शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय दलित तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
7
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
10
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
11
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
12
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
13
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
14
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
15
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
16
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
17
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
18
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
19
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
20
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेच्या शाळांवर शिक्षकांची कमतरता

By admin | Updated: September 11, 2014 23:37 IST

शैक्षणिक सत्र सुरू होऊन तीन महिने लोटूनही जिल्हा परिषद शाळांवरील विद्यार्थ्याना शिक्षक मिळत नसल्याने विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहात आहेत. अनेक ठिकाणी शिक्षकांच्या मागणीला घेऊन

आमगाव : शैक्षणिक सत्र सुरू होऊन तीन महिने लोटूनही जिल्हा परिषद शाळांवरील विद्यार्थ्याना शिक्षक मिळत नसल्याने विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहात आहेत. अनेक ठिकाणी शिक्षकांच्या मागणीला घेऊन विद्यार्थी-पालकांचे आंदोलन होत असताना अजूनही शिक्षकांची मागणी पूर्ण झालेली नाही. यासाठी जिल्हा परिषदेचे अधिकारी व पदाधिकारी यांच्यातील समन्वयाचा अभाव हे कारण सांगितले जात आहे.जिल्हा परिषद शाळांतील सर्वागिण विकासाचा पाया रुजविण्याचे ध्येय शासनाने ठेवून अनेक योजना कार्यान्वित केल्या. विद्यार्थ्यांचा प्राथमिक विकास घडवावा या हेतुने निधीची कमतरता येत नाही. परंतु या योजनांना कार्यालयीन अधिकारी-पदाधिकारी यांच्या अकार्यक्षमतेमुळे अनेक समस्या जिल्हा परिषद वर्तुळात निर्माण झाल्या आहेत. जिल्हा परिषद शाळांमधून सर्वसामान्य नागरिकांच्या मुलांना हक्काचे शिक्षण देणारे गुरूकूल गावपातळीवर उपलब्ध आहे. शाळामध्ये शासन निधीअंतर्गत विद्यार्थ्यांना विविध सुविधा पुरविण्यात येत आहे. अनेक प्राथमिक शाळांना वरिष्ठ विद्यालयाची परवानगी देण्यात आली आहे. १ ते ४ पर्यंतच्या शाळांमध्ये वर्ग ५ ची तुकडी मान्य करण्यात आली आहे. अनेक शाळांमध्ये वाढीव तुकडी मंजुर करण्यात आली. यावर्षी शाळा २६ जूनला प्रारंभ करण्यात आल्या. विद्यार्थी पालकांनी शाळेतील वाढीव तुकडीत विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित केले, परंतु शाळा उघडून तीन महिने लोटूनही या विद्यार्थ्यांना पात्र शिक्षक मिळालेच नाही. शाळेतील अभ्यासक्रम शिक्षक मिळेपर्यंत सहायक शिक्षकांच्या खांद्यावर देण्यात आला. परंतु अनेक विषयांचा अभ्यास संबंधित विषयातील शिक्षकांअभावी मागे पडला आहे. आमगाव तालुक्यात जिल्हा परिषदेअंतर्गत माध्यमिक शाळा दोन, उच्च माध्यमिक ३६ व प्राथमिक शाळा ७८ एकूण ११६ विद्यालय कार्यरत आहेत. यावर्षी आरटीईअंतर्गत शिक्षकांच्या पटनिहाय संख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणाचे गोडवे सावकाशपणे आत्मसात करता आले असते. परंतु या विद्यालयांमध्ये शिक्षकांच्या कमतरतेमुळे शिक्षणाचे ध्येय गाठणे कठीण झाले आहे. अनेक शाळांमध्ये वर्ग ५ ची तुकडी मान्य करण्यात आली आहे. इतर शाळांना वाढीव तुकडी मंजूर करण्यात आली, परंतु वाढीव तुकडी मंजुर करण्याचे नियोजन हाती घेऊन सुध्दा त्या शाळांवर शिक्षकांची पूर्तता करताना जिल्हा परिषद प्रशासन मागे पडले आहे. त्यामुळे अर्धे सत्र संपत असून या शाळांमधील विद्यार्थ्यांची पाटी कोरीच दिसत आहे. तालुक्यात उच्चश्रेणी मुख्याध्यापकांची १० पदे रिक्त आहेत. आंतरजिल्हा बदलीने सहा शिक्षक गेल्याने सहाय्यक शिक्षकांची पदे रिक्त झाली. यात वाढीव उच्च माध्यमिक व माध्यमिक शाळांमध्ये विद्यार्थी पटसंख्येप्रमाणे पदविधर व इतर शिक्षकांची पदे रिक्त आहेत. त्यामुळे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित होत आहेत. शाळेत परिपूर्ण शिक्षण मिळत नसल्याने पालक चिंतीत झाले आहेत. शाळा पातळीवर शाळा समितीच्या माध्यमाने पालकांनी शिक्षकांच्या मागणीला घेऊन आंदोलने केली आहे. परंतु या मागणीला पूर्ण करण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासन हतबल ठरत आहे. (शहर प्रतिनिधी)