शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान तणावावर आज संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची बैठक; बंद खोलीत चर्चेची मागणी
2
Donald Trump Tariffs: 'चीनवरील टॅरिफ कमी करण्यास तयार, कारण...'; डोनाल्ड ट्रम्प यांची अचानक नरमाईची भूमिका
3
Mumbai Fire: मुंबईत कपड्याच्या शोरुममध्ये अग्नितांडव! पाच मजली इमारतीत अडकलेले लहान मुलांसह १९ लोक
4
Stock Market Today: १६० अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला, TATA Motors चा शेअर सुस्साट; ऑटो-आयटी क्षेत्रात तेजी
5
पाकिस्तान सुधारत नाही! सलग ११ व्या दिवशी युद्धबंदीचे उल्लंघन; भारतीय सैनिकांनी धडा शिकवला
6
Video: चिनी फॅक्टरीत रोबोट अचानक झाला हिंसक; कर्मचाऱ्यांवर केला जीवघेणा हल्ला, मग...
7
FD द्वारे रक्कम होऊ शकते तिप्पट, अनेकांना माहितही नाही; ₹५ लाख जमा करा, ₹१५ लाखांपेक्षा जास्त मिळतील
8
मिचमिच डोळे, रडारचे कान...! एमजी अ‍ॅस्टरमधून पुण्यात आणि गावखेड्यात भटकंती, कशी वाटली एसयुव्ही...
9
"२ वर्ष अख्खं जग थांबलं होतं तेव्हा माझं घर यांच्यामुळे चाललं", प्रसाद ओकने कोणाला दिलं श्रेय?
10
'पाकिस्तान भारताविरुद्ध ४ दिवसही टीकू शकत नाही, कराची अन् लाहोरमध्ये गुरुकुल उघडणार'; बाबा रामदेव यांनी सुनावले
11
बारावीचा आज निकाल; या संकेतस्थळांवर पाहता येणार..., कुठे आणि कसा पहावा...
12
अनैतिक संबंधातून वाद, जळगावात भररस्त्यात घडला थरार; पाठलाग करत युवकाला कायमचं संपवलं
13
...म्हणून बाबिलने अर्जुन कपूर, अनन्या पांडेचं नाव घेतलं; अभिनेत्याच्या 'त्या' व्हिडिओनंतर टीमकडून स्पष्टीकरण
14
दूत पाठवले म्हणून अजितदादांची शिंदेंवर नाराजी, पुढे काय?
15
India Pakistan: युद्धाचे ढग गडद होताच मध्यस्थीसाठी मुस्लिम देश आला पुढे, 'हा' नेता येणार भारत दौऱ्यावर
16
कानपूरमध्ये ६ मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
17
जातीनिहाय जनगणनेची फार वर्षे वाट पाहिली, अखेर निर्णय झाला!
18
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: या व्यक्तींची लग्न जुळू शकतात; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
19
तंदूरी रोटी बनली मृत्यूचं कारण! लग्न समारंभात भिडले २ युवक; हाणामारीत दोघांचा जीव गेला
20
संपादकीय: ...शिक्षा शेतकरी भावाला! घोटाळा सरकारनेच मान्य केला हे बरे झाले...

मॅन्युअल टायपिंगची पूर्वअट शिथिल

By admin | Updated: March 19, 2017 00:32 IST

गेल्या ५ डिसेंबर २०१६ रोजी शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने पूर्वअटीचे शासननिर्णय निर्गमीत केले.

संस्थाचालकांचे प्रयत्न : शिक्षणमंत्र्यांना दिले होते मागण्यांचे निवेदन अर्जुनी-मोरगाव : गेल्या ५ डिसेंबर २०१६ रोजी शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने पूर्वअटीचे शासननिर्णय निर्गमीत केले. त्यात ३० श.प्र.मि. विषयाला प्रविष्ठ होण्यासाठी ४० श.प्र.मि.ची अट घालून दिलेली होती. सोबतच तळटिपेमध्ये विद्यार्थी एकाच वेळेस ३० व ४० विषयांस बसू शकेल असे सुध्दा लिहण्यात आले होते. लिहलेल्या तळटिपेप्रमाणे राज्यातील सर्व संस्थामध्ये नविन शैक्षणिक सत्र माहे जानेवारी २०१७ ते जुलै २०१७ साठी प्रवेश देण्यात आले. मात्र महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने १७ फेब्रुवारी २०१७ रोजी शासनाकडे शुध्दीपत्रक सादर करून त्यात ३० विषय उत्तीर्ण झाल्याशिवाय ४० चा निकाल देण्यात येणार नाही. याऐवजी ३० विषयास उत्तीर्ण झाल्याशिवाय ४० ला बसता येणार नाही असे नमूद केल्याने राज्यातील सर्व संस्थाचालकावर संकट कोसळले होते. आयुक्तांना याबाबत विचारपूस करून निर्णय मागे घेण्याबाबत विनंती केली. मात्र आयुक्त परीक्षा परिषद यांच्याकडून समाधान न झाल्याने संघटनेच्या पदाधिकारी आणि संस्थाचालकांनी १० मार्च रोजी आमदार तानाजी मुटकुळे, सतीश चव्हाण, अध्यक्ष प्रकार कराळे, नगरसेवक आणि संस्था चालक महेश माळवतर, संजय नाईक, सुभाष बागड, गिरीष टिभे, दिलीप कुलकर्णी, किशोर पाटील, हेमंत ढमढेरे, संजय भदे यांनी मंत्रालयात शिक्षण मंत्री विनोद तावडे यांना भेटून ३० व ४० मॅन्युअल टायपिंग अभ्यासक्रमात एकत्रीत बसण्याचा प्रश्न मार्गी लावला. तसेच शार्टहॅन्ड ८० साठी ६० विषयाची अटक वगळण्यास अनुकूलता दाखविली. दिनांक २१ ते २५ मार्च दरम्यान जानेवारी/फेब्रुवारी २०१७ चे निकाल जाहीर केले जाईल व नव्याने विद्यार्थ्यांच्या आवेदनपत्र भरण्यासाठी लिंक उपलब्ध परिषदेकडून दिली जाईल असे संघटनेचे अध्यक्ष तथा परीक्षा परिषदेचे अशासकीय सदस्य प्रकाश कराडे यांनी सांगितले. महाराष्ट्र शासनाने राज्यातील शासनमान्य संस्थामध्ये संगणक टायपिंग अभ्यासक्रम चालू करण्यासंबधाने मान्यता आणि संचालन नियमावली १९९१ सुधारीत नियमावली २०१४ निर्गमीत केली. मात्र परिक्षा परिषदेच्या शिफारशीवरून ५ डिसेंबर २०१६ रोजी सुधारीत नियमावली २०१६ मध्ये १४.२ बहिस्थ विद्यार्थी हा खाजगी अनाधिकृत संस्थाना बळ देणारा व सुमारे ५० वर्षापासून सेवा करणाऱ्या संस्थाचालकांवर अन्याय करणारा नियम काढण्यात आला. नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात राज्यातील सर्व संस्थाचालक प्रकाश कराडे यांच्या नेतृत्वाखाली एकत्र येवून धरणे आंदोलन केले होते.