमार्ग ११ कोहमारा -वडसा रोड मार्गाचे बांधकाम नवेगावबांध येथे सुरू आहे. या बांधकामात नवेगावबांध रेल्वे फाटकापासून ते नवेगाव राष्ट्रीय उद्यानाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील बसस्थानकावर वनविभागाची भिंत व पाटबंधारे विभागाची भिंत आहे. या दोन्ही भिंतीच्या दरम्यान दोन्ही विभागांकडून नाली बनविण्याची विनंती करण्यात आली व सार्वजनिक बांधकाम विभागालाही ग्रामपंचायतीने पत्र देऊन तशी विनंती केली होती. परंतु या दोन्ही विभागाकडे व ग्रामपंचायतीच्या पत्राकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने दुर्लक्ष केले आहे.

वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी वनविभागाच्या क्वार्टर समोरील वाल कंपाऊंडला लागून असलेल्या रोडचे बांधकाम करण्याची विनंती केली होती. तसेच जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनीसुद्धा वॉल कंपाऊंडपासून बांधकाम करण्याची विनंती केली होती. बसस्थानकावर वाढणारी गर्दी पाहता त्या ठिकाणी जवळपास १५ मीटर रुंदीचे बांधकाम होणे अपेक्षित होते. परंतु, शिवालया कंपनीने हे बांधकाम करतेवेळी व पाटबंधारे विभाग कार्यालय वनविभाग कार्यालय वन विभागाची वसाहत या बाजूने हे बांधकाम करताना कुठल्याही प्रकारची दक्षता घेतली नाही तसेच त्या विभागांच्या सूचनांकडे कंपनीने दुर्लक्ष केल्यामुळे अतिक्रमण व रहदारीची समस्या मात्र कायमच राहील. पुन्हा एकदा अतिक्रमण करणाऱ्यांना संधी मिळेल असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. नवेगावबांध व त्याच्या सभोवताली उंच नाल्या बांधल्याने व वरवरची उंची वाढल्याने एखाद्यावेळी अतिपाऊस झाल्यास चारी बाजूला पाणी साचून शेती व घरांचे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

.....

सार्वजनिक बांधकाम विभागाने बजावली होती नोटीस

सार्वजनिक बांधकाम विभाग अर्जुनी मोरगाव पीडब्ल्यूडी यांनी काही दिवसांपूर्वी नवेगावबांध बसस्थानक ते टी पाॅईंट परिसरात रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या दुकानांना नोटिसा बजावल्या होत्या व अतिक्रमण काढून ते रोडपासून लांब करण्याची विनंती केली होती. ३६२ सानगडी-नवेगावबांध किशोरी राज्यमार्ग या रोडचे बांधकाम व राज्यमार्ग ११ कोहमारा -नवेगावबांध-अर्जुनीमोर या रोडचे बांधकाम करताना विभागाला चांगली संधी होती. परंतु, विभागाकडे ग्रामपंचायतीने पत्र पाठविले तसेच काही लोकांनी त्या ठिकाणी हे बांधकाम व्यवस्थित करण्याची विनंती केली. परंतु, दोन्ही विभागाने व कंपनीने या मागणीकडे दुर्लक्ष केल्याने रस्त्यावरील अतिक्रमणे व रहदारीची समस्या या पुढेही कायम राहील.