शहरं
Join us  
Trending Stories
1
ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी
2
नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी
3
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
4
Vinayak Pande and Yatin Wagh: उद्धव ठाकरेंचा आदेश, विनायक पांडे- यतिन वाघ यांची पक्षातून हकालपट्टी; राऊतांची पोस्ट!
5
ज्यांनी घेतलीय त्यांनी मागच्या सीटवर बसू नका, या देशाने घातली मारुती सुझुकीच्या Fronx विक्रीवर बंदी...
6
"युतीमुळे तुम्हाला फरक पडत नाही, तर तोंडाची डबडी का वाजवताय?", संजय राऊत भाजपा नेत्यांवर भडकले
7
१७ वर्षानंतर तारिक रहमान बांगलादेशात परतले; राजकीय हालचालींना वेग, भारतासाठी फायद्याचे की तोट्याचे
8
एका वर्षात 'ग्रॅच्युइटी' मिळण्याचा नियम कागदावरच; नव्या लेबर कोडची प्रतीक्षा लांबली! का होतोय उशीर?
9
जीएसटी कमी होऊन, दोन महिनेही झाले नाहीत तोच कारच्या किंमती महागणार; मारुतीपासून महिंद्रापर्यंत सर्वच कंपन्या वाढवणार किमती
10
नांदेडमध्ये काळजाचा थरकाप! आई-वडील घरात मृतावस्थेत, तर मुलांनी रेल्वेखाली संपवलं आयुष्य
11
संतापजनक घटना! नातीनं विरोधात जाऊन लग्न केलं, संतापलेल्या आजीने नातीच्या ४० दिवसांच्या बाळाला संपवलं
12
जिथे कोंडी केली, तेच ठिकाण ‘गेम चेंजर’ ठरणार; ठाकूरांना खिंडीत गाठण्यासाठी भाजपाची रणनीती!
13
Nigeria Mosque Explosion: नायजेरिया हादरलं! मशिदीत नमाजाच्या वेळी मोठा बॉम्बस्फोट; ५ ठार, ३५ जण गंभीर जखमी
14
ऑस्ट्रेलियात ख्रिसमसपूर्वी ज्यूंवर पुन्हा हल्ला, कारवर 'फायर बॉम्बिंग'; PM अल्बनीज म्हणाले, 'अँटी-सेमिटिझम' कृत्य!
15
सुधीर मुनगंटीवारांचं पक्षाने ऐकलं? आमदार किशोर जोरगेवारांना पदावरून हटवलं; भाजपचा निवडणुकीच्या तोंडावर मोठा निर्णय
16
५० नगरपालिकांमध्ये भाजपाचा नगराध्यक्ष पण नगरसेवकांची संख्या निम्मीही नाही; २ ठिकाणी 'भोपळा'
17
महापालिका निवडणूक २०२६: काँग्रेस-वंचितची आघाडी फिस्कटली! अकोल्यात पाच उमेदवार जाहीर, यादीत कोणाची नावे?
18
“अखेर ‘बाळासाहेबांचे वाघ’ एकत्र आले”; ठाकरे बंधूंच्या युतीनंतर बाळा नांदगावकरांची खास पोस्ट
19
नक्षलवादानंतर अमित शाहांचे नवे मिशन; 2029 पर्यंत देशातून ड्रग्स हद्दपार करण्याचा निर्धार
20
इन्फोसिसमध्ये फ्रेशर्सची चांदी! 'या' पदांसाठी मिळणार २१ लाखांचे पॅकेज; २०,००० नव्या भरतीचे संकेत
Daily Top 2Weekly Top 5

पाईपलाईनच्या स्वच्छतेवर लाखो लिटर पाण्याची नासाडी

By admin | Updated: June 6, 2014 00:03 IST

पाणी हेच जीवन व पाण्याचा अपव्यय टाळा हा संदेश देणार्‍या महाराष्ट्र जीवन प्राधीकरणाला आपल्याच ब्रिदवाक्याचा विसर पडल्याचे दिसून येत आहे. शहरातील वाढीव पाणी पुरवठा योजनेच्या पाईपलाईनच्या स्वच्छतेवर

गोंदिया : पाणी हेच जीवन व पाण्याचा अपव्यय टाळा हा संदेश देणार्‍या महाराष्ट्र जीवन प्राधीकरणाला आपल्याच ब्रिदवाक्याचा विसर पडल्याचे दिसून येत आहे. शहरातील वाढीव पाणी पुरवठा योजनेच्या पाईपलाईनच्या स्वच्छतेवर विभागाने लाखो लीटर पाण्याचा नासाडा सुरू केला. आहे. गुरूवारी (दि.५) शहरातील विवेकानंद कॉलनीत दुपारी हा प्रकार दिसून आला. सर्वत्र पाण्यासाठी धावपळ सुरू असताना येथे मात्र पाण्याचे लोट वाहून जात असल्याने नागरिकांनी या विभागाच्या कार्यप्रणालीवर नाराजी व्यक्त केली.शहराला २४ तास पाणी पुरवठा करण्यासाठी शासनाने वाढीव पाणी पुरवठा योजना दिली. कोट्यवधीच्या या योजनेचे अद्याप पाईपलाईन टाकण्याचे कामच सुरू आहे. एकतर या पाईप लाईनसाठी शहरातील सर्व रस्ते खोदण्यात आले आहेत. त्यात लोकप्रतिनिधी व विभाग येत्या दोन महिन्यात योजना सुरू करू असे सांगत वेळ मारून नेत आहेत. त्यांच्या या आश्‍वासनामुळे आता वर्षभरापेक्षा जास्त काळ लोटून गेला व शहरवासीयांना ही योजना फक्त गाजर वाटू लागली आहे. आजही पाईपलाईन टाकण्याचे कामच सुरू असल्याने या योजनेच्या कामास अजून किती दिवस लागणार हे सांगणे कठीण आहे. असे असताना गुरूवारी (दि.५) शहरातील विवेकानंद कॉलनीतील पाईपलाईनमधून मोठय़ा प्रमाणात पाणी वाहू लागले. या पाईपमधून लाखो लीटर पाण्याची नासाडी झाल्याचे रस्त्याचे जात असलेल्यांनी बघितले. अगोदरच रखरखता उन्हाळा सुरू असून पाण्यासाठी नागरिकांची धावपळ होत असल्याचे चित्र जिल्ह्यातच काय तर शहरातही दिसून येत आहे. अशात याविभागाकडून पाण्याचा असा अपव्यय होत असल्याचे बघून नागरिकांच्या भावना तीव्र झाल्याचे जाणवत होते.या घटनेची माहिती मिळताच मजीप्राचे उपविभागीय अभियंता विवेक बन्नोरे, शाखा अभियंता दांडेकर कर्मचार्‍यांसह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पाईपलाईनच्या स्वच्छतेचे काम सुरू असल्याचे सांगत हलक्यावर हा प्रकार घेतला. मात्र या स्वच्छतेवर लाखो लीटर पाणी नालीतून वाहून जात असल्याचे चित्र इतरांना राग अनावर करणारे होते. एकंदर पाईपच्या स्वच्छतेवर लाखो लीटर पाण्याचा अपव्यय विभागाकडून करण्यात येत असल्याने दुसर्‍यांना पाणी वाचविण्याचा संदेश देणार्‍या विभागालाच पाण्याचे काही मोल नसल्याचे दिसून आले. (शहर प्रतिनिधी)