शहरं
Join us  
Trending Stories
1
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
2
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
3
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
4
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
5
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
6
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
7
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
8
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
9
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
10
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
11
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
12
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
13
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
15
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
16
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
17
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
18
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
19
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
20
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार

जीर्ण इमारतीत विद्यार्थ्यांचे ज्ञानार्जन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2018 22:23 IST

शासन जिल्हा परिषदेच्या शाळांकडे विद्यार्थ्यांचा कल वाढविण्यासाठी विविध उपक्रम राबवित आहे. मात्र दुसरीकडे तालुक्यातील जि.प.शाळांच्या जीर्ण इमारतीत विद्यार्थ्यांना ज्ञानार्जन करावे लागत असल्याने विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात आला आहे.

ठळक मुद्देशिक्षण विभागाचे दुर्लक्ष : लोकप्रतिनिधी गप्प

राजेश मुनिश्वर।लोकमत न्यूज नेटवर्कसडक-अर्जुनी : शासन जिल्हा परिषदेच्या शाळांकडे विद्यार्थ्यांचा कल वाढविण्यासाठी विविध उपक्रम राबवित आहे. मात्र दुसरीकडे तालुक्यातील जि.प.शाळांच्या जीर्ण इमारतीत विद्यार्थ्यांना ज्ञानार्जन करावे लागत असल्याने विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात आला आहे. मात्र याकडे शिक्षण विभाग आणि लोकप्रतिनिधींचे सुध्दा दुर्लक्ष केले आहे.सडक-अर्जुनी तालुक्यात वर्ग १ ते ५ च्या १०९ शाळा आहेत. तर वर्ग ६ ते ८ च्या ३६ शाळा आहेत. त्यात प्राथमिक शाळेतील ६ हजार १०५ विद्यार्थी संख्या असून वरिष्ठ प्राथमिक शाळेत १ हजार ८०३ विद्यार्थीची पटसंख्या आहे. तालुक्यात एकूण १४७ शाळा आहेत त्यात ३७६ शिक्षक कार्यरत आहेत. बहुतेक शाळेत शिक्षकांच्या रिक्त जागा न भरल्याने शेंडा केंद्रातील कोयलारी शाळेत एक शिक्षक चार वर्ग सांभाळत आहे. कोयलारी हे गाव आदिवासी बहुल असून घनदाट जंगलाच्या पायथ्याशी आहे. शाळेला सुरक्षा भिंत नसल्यामुळे हिस्त्र प्राणी शाळेच्या आवारात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. विद्यार्थ्यांना पिण्याची पाण्याची सुविधा नाही. वीज नसल्यामुळे डिजीटल शाळा होवूनही संगणक बंद पडले आहेत. शाळेची इमारत जुनी असल्यामुळे इमारत पूर्णपणे मोडकळीस आल्या आहेत. तर तालुक्यातील चिखली केंद्रातील कोसमघाट येथील प्राथमिक शाळेत वर्ग १ ते ४ चे विद्यार्थ्याना शिक्षण दिले जात आहे. शाळेला सुरक्षा भिंत नाही. मुलांना खेळण्यासाठी पटांगण नाही, मागील आठ वर्षापूर्वी तयार करण्यात आलेल्या इमारतीला ठिकठिकाणी भेगा गेल्या आहेत. नवीन वर्गखोलीची नितांत गरज असून याकडे शिक्षण विभागाचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे गावकऱ्यांनी खंत व्यक्त केली. शाळेतील स्वच्छतागृहाची अवस्था सुध्दा अवस्था सुध्दा बिकट झाली आहे.रिक्त पदाने प्रभाऱ्यावर भारसडक-अर्जुनी तालुक्यात शिक्षण विभागाचे नऊ केंद्र आहेत. त्यामध्ये सौंदड, डव्वा, पांढरी, कोसमतोेंडी, चिखली, कोकणा जमी., सडक-अर्जुनी, डोंगरगाव डेपो, शेंडा हे केंद्र आहेत. पाच केंद्रप्रमुखांची नियुक्ती केली आहे. तर चार प्रभारी कर्मचाºयांकडे पदभार दिला आहे. मात्र रिक्त असलेली पदे भरण्याकडे शिक्षण विभागाने दुर्लक्ष केल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.

टॅग्स :Schoolशाळा