शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्ताननं अखेर मानली हार; ऑपरेशन सिंदूरमध्ये लष्करी तळ उद्ध्वस्त झाल्याची दिली कबुली!
2
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
3
BMC Elections: 'आप'ची १५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; आतापर्यंत ५१ शिलेदार मैदानात!
4
Amit Shah: "राहुल बाबा, इतक्यात थकू नका! अजून बंगाल- तामिळनाडूतही पराभव बघायचा आहे" अमित शहांचा टोला
5
Mumbai: मुंबईत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली डरकाळी; ३७ उमेदवारांची यादी जाहीर!
6
INDW vs SLW: Smriti Mandhana चा ऐतिहासिक पराक्रम! Team India ची लेक बनली '१० हजारी' मनसबदार
7
Chhatrapati Sambhajinagar: छ. संभाजीनगरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर; १८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
8
मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी महायुतीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा- प्रताप सरनाईक
9
Video: पाकिस्तानच्या हॅरिस रौफने कॅच पकडण्यासाठी उडी घेतली, समोरून कार्टराईटही आला अन् मग...
10
रीलची हौस महागात! Video बनवण्याच्या नादात सत्यानाश; गॅस सुरू, किचनच्या ओट्यावर चढली अन्...
11
दिग्विजय सिंह यांच्या 'त्या' पोस्टमुळे काँग्रेस खासदार संतापले; RSS ची थेट अल-कायदाशी केली तुलना
12
'शरद पवार माझे मार्गदर्शक..' गौतम अदानींकडून बारामतीत पवारांच्या कार्याचे भरभरून कौतुक
13
PMC Elections : अदानी बारामतीत, मंचावर बसलेल्या साहेब अन् दादांची चर्चा..! एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा बळ
14
Mumbai: तरुणींना अर्ध्या रस्त्यातच उतरवलं आणि...; वाद्र्यांत रिक्षाचालकाचं लज्जास्पद कृत्य!
15
भारतीय आजारी असण्याला आई-वडील जबाबदार, डॉक्टरांचं विधान; तुम्हीच ठरवा कोण बरोबर?
16
गौतम गंभीरमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण? खेळाडू तणावात असल्याची चर्चा
17
भयानक! गहू साफ करायला सांगताच सून भडकली, सासूवर वीट फेकली; पतीवरही जीवघेणा हल्ला
18
IAS प्रेमकथा: IIT मधून शिकलेला IAS नवरदेव अन् IRS अधिकारी वधू; कोण आहेत विकास आणि प्रिया?
19
संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?
20
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
Daily Top 2Weekly Top 5

तीन वर्षांत २७ बंधाऱ्यांची कामे पूर्ण

By admin | Updated: December 29, 2014 01:44 IST

पाण्याची सुविधा नसल्याने एका पावसाअभावीसुद्धा धान पिकाचे उत्पन्न नाहिसे होत होते. शेतकऱ्यांची ही समस्या दूर करण्यासाठी शासनाने एकात्मिक पाणलोट विकास कार्यक्रम हाती घेतला. यापूर्वी गतिमान योजना होती.

काचेवानी : पाण्याची सुविधा नसल्याने एका पावसाअभावीसुद्धा धान पिकाचे उत्पन्न नाहिसे होत होते. शेतकऱ्यांची ही समस्या दूर करण्यासाठी शासनाने एकात्मिक पाणलोट विकास कार्यक्रम हाती घेतला. यापूर्वी गतिमान योजना होती. त्यामुळे काही शेतकऱ्यांना पाण्याच्या समस्येपासून दिलासा मिळाला आहे. तिरोडा तालुक्यात कृषी विभागाने एकात्मिक पाणलोट विकास कार्यक्रमांतर्गत २३ बंधारे व गतिमान योजनेतून चार बंधारे १ कोटी ५२ लाख रूपये खर्चून तयार केली आहेत. यातून २७५ हेक्टर क्षेत्रास लाभ होणार आहे.तालुका कृषी विभागांतर्गत दोन मंडळ आहेत. सर्वाधिक तिरोडा मंडळ कृषी विभागात सिमेंट बंधारे तयार करण्यात आले आहेत. तिरोडा मंडळांतर्गत सन २०११-१२ मध्ये बेरडीपार व डब्बेटोला येथे पाच बंधारे २६ लाखांच्या खर्चाने तयार करण्यात आले. आलेझरी येथे चार बंधारे १८ लाखांच्या खर्चाने, गोंडमोहाळी येथे तीन बंधारे १८ लाखांच्या खर्चाने, गतिमान योजनेंतर्गत मुंडीकोटा येथे चार बंधारे १६ लाख रूपयांच्या खर्चाने तयार करण्यात आलीत. या १६ बंधाऱ्यांवर ६८ लाख रूपये खर्च करण्यात आले. त्याद्वारे १८२ हेक्टर क्षेत्राला पाण्याचा लाभ होणार आहे. सन २०१२-१३ मध्ये गोंडमोहाडी येथे २८ लाख रूपये खर्चून चार बंधारे तयार करण्यात आले. येथील पाण्याचा लाभ ४२ हेक्टर क्षेत्राला मिळत आहे. सन २०१३-१४ मध्ये एकूण सात बंधारे तयार करण्यात आले. यात गोंडमोहाडी, इंदोरा व मेंढा येथे प्रत्येकी दोन बंधारे तयार करण्यात आले. त्यासाठी ४८ लाख रूपये खर्च करण्यात आले आहे. तसेच खडकी येथे आठ लाख रूपये खर्चून एक बंधारा तयार करण्यात आला आहे. यावर्षी सात बंधाऱ्यांसाठी ५६ लाख रूपये खर्च करण्यात आले आहेत. या सात बंधाऱ्यांतून ४२ हेक्टर क्षेत्राला सिंचनाला लाभ मिळणार असल्याचे सांगण्यात आले आहे.तीन वर्षांत तिरोडा कृषी विभागाने एकूण २७ बंधाऱ्यांची कामे पूर्ण केली असून त्यासाठी एक कोटी ५२ लाख रूपये खर्च करण्यात आले आहेत. या बंधाऱ्यांमुळे २७५ हेक्टर क्षेत्राला पाण्याच्या सिंचनाचा लाभ होणार असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले आहे. एकात्मिक पाणलोट विकास कार्यक्रमांतर्गत व गतिमान योजनेंतर्गत तयार करण्यात आलेल्या सिमेंट बंधाऱ्यांपासून शेतपिकांसह गुरांना पाणी पिण्याची सोय उपलब्ध झाली आहे. नागरिकांना तसेच महिलांना कपडे धुण्यासाठी व घरगुती उपयोगासाठी पाण्याच्या सुविधेचे साधन म्हणून उपयोगी ठरणार आहेत. बंधाऱ्यात पाण्याचे साठवण राहिल्याने परिसरातीलच नव्हे तर १० ते १५ किमी दूरपर्यंत पाण्याच्या पातळीत सुधारणा होणार आहे. (वार्ताहर)