शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
2
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
3
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
4
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
5
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
6
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
7
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
8
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
9
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
10
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
11
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
12
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
13
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
14
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
15
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
16
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
17
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
18
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
19
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
20
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...

मग्रारोहयोच्या कामांवर सोयीसुविधांचा अभाव

By admin | Updated: May 10, 2014 02:26 IST

शासनाने प्रत्येक गावातील मजुरांच्या हाताला काम मिळावे. यासाठी महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना तयार सुरू केली आहे.

गोरेगाव : शासनाने प्रत्येक गावातील मजुरांच्या हाताला काम मिळावे. यासाठी महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना तयार सुरू केली आहे. या कामावरील मजुरांना काही मुलभूत सोयी सुविधा देण्याची तरतूद आहे. मात्र याकडे संबंधित विभागाने दुर्लक्ष केले आहे.मग्रारोहयोच्या कामावरील मजुरांना प्रथमोपचार, पिण्याचे पाणी आणि सावलीत विसावा घेण्याकरिता तात्पुरती झोपडीची व्यवस्था अशा मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करुन देणे बंधनकारक करण्यात आले आहे. असे असले तरी अधिकारी व कर्मचार्‍यांच्या दुर्लक्षामुळे या कामांवरील मजुरांना उन्हाचे चटके सहन करित काम करावे लागत आहे. त्यामुळे मजुरांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.केंद्र व राज्य शासनाच्या समन्वयातून रोजगार हमी योजनेत आमूलाग्र बदल करण्यात आला. यानंतर मनरेगा ही योजना २00७ पासून अंमलात आली. या योजनेत मजुरांच्या हितांना प्रथम प्राधान्य देण्यात आले. मागेल त्याला काम तसेच मूलभूत सोयीसुविधा पुरवून योजना पारदश्री ठेवण्याची तरतूद आहे. परंतु योजनेचे निकष बाजूला करुन अधिकार्‍यांनी मजुरांच्या अधिकारांवर गंडांतर आणल्याचे चित्र दिसून येत आहे. कित्येक ग्रामपंचायत अंतर्गत महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेची कामे सुरू आहेत.मग्रारोहयोच्या कामांवरील मजुरांना कोणत्याही प्रकारची इजा झाल्यास प्राथमिक उपचार म्हणून औषधांची व्यवस्था करण्यात येते. मात्र कामावर प्राथमिक औषधोपचाराची व्यवस्था नसल्याचे े चित्र सर्वत्र दिसून येत आहे. मजुरांना पिण्याकरिता आपल्या घरून पाणी घेऊन यावे लागते.यावरून प्रशासन मजुरांच्या हिताप्रती किती सजग आहे, याची प्रचिती येत आहे. या योजनेत एकंदरीत मजुर भरडून निघत आहेत. पंचायत विभाग आणि जिल्हा रोजगार हमी योजना यंत्रणेनेने याकडे त्वरित लक्ष घालून मजुरांच्या हिताकडे लक्ष द्यावे, अशी मागणी मजुरांकडून होत आहे.(तालुका प्रतिनिधी)