शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
2
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
3
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
4
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
5
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
6
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
7
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
8
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
9
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
10
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
11
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
12
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
13
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
14
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
15
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
16
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
17
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
18
मस्तच! नवरात्रात कन्या पूजनानंतर मुलींना द्या 'ही' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकल्यांचे चेहरे
19
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
20
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!

सामाजिक न्याय मंत्र्याच्या कार्यक्षेत्रात कोमलप्रसाद न्यायापासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2019 00:17 IST

तालुक्यातील भडंगा येथील शेतकरी कोमलप्रसाद कटरे यांनी शासन दरबारी आपल्या चार मागण्यांना घेऊन २५ जानेवारीपासून येथील तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. तीन दिवसाचा कालावधी लोटूनही प्रशासनाने त्यांच्या उपोषणाची दखल घेतली नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कगोरेगाव : तालुक्यातील भडंगा येथील शेतकरी कोमलप्रसाद कटरे यांनी शासन दरबारी आपल्या चार मागण्यांना घेऊन २५ जानेवारीपासून येथील तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. तीन दिवसाचा कालावधी लोटूनही प्रशासनाने त्यांच्या उपोषणाची दखल घेतली नाही. त्यामुळे सामाजिक न्याय मंत्र्याच्या कार्यक्षेत्रातच कोमलप्रसाद न्यायापासून वंचित असल्याचे चित्र आहे.कोमलप्रसाद कटरे यांनी चार मागण्यांना घेवून उपोषण सुरू केले असून त्यात सन २०१२-१३ मध्ये न्याय देण्यास प्रशासनाने विलंब केल्यामुळे (पुंजण्याची नासधुस झाल्यामुळे) ते चुरणी करु शकले नाही. त्यामुळे नुकसान भरपाई देण्यात यावी, राजस्व विभागाच्या चुकीमुळे रेकार्ड दुरुस्तीला पाच वर्षे लावल्यामुळे सतत पाच वर्षे गट न.५५२ ची शेती आरजी १.०२ हे.आर. शेती पडीक राहिल्यामुळे झालेली नुकसान भरपाई देण्यात यावी. रेकार्ड दुरुस्तीला चार वर्षे विलंब लावणाऱ्या अधिकाºयावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी, पाच वर्षे धावपळ व मानसिक त्रासासाठी आलेला खर्च देण्यात यावा. या चार मागण्यांना घेऊन आमरण उपोषण सुरु केले आहे. कटरे यांनी गेल्या सहा वर्षात पाच आमरण उपोषणे, एकदा पाणी टॉकीवर विरुगिरी केली आहे. आता पुन्हा आमरण उपोषणावर बसून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करीत आहे. कटरे यांनी प्रथम शेतात जाण्यासाठी रस्ता देण्याच्या मागणीला घेऊन उपोषण केले होते. शेवटी हतबल झालेल्या प्रशासनाने कोमलप्रसादला न्याय देत रस्ता तयार करून दिला. शेतालगतच्या ०.१४ हे.आर. ह्या विवादित जागेवरुन रस्ता मोकळा झाला. पण या प्रक्रियेसाठी प्रशासनाने चार ते पाच वर्षे लावले. त्यामुळे कोमलप्रसादचे संपूर्ण आयुष्य उध्ववस्त झाले. प्रशासनाचे उंबरठे झिजवित वेळ खर्ची झाला, मानसिक त्रास झाला. त्याची भरपाई मिळाली पाहिजे, आणि ज्या अधिकाºयामुळे हा सर्व प्रकार घडला त्या अधिकाºयावर कारवाई करण्यात यावी, अशी कोमलप्रसादची मागणी आहे.

टॅग्स :Rajkumar Badoleराजकुमार बडोले