शहरं
Join us  
Trending Stories
1
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
2
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
3
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
4
काँग्रेस-NCPशी आघाडी करून मविआत सामील का झालो?; उद्धव ठाकरेंनी सांगितले मोठे ‘राज’कारण
5
VIDEO: ऑलिम्पिक पदकविजेती मनु भाकरने व्हायोलिनवर वाजवलं भारताचं राष्ट्रगीत, होतंय कौतुक
6
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
7
एकमेव भारतीय क्रिकेटपटू ज्याने १५ ऑगस्ट रोजी ठोकलंय शतक, कोण आहे तो?
8
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
9
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल
10
"राष्ट्रगीत सुरू असताना असं उभं राहतात का?", स्वातंत्र्यदिन साजरा करताना शिल्पा शेट्टीच्या बहिणीकडून मोठी चूक, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
11
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
12
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
13
पश्चिम बंगालमध्ये ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, ३० जण जखमी
14
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS
15
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
16
बाबो! क्रिती सनॉनने मुंबईत खरेदी केलं पेंटहाऊस, किंमत ऐकून पायाखालची जमीनच सरकेल
17
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
18
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
19
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
20
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य

गोंदिया या तलावांच्या जिल्ह्यातच पाण्याचा ठणठणाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2019 12:12 IST

तलावांचा जिल्हा अशी ओळख असलेल्या गोंदिया जिल्ह्यातील सिंचन प्रकल्प आणि तलाव पूर्णपणे कोरडे पडले आहे.

ठळक मुद्देमत्स्य व्यवसायावर संकट वाढत्या तापमानाचा फटका

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : तलावांचा जिल्हा अशी ओळख असलेल्या गोंदिया जिल्ह्यातील सिंचन प्रकल्प आणि तलाव पूर्णपणे कोरडे पडले आहे. परिणामी तलावांच्या जिल्ह्यातच यंदा एप्रिल महिन्यातच पाण्याचा ठणठणाट निर्माण झाल्याने पाणीे टंचाईची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. तर तलावात पाणी नसल्याने मत्स्य व्यवसायावर संकट निर्माण झाले आहे.यावर्षी तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने त्याचा परिणाम सिंचन प्रकल्पातील पाणीसाठ्यावर झपाट्याने होत आहे. मागील तीन चार दिवसांपासून जिल्ह्याच्या तापमानात सातत्याने वाढ होत असून पारा ४३ अंशावर पोहचला आहे. त्यामुळे याचा दैनदिन कामकाजावर सुध्दा परिणाम होत आहे. तर यंदा एप्रिल महिन्यात सिंचन प्रकल्प व तलाव कोरडे पडल्याने मत्स्य व्यवसायाला याचा सर्वाधिक फटका बसला आहे. वाढत्या तापमानामुळे तलावातील मासे मृत्यूमुखी पडत असल्याने मत्स्यपालन संस्थाना चांगलाच आर्थिक फटका बसत आहे. जिल्ह्यात माजी मालगुजारी (मामा) तलावांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे या तलावांचा उपयोग मासेमारी करण्यासाठी केला जातो.त्यामुळे हजारो कुटुंबाना रोजगार मिळतो. जिल्ह्यात जि.प.च्या मालकीचे एकूण ६ हजार ८३९ लघु तलाव आहेत. तर २०० हेक्टर क्षेत्राचे १० आणि २०० हेक्टरपेक्षा कमी क्षमतेचे ५६ तलाव आहेत. जिल्ह्यात १३३ नोदंणीकृत मत्स्यपालन संस्था आहेत. जि.प.व सिंचन विभागातर्फे तलावांचा लिलाव करुन अथवा लिजवर तलाव मत्स्यपालन संस्थेला दिले जाते. यामुळे शासनाला सुध्दा दरवर्षी लाखो रुपयांचा महसूल मिळतो. जिल्ह्यात पावसाळ्यात सरासरी ११३४ मि.मी.पाऊस पडतो. तर तलावांची संख्या अधिक असल्याने या दोन्ही गोष्टी मत्स्यपालनासाठी अनुकुल आहेत.या व्यवसायामुळे हजारो कुटुंबाना रोजगार मिळतो. मात्र मागील वर्षी जिल्ह्यात सरासरीच्या केवळ ९५० मि.मी.पाऊस झाला. परिणामी सिंचन प्रकल्प आणि तलावांमध्ये मोजकाच पाणीसाठा शिल्लक आहे. यंदा तापमानात सुध्दा प्रचंड वाढ झाली असून पाण्याचे लवकर बाष्पीभवन होत असल्याने तलावातील पाणीसाठ्यात झपाट्याने घट होवून तलाव कोरडे पडत आहे. तर जिल्ह्यातील मोठे, मध्यम आणि लघु सिंचन प्रकल्पात केवळ १२ टक्के पाणीसाठा आहे.

तलावातील गाळ व खोलीकरणाकडे दुर्लक्षशासनाने जलयुक्त शिवारच्या धर्तीवर गाळमुक्त तलाव योजना अंमलात आणली. मात्र या योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी न झाल्याने जिल्ह्यातील शेकडो तलावातील गाळाची समस्या कायम आहे. मागील अनेक वर्षांपासून तलावाचे खोलीकरण करण्याची मागणी केली जात आहे. मात्र याकडे संबंधित विभागाने दुर्लक्ष केले असल्याने तलावांच्या सिंचन क्षमतेत घट होत आहे.

लिजचे पैसे निघणे कठीणजिल्ह्यात एकूण १३३ नोंदणीकृत मत्स्यपालन संस्था आहेत. या संस्थानी हजारो रुपये शासनाकडे भरुन मत्स्यपालनासाठी तलाव लिजवर घेतले आहेत. मात्र वाढत्या तापमानामुळे तलाव कोरडे पडत असल्याने मासे मृत्यूमुखी पडत असून लिजचे पैसे भरुन निघणे कठीण झाले आहे. तर यावर आधारित ७ हजार कुटुंबावर उपासमारीचे संकट ओढावले आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई