शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

शेतकऱ्यांना जमिनीचा मालकी हक्क मिळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2017 21:45 IST

नवेगाव (धा) व पिपरटोला (गिरोला) येथे त्रुटी असलेल्या सातबारा दुरूस्तीसाठी संपूर्ण गावाच्या पुनर्मोजणीच्या कामाची सुरूवात आमदार गोपालदास अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आली.

ठळक मुद्देराजस्व मंडळाचे विशेष शिबिर : सातबारामधील त्रुटींची नि:शुल्क दुरूस्ती

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : नवेगाव (धा) व पिपरटोला (गिरोला) येथे त्रुटी असलेल्या सातबारा दुरूस्तीसाठी संपूर्ण गावाच्या पुनर्मोजणीच्या कामाची सुरूवात आमदार गोपालदास अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आली. या वेळी त्यांनी क्षेत्रातील प्रत्येक शेतकऱ्यांला त्यांच्या जमिनीचा मालकी हक्क मिळावा, असे मत व्यक्त केले.ते म्हणाले, शेतकऱ्यांची एकमेव उदरनिर्वाहाचे साधन म्हणजे त्यांची शेती, जी त्यांना पिढ्यानपिढ्यापासून मिळते. या जमिनीचा एकमेव प्रमाणपत्र म्हणजे सातबारा असते. त्यातच जर शासन फेरफार करेल तर शेतकºयांचे हाल काय होतील, हे समजले जावू शकते. नवेगाव व पिपरटोला येथे सर्व सातबारामध्ये १०० टक्के त्रुटी असल्याची समस्या आम्ही शासनापर्यंत पोहोचवली. त्यामुळे शासनाने या सर्व त्रुटीपूर्ण सातबारांची पुनर्मोजणी करून नि:शुल्क दुरूस्त करण्याचे आदेश दिले. नवेगाव व पिपरटोलामध्येच नव्हे तर गोंदियातील ४४ गावांमध्ये सदर अभियान राबविण्यात येणार आहे. सर्व त्रुटीपूर्ण सातबारा दुरूस्त करून प्रत्येक शेतकºयाला त्याच्या जमिनीचा मालकी हक्क मिळवून देण्यासाठी आमचे प्रयत्न आहेत.राज्यपालांनी जवळपास १५० कोटी रूपयांच्या देवरी-नवेगाव उपसा सिंचन योजनेला मंजुरी दिली. या योजनेच्या माध्यमातून क्षेत्रातील १० हजार एकर जमीन सिंचित होईल. त्यामुळे शेतकरी कुटुंबामध्ये मोठे आर्थिक परिवर्तन पहावयास मिळेल, असेही त्यांनी पुनर्मोजणी शुभारंभप्रसंगी सांगितले.या वेळी जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख (नागपूर प्रदेश) विनायक ठाकरे यांनी पुढील तीन महिन्यांत सर्व सातबारा दुरूस्ती करण्यात येतील, असा विश्वास दिला. तसेच माजी जि.प. सदस्य अर्जुन नागपुरे यांनी, गोंदियाच्या ग्रामीण क्षेत्रात आधारभूत परिवर्तन होत असून याचा लाभ क्षेत्रातील सर्व नागरिकांना मिळणार असल्याचे सांगितले. जि.प. सभापती विमल नागपुरे व उपविभागीय अधिकारी अनंत वालस्कर यांनीही आपले विचार व्यक्त केले.गोंदिया तालुक्यातील उर्वरित ४४ गावांमध्ये अशाच त्रुट्या आढळल्या. त्यांच्या दुरूस्ती करण्यासाठी आ. अग्रवाल यांनी राजस्व विभागाचे प्रधान सचिव मनुकुमार श्रीवास्तव, प्रादेशिक उपसंचालक बाळासाहेब काळे, संचालक भूमी अभिलेख पुणे यांची बैठक घेतली व गोंदिया तालुक्यातील सर्व गावांमध्ये असलेल्या त्रुट्या दुरूस्ती करण्याची मागणी केली. त्यामुळे त्यांनी ४४ गाावांमध्ये चकबंदीनंतर भूू रेकार्डमध्ये त्रुट्या आढळल्या. त्या सर्व दुरूस्त करण्याचे निर्देश दिले होते.प्रास्ताविक भूमी अभिलेख अधीक्षक पी.जी. मेश्राम यांनी मांडले. संचालन शहर काँग्रेस महासचिव अपूर्व अग्रवाल यांनी केले. आभार उपअधीक्षक भूमी अभिलेख सतीश पवार यांनी मानले.पुनर्मोजणीप्रसंगी प्रामुख्याने आ. अग्रवाल यांच्यासह पं.स. सभापती माधुरी हरिणखेडे, उपविभागीय अधिकारी अनंतर वालस्कर, तहसीलदार रविंद्र चव्हाण, पं.स. सदस्य विनिता टेंभरे, पं.स. सदस्य निता पटले, सरपंच मदन सरयाम, सरपंच जयश्री रहांगडाले, उपसरपंच लुकेश रहांगडाले, माजी पं.स. सदस्य बाबुलाल पटले, पं.स. सदस्य प्रमिला करचाल, पोलीस पाटील पन्नालाल रहांगडाले, माजी सरपंच शालीकराम शहारे, तंमुसचे अध्यक्ष महेंद्र देशमुख, मनोज कटरे, खटोले, शर्मा, तलाठी सेवईवार व मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.कर्जमाफी व नुकसानभरपाई प्रभावितगोंदिया तालुक्यात कृषी भूमीच्या चकबंदीनंतरही अनेक गावांमध्ये सातबारा व खसराच्या रेकार्डमध्ये चुका असल्यामुळे त्यांना मोठीच समस्या येत होती. अशात एखाद्या शेतकऱ्याची जमीन जास्त असतानाही सातबारामध्ये कमी-अधिक दाखविले जात होते. गट क्रमांकांमध्ये अनेक चुका आहेत. त्यामुळे अनेक प्रकरणांमध्ये सरकारकडून पीक नुकसान किंवा कर्जमाफीचा लाभ शेतकऱ्यांना दिला जात असेल तर सातबारामधील चुकांमध्ये अनेक शेतकरी लाभापासून वंचित राहतात. भूमापक विभागाद्वारे आवश्यक शुल्क जमा करून संबंधित शेतकºयाच्या जमिनीची मोजणी करून रेकार्ड दुरूस्त केली जाते. परंतु त्यासाठी शेतकºयास अकारण आवश्यक शुल्क जमा करावे लागते.सर्वाधिक त्रुट्या असलेली गावेगोंदिया तालुक्यात ज्या गावांमध्ये सातबारामध्ये अधिक चुका आहेत, त्यात एकोडी, गंगाझरी, महालगाव, मुरदाडा, अदासी, दतोरा, दागोटोला, नवरगाव (खु), पोवारीटोला, मोरवाही, आसोली, बटाणा, मुरपार व इतर गावांचा समावेश आहे. नवेगाव (धा) व पिपरटोला या समस्येने सर्वाधिक प्रभावित आहेत. नवेगाव येथे एकूण १६९१ सर्वे सातबारापैकी १४३१ व पिपरोटला येथे एकूण ३९६ सर्वे सातबारापैकी सर्व ३९६ सर्वे सातबारामध्ये त्रुट्या आहेत.पुनर्मोजणीचे कार्य सुरूनवेगाव व पिपरटोला येथे जवळपास सर्वच साताबारामध्ये, मोठ्या प्रमाणात शासकीय रेकार्डमध्ये त्रुट्या आहेत. त्या दूर करण्यासाठी आ. अग्रवाल या गावांची पुनर्मोजणी करण्यासाठी प्रयत्नशील होते. यात त्यांना यश आले असून आता कटंगी, कुडवा, फुलचूर, फुलचूर पेठ, मुर्री, पिंडकेपार येथे पुनर्मोजणीचे कार्य सुरू आहे.

टॅग्स :Gopaldas Agarwalगोपालदास अग्रवाल