शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
4
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
5
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
6
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
7
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
8
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
9
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
10
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
11
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
12
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
13
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
14
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
15
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
16
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
17
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
18
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
19
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
20
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त

जिल्हा परिषदेच्या शाळांवर शिक्षकांची कमतरता

By admin | Updated: September 11, 2014 23:37 IST

शैक्षणिक सत्र सुरू होऊन तीन महिने लोटूनही जिल्हा परिषद शाळांवरील विद्यार्थ्याना शिक्षक मिळत नसल्याने विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहात आहेत. अनेक ठिकाणी शिक्षकांच्या मागणीला घेऊन

आमगाव : शैक्षणिक सत्र सुरू होऊन तीन महिने लोटूनही जिल्हा परिषद शाळांवरील विद्यार्थ्याना शिक्षक मिळत नसल्याने विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहात आहेत. अनेक ठिकाणी शिक्षकांच्या मागणीला घेऊन विद्यार्थी-पालकांचे आंदोलन होत असताना अजूनही शिक्षकांची मागणी पूर्ण झालेली नाही. यासाठी जिल्हा परिषदेचे अधिकारी व पदाधिकारी यांच्यातील समन्वयाचा अभाव हे कारण सांगितले जात आहे.जिल्हा परिषद शाळांतील सर्वागिण विकासाचा पाया रुजविण्याचे ध्येय शासनाने ठेवून अनेक योजना कार्यान्वित केल्या. विद्यार्थ्यांचा प्राथमिक विकास घडवावा या हेतुने निधीची कमतरता येत नाही. परंतु या योजनांना कार्यालयीन अधिकारी-पदाधिकारी यांच्या अकार्यक्षमतेमुळे अनेक समस्या जिल्हा परिषद वर्तुळात निर्माण झाल्या आहेत. जिल्हा परिषद शाळांमधून सर्वसामान्य नागरिकांच्या मुलांना हक्काचे शिक्षण देणारे गुरूकूल गावपातळीवर उपलब्ध आहे. शाळामध्ये शासन निधीअंतर्गत विद्यार्थ्यांना विविध सुविधा पुरविण्यात येत आहे. अनेक प्राथमिक शाळांना वरिष्ठ विद्यालयाची परवानगी देण्यात आली आहे. १ ते ४ पर्यंतच्या शाळांमध्ये वर्ग ५ ची तुकडी मान्य करण्यात आली आहे. अनेक शाळांमध्ये वाढीव तुकडी मंजुर करण्यात आली. यावर्षी शाळा २६ जूनला प्रारंभ करण्यात आल्या. विद्यार्थी पालकांनी शाळेतील वाढीव तुकडीत विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित केले, परंतु शाळा उघडून तीन महिने लोटूनही या विद्यार्थ्यांना पात्र शिक्षक मिळालेच नाही. शाळेतील अभ्यासक्रम शिक्षक मिळेपर्यंत सहायक शिक्षकांच्या खांद्यावर देण्यात आला. परंतु अनेक विषयांचा अभ्यास संबंधित विषयातील शिक्षकांअभावी मागे पडला आहे. आमगाव तालुक्यात जिल्हा परिषदेअंतर्गत माध्यमिक शाळा दोन, उच्च माध्यमिक ३६ व प्राथमिक शाळा ७८ एकूण ११६ विद्यालय कार्यरत आहेत. यावर्षी आरटीईअंतर्गत शिक्षकांच्या पटनिहाय संख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणाचे गोडवे सावकाशपणे आत्मसात करता आले असते. परंतु या विद्यालयांमध्ये शिक्षकांच्या कमतरतेमुळे शिक्षणाचे ध्येय गाठणे कठीण झाले आहे. अनेक शाळांमध्ये वर्ग ५ ची तुकडी मान्य करण्यात आली आहे. इतर शाळांना वाढीव तुकडी मंजूर करण्यात आली, परंतु वाढीव तुकडी मंजुर करण्याचे नियोजन हाती घेऊन सुध्दा त्या शाळांवर शिक्षकांची पूर्तता करताना जिल्हा परिषद प्रशासन मागे पडले आहे. त्यामुळे अर्धे सत्र संपत असून या शाळांमधील विद्यार्थ्यांची पाटी कोरीच दिसत आहे. तालुक्यात उच्चश्रेणी मुख्याध्यापकांची १० पदे रिक्त आहेत. आंतरजिल्हा बदलीने सहा शिक्षक गेल्याने सहाय्यक शिक्षकांची पदे रिक्त झाली. यात वाढीव उच्च माध्यमिक व माध्यमिक शाळांमध्ये विद्यार्थी पटसंख्येप्रमाणे पदविधर व इतर शिक्षकांची पदे रिक्त आहेत. त्यामुळे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित होत आहेत. शाळेत परिपूर्ण शिक्षण मिळत नसल्याने पालक चिंतीत झाले आहेत. शाळा पातळीवर शाळा समितीच्या माध्यमाने पालकांनी शिक्षकांच्या मागणीला घेऊन आंदोलने केली आहे. परंतु या मागणीला पूर्ण करण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासन हतबल ठरत आहे. (शहर प्रतिनिधी)