शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
4
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
5
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
6
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
7
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
8
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
9
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
10
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
11
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
12
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
13
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
14
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
15
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
16
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
17
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
18
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
19
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
20
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर

सामाजिक न्याय मंत्र्याच्या कार्यक्षेत्रात कोमलप्रसाद न्यायापासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2019 00:17 IST

तालुक्यातील भडंगा येथील शेतकरी कोमलप्रसाद कटरे यांनी शासन दरबारी आपल्या चार मागण्यांना घेऊन २५ जानेवारीपासून येथील तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. तीन दिवसाचा कालावधी लोटूनही प्रशासनाने त्यांच्या उपोषणाची दखल घेतली नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कगोरेगाव : तालुक्यातील भडंगा येथील शेतकरी कोमलप्रसाद कटरे यांनी शासन दरबारी आपल्या चार मागण्यांना घेऊन २५ जानेवारीपासून येथील तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. तीन दिवसाचा कालावधी लोटूनही प्रशासनाने त्यांच्या उपोषणाची दखल घेतली नाही. त्यामुळे सामाजिक न्याय मंत्र्याच्या कार्यक्षेत्रातच कोमलप्रसाद न्यायापासून वंचित असल्याचे चित्र आहे.कोमलप्रसाद कटरे यांनी चार मागण्यांना घेवून उपोषण सुरू केले असून त्यात सन २०१२-१३ मध्ये न्याय देण्यास प्रशासनाने विलंब केल्यामुळे (पुंजण्याची नासधुस झाल्यामुळे) ते चुरणी करु शकले नाही. त्यामुळे नुकसान भरपाई देण्यात यावी, राजस्व विभागाच्या चुकीमुळे रेकार्ड दुरुस्तीला पाच वर्षे लावल्यामुळे सतत पाच वर्षे गट न.५५२ ची शेती आरजी १.०२ हे.आर. शेती पडीक राहिल्यामुळे झालेली नुकसान भरपाई देण्यात यावी. रेकार्ड दुरुस्तीला चार वर्षे विलंब लावणाऱ्या अधिकाºयावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी, पाच वर्षे धावपळ व मानसिक त्रासासाठी आलेला खर्च देण्यात यावा. या चार मागण्यांना घेऊन आमरण उपोषण सुरु केले आहे. कटरे यांनी गेल्या सहा वर्षात पाच आमरण उपोषणे, एकदा पाणी टॉकीवर विरुगिरी केली आहे. आता पुन्हा आमरण उपोषणावर बसून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करीत आहे. कटरे यांनी प्रथम शेतात जाण्यासाठी रस्ता देण्याच्या मागणीला घेऊन उपोषण केले होते. शेवटी हतबल झालेल्या प्रशासनाने कोमलप्रसादला न्याय देत रस्ता तयार करून दिला. शेतालगतच्या ०.१४ हे.आर. ह्या विवादित जागेवरुन रस्ता मोकळा झाला. पण या प्रक्रियेसाठी प्रशासनाने चार ते पाच वर्षे लावले. त्यामुळे कोमलप्रसादचे संपूर्ण आयुष्य उध्ववस्त झाले. प्रशासनाचे उंबरठे झिजवित वेळ खर्ची झाला, मानसिक त्रास झाला. त्याची भरपाई मिळाली पाहिजे, आणि ज्या अधिकाºयामुळे हा सर्व प्रकार घडला त्या अधिकाºयावर कारवाई करण्यात यावी, अशी कोमलप्रसादची मागणी आहे.

टॅग्स :Rajkumar Badoleराजकुमार बडोले