शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
2
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
3
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
4
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
6
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
7
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
8
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
9
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
10
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
11
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
12
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
13
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
14
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
15
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
16
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
17
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
18
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
19
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
20
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...

तीन वर्षांत २७ बंधाऱ्यांची कामे पूर्ण

By admin | Updated: December 29, 2014 01:44 IST

पाण्याची सुविधा नसल्याने एका पावसाअभावीसुद्धा धान पिकाचे उत्पन्न नाहिसे होत होते. शेतकऱ्यांची ही समस्या दूर करण्यासाठी शासनाने एकात्मिक पाणलोट विकास कार्यक्रम हाती घेतला. यापूर्वी गतिमान योजना होती.

काचेवानी : पाण्याची सुविधा नसल्याने एका पावसाअभावीसुद्धा धान पिकाचे उत्पन्न नाहिसे होत होते. शेतकऱ्यांची ही समस्या दूर करण्यासाठी शासनाने एकात्मिक पाणलोट विकास कार्यक्रम हाती घेतला. यापूर्वी गतिमान योजना होती. त्यामुळे काही शेतकऱ्यांना पाण्याच्या समस्येपासून दिलासा मिळाला आहे. तिरोडा तालुक्यात कृषी विभागाने एकात्मिक पाणलोट विकास कार्यक्रमांतर्गत २३ बंधारे व गतिमान योजनेतून चार बंधारे १ कोटी ५२ लाख रूपये खर्चून तयार केली आहेत. यातून २७५ हेक्टर क्षेत्रास लाभ होणार आहे.तालुका कृषी विभागांतर्गत दोन मंडळ आहेत. सर्वाधिक तिरोडा मंडळ कृषी विभागात सिमेंट बंधारे तयार करण्यात आले आहेत. तिरोडा मंडळांतर्गत सन २०११-१२ मध्ये बेरडीपार व डब्बेटोला येथे पाच बंधारे २६ लाखांच्या खर्चाने तयार करण्यात आले. आलेझरी येथे चार बंधारे १८ लाखांच्या खर्चाने, गोंडमोहाळी येथे तीन बंधारे १८ लाखांच्या खर्चाने, गतिमान योजनेंतर्गत मुंडीकोटा येथे चार बंधारे १६ लाख रूपयांच्या खर्चाने तयार करण्यात आलीत. या १६ बंधाऱ्यांवर ६८ लाख रूपये खर्च करण्यात आले. त्याद्वारे १८२ हेक्टर क्षेत्राला पाण्याचा लाभ होणार आहे. सन २०१२-१३ मध्ये गोंडमोहाडी येथे २८ लाख रूपये खर्चून चार बंधारे तयार करण्यात आले. येथील पाण्याचा लाभ ४२ हेक्टर क्षेत्राला मिळत आहे. सन २०१३-१४ मध्ये एकूण सात बंधारे तयार करण्यात आले. यात गोंडमोहाडी, इंदोरा व मेंढा येथे प्रत्येकी दोन बंधारे तयार करण्यात आले. त्यासाठी ४८ लाख रूपये खर्च करण्यात आले आहे. तसेच खडकी येथे आठ लाख रूपये खर्चून एक बंधारा तयार करण्यात आला आहे. यावर्षी सात बंधाऱ्यांसाठी ५६ लाख रूपये खर्च करण्यात आले आहेत. या सात बंधाऱ्यांतून ४२ हेक्टर क्षेत्राला सिंचनाला लाभ मिळणार असल्याचे सांगण्यात आले आहे.तीन वर्षांत तिरोडा कृषी विभागाने एकूण २७ बंधाऱ्यांची कामे पूर्ण केली असून त्यासाठी एक कोटी ५२ लाख रूपये खर्च करण्यात आले आहेत. या बंधाऱ्यांमुळे २७५ हेक्टर क्षेत्राला पाण्याच्या सिंचनाचा लाभ होणार असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले आहे. एकात्मिक पाणलोट विकास कार्यक्रमांतर्गत व गतिमान योजनेंतर्गत तयार करण्यात आलेल्या सिमेंट बंधाऱ्यांपासून शेतपिकांसह गुरांना पाणी पिण्याची सोय उपलब्ध झाली आहे. नागरिकांना तसेच महिलांना कपडे धुण्यासाठी व घरगुती उपयोगासाठी पाण्याच्या सुविधेचे साधन म्हणून उपयोगी ठरणार आहेत. बंधाऱ्यात पाण्याचे साठवण राहिल्याने परिसरातीलच नव्हे तर १० ते १५ किमी दूरपर्यंत पाण्याच्या पातळीत सुधारणा होणार आहे. (वार्ताहर)