शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीवरून राजकीय रणकंदन, व्यावसायिक सुशील केडिया यांच्या ट्विटने वातावरण तापले
2
साेमनाथ सूर्यवंशीप्रकरणी पोलिसांवर गुन्हे दाखल करा; परभणीत कोठडीतील मृत्यू; खंडपीठाचे अंतरिम आदेश
3
कर्मचाऱ्यांना मिळणार ‘एनपीएस’प्रमाणे कर लाभ, ‘एकीकृत पेन्शन योजने’ला प्रोत्साहन देण्यासाठी निर्णय
4
मेडिकल कॉलेजांच्या भ्रष्टाचारातील दलालांचा सीबीआयकडून पर्दाफाश; एफआयआरमध्ये बड्या अधिकाऱ्यांसह ३४ नावे
5
सरकारी वकील बदलल्याबाबत प्रतिज्ञापत्र द्या, पायल तडवी आत्महत्या : हायकोर्टाचे सरकारला निर्देश
6
बारसे आटोपून निघाले, ‘समृद्धी’वर ४ ठार; सर्व मृत एकाच कुटुंबातील; चालकाची डुलकी जीवघेणी
7
वाहतूकदारांचा संप मागे; ८० टक्के मागण्या मान्य, ई-चलानचा दंड तसेच ९० दिवसांपेक्षा जास्त जुने चलानही रद्द
8
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
9
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
10
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
11
मोठा दावा...! इराणवरील हल्ल्यानंतर कुठे गायब झाले अमेरिकेचे B-2 बॉम्बर विमान? एकाचे इमर्जन्सी लंडिंग अन्...
12
"मसूद अझहर कुठे? माहित नाही, भारतानं माहिती दिली तर..."; बिलावल भुट्टोंच्या विधानावर कुणाचाच विश्वास बसणार नाही
13
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
14
"तीन दिवस एकच 'अंडरवेअर' अन्..."; पत्नीनं विचित्र कारणं सांगत पतीला पाठवलं 'डायव्हर्स लेटर', होतंय तुफान व्हायरल 
15
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
16
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
17
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
18
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
19
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
20
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र

पाईपलाईनच्या स्वच्छतेवर लाखो लिटर पाण्याची नासाडी

By admin | Updated: June 6, 2014 00:03 IST

पाणी हेच जीवन व पाण्याचा अपव्यय टाळा हा संदेश देणार्‍या महाराष्ट्र जीवन प्राधीकरणाला आपल्याच ब्रिदवाक्याचा विसर पडल्याचे दिसून येत आहे. शहरातील वाढीव पाणी पुरवठा योजनेच्या पाईपलाईनच्या स्वच्छतेवर

गोंदिया : पाणी हेच जीवन व पाण्याचा अपव्यय टाळा हा संदेश देणार्‍या महाराष्ट्र जीवन प्राधीकरणाला आपल्याच ब्रिदवाक्याचा विसर पडल्याचे दिसून येत आहे. शहरातील वाढीव पाणी पुरवठा योजनेच्या पाईपलाईनच्या स्वच्छतेवर विभागाने लाखो लीटर पाण्याचा नासाडा सुरू केला. आहे. गुरूवारी (दि.५) शहरातील विवेकानंद कॉलनीत दुपारी हा प्रकार दिसून आला. सर्वत्र पाण्यासाठी धावपळ सुरू असताना येथे मात्र पाण्याचे लोट वाहून जात असल्याने नागरिकांनी या विभागाच्या कार्यप्रणालीवर नाराजी व्यक्त केली.शहराला २४ तास पाणी पुरवठा करण्यासाठी शासनाने वाढीव पाणी पुरवठा योजना दिली. कोट्यवधीच्या या योजनेचे अद्याप पाईपलाईन टाकण्याचे कामच सुरू आहे. एकतर या पाईप लाईनसाठी शहरातील सर्व रस्ते खोदण्यात आले आहेत. त्यात लोकप्रतिनिधी व विभाग येत्या दोन महिन्यात योजना सुरू करू असे सांगत वेळ मारून नेत आहेत. त्यांच्या या आश्‍वासनामुळे आता वर्षभरापेक्षा जास्त काळ लोटून गेला व शहरवासीयांना ही योजना फक्त गाजर वाटू लागली आहे. आजही पाईपलाईन टाकण्याचे कामच सुरू असल्याने या योजनेच्या कामास अजून किती दिवस लागणार हे सांगणे कठीण आहे. असे असताना गुरूवारी (दि.५) शहरातील विवेकानंद कॉलनीतील पाईपलाईनमधून मोठय़ा प्रमाणात पाणी वाहू लागले. या पाईपमधून लाखो लीटर पाण्याची नासाडी झाल्याचे रस्त्याचे जात असलेल्यांनी बघितले. अगोदरच रखरखता उन्हाळा सुरू असून पाण्यासाठी नागरिकांची धावपळ होत असल्याचे चित्र जिल्ह्यातच काय तर शहरातही दिसून येत आहे. अशात याविभागाकडून पाण्याचा असा अपव्यय होत असल्याचे बघून नागरिकांच्या भावना तीव्र झाल्याचे जाणवत होते.या घटनेची माहिती मिळताच मजीप्राचे उपविभागीय अभियंता विवेक बन्नोरे, शाखा अभियंता दांडेकर कर्मचार्‍यांसह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पाईपलाईनच्या स्वच्छतेचे काम सुरू असल्याचे सांगत हलक्यावर हा प्रकार घेतला. मात्र या स्वच्छतेवर लाखो लीटर पाणी नालीतून वाहून जात असल्याचे चित्र इतरांना राग अनावर करणारे होते. एकंदर पाईपच्या स्वच्छतेवर लाखो लीटर पाण्याचा अपव्यय विभागाकडून करण्यात येत असल्याने दुसर्‍यांना पाणी वाचविण्याचा संदेश देणार्‍या विभागालाच पाण्याचे काही मोल नसल्याचे दिसून आले. (शहर प्रतिनिधी)