शहरं
Join us  
Trending Stories
1
"ट्रम्प यांनी हस्तक्षेप केला नसता तर...'; शहबाज शरीफ बनले अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे प्रवक्ते, शांतीदूत म्हणत नोबेल देण्याची मागणी
2
सुपर ओव्हरचा थरार! श्रीलंका २ धावांवर All Out; पहिल्या बॉलवर मॅच जिंकत टीम इंडियाचा विजयी 'षटकार'
3
"सात भारतीय विमानं पाडली...!"; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर खोटारड्या शाहबाज शरीफ यांची नुसती 'फेका-फेक'
4
सोनम वांगचुक जोधपूर मध्यवर्ती कारागृहात; अटक केल्यानंतर लेहमधून विमानाने आणलं, CCTV खाली देखरेख
5
Pathum Nissanka Century : पहिली सेंच्युरी अन् श्रीलंकेच्या पठ्ठ्यानं किंग कोहलीचा मोठा विक्रमही मोडला
6
फुल-ऑन ड्रामा! संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत नेतन्याहू भाषणाला येताच अनेक देशांचं 'वॉकआउट'
7
संजूचा गगनचुंबी सिक्सर! चाहतीचे ठुमके अन् ड्रेसिंग रुममध्ये सनथ जयसूर्याला कळायचं झालं बंद (VIDEO)
8
अभिषेक शर्माचा महारेकॉर्ड! T20 आशिया कप स्पर्धेत ३०९ धावांसह पाकच्या रिझवानला दिली 'धोबीपछाड'
9
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
10
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
11
अग्निशमन दलाचे जवान घरात घुसताच सिलिंडरचा स्फोट; फ्लॅटमध्ये लागलेल्या आगीत मुलाचा मृत्यू, ५ जण जखमी
12
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
13
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
14
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
15
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
16
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
17
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
18
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
19
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
20
MPSC Exam 2025: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर

पोलिसांच्या वसाहतींना अखेरची घरघर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2018 23:29 IST

घरासमोर कचराकुंड्या नाही, सर्वदूर कचरा, खिड्यांचे काच फुटलेले, शुद्ध पाण्याची सोय नाही, हे जळजळीत वास्तव एखाद्या झोपडपट्टीवासीयांचे नव्हे तर गोरेगाव पोलिसांच्या वसाहतीचे आहे.

ठळक मुद्देखिडक्यांचे काच फुटलेले : प्रशासनाचे दुर्लक्ष

दिलीप चव्हाण ।लोकमत न्यूज नेटवर्कगोरेगाव : घरासमोर कचराकुंड्या नाही, सर्वदूर कचरा, खिड्यांचे काच फुटलेले, शुद्ध पाण्याची सोय नाही, हे जळजळीत वास्तव एखाद्या झोपडपट्टीवासीयांचे नव्हे तर गोरेगाव पोलिसांच्या वसाहतीचे आहे. प्रशासनाच्या कायम दुर्लक्षित धोरणामुळे गोदावरी, गंगा, यमुना, सरस्वती या नावाच्या पोलीस वसाहती अखेरच्या घटका मोजत असल्याचे चित्र आहे.दहा वर्षापूर्वी गोरेगाव पोलीस स्टेशनच्या मागे पोलीस कुटुंबियांना राहण्यासाठी वसाहतीची निर्मिती करण्यात आली. ५० पोलीस कुटुंबांना राहता यावे या दृष्टीकोनातून या वसाहतीचे बांधकाम करण्यात आले. पण कमी जागेत बांधकाम करण्यात आल्याने घरात राहायचे कसे या प्रश्नाचे उत्तर मात्र कुणाकडेच नाही. पोलिसांच्या घरी कुणी पाहुणा आला तर पाहुण्यांची व्यवस्था कुठे करायची, हा प्रश्न वसाहतीतील कुटुंबांसमोर निर्माण होतो. एक हॉल, एक किचन, संडास बाधरुम ऐवढेच बांधकाम एका कुटुंबासाठी करण्यात आले आहे.एवढ्या कमी जागेत वावर कसा करायचा असा प्रश्न या वसाहतीत राहणाऱ्या कुटुंबीयांना सुरूवातीपासूनच सतावित आहे. मात्र याला पर्याय नसल्याने या गैरसोयीचा सामना करीत पोलिसांचे कुटुंब वसाहतीमध्ये वास्तव्य करीत आहे. तर काही कुटूंब भाड्याने घर घेवून राहत आहेत. या वसाहतीत १५ ते २० कुटुंब वास्तव करतात. मात्र कुठेही कचरा कुंड्या नाहीत, सर्वत्र कचरा पसरलेला आहे. नगर परिषदेची घंटागाडीही या वसाहतीत येत नाही. शुद्ध पाण्याचा बिकट प्रश्न आहे.प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेची पाईपलाईन ठिकठिकाणी फुटली असल्यामुळे पोलीस वसाहतीत पाणीच पोहोचत नाही.जे पाणी पोहचते ते सुध्दा खूप गढूळ आहे. येथील पोलीस कुटुंबीय पाणी विकत घेतात. वसाहतीतील घराच्या काचा फुटलेल्या आहेत. कुठे विटाचे थर लावून तर कुठे कागद लावून पोलिसांनी तात्पुरती व्यवस्था केली आहे. दोन वर्षांपासून या वसाहतींना साधे पेन्टींग करण्याचे औदार्य ही प्रशासनाने दाखविले नाही. पोलीस आपल्या कुटुंबियांना व्यवस्था नसलेल्या या वसाहतीत ठेवून २४ तास कर्तव्य बजावतात. मात्र त्यांच्या या घराची दयनिय अवस्था मान खाली घालायला लावणारी आहे. तसेच अंतर्गत रस्तेही उखडलेले असून ठिकठिकाणी गिट्टी उखडलेली आहे.रस्ते, पाणी, खिड्यांचे काच, पेन्टींग, कचऱ्याकुंड्या या मुलभूत सुविधा पुरविण्यात यावे, अशी मागणी पोलिसांच्या कुटुंबीयांची आहे. कुठेही, काही घटना घडली तर पोलिसांना प्रथम पाचारण केले जाते. राजकीय भांडण असो वा सार्वजनिक, प्रत्येकवेळी पोलिसांची भूमिका महत्वपूर्ण राहते. पण त्याच पोलीस कुटुंबीयांच्या राहणीमानाची कुणालाच काळजी नाही.राजकारणीही कधी विचारपूस करीत नाही. आजवरी तरी कुणीही सत्तेतील नेत्यांनी पोलीस वसाहतीतील समस्येकडे लक्ष दिले नसल्याची खंत एका पोलीस कर्मचाºयांनी नाव न सांगण्याच्या अटीवर लोकमतजवळ व्यक्त केली.

टॅग्स :Policeपोलिस