शहरं
Join us  
Trending Stories
1
"ट्रम्प यांनी हस्तक्षेप केला नसता तर...'; शहबाज शरीफ बनले अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे प्रवक्ते, शांतीदूत म्हणत नोबेल देण्याची मागणी
2
सुपर ओव्हरचा थरार! श्रीलंका २ धावांवर All Out; पहिल्या बॉलवर मॅच जिंकत टीम इंडियाचा विजयी 'षटकार'
3
"सात भारतीय विमानं पाडली...!"; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर खोटारड्या शाहबाज शरीफ यांची नुसती 'फेका-फेक'
4
सोनम वांगचुक जोधपूर मध्यवर्ती कारागृहात; अटक केल्यानंतर लेहमधून विमानाने आणलं, CCTV खाली देखरेख
5
Pathum Nissanka Century : पहिली सेंच्युरी अन् श्रीलंकेच्या पठ्ठ्यानं किंग कोहलीचा मोठा विक्रमही मोडला
6
फुल-ऑन ड्रामा! संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत नेतन्याहू भाषणाला येताच अनेक देशांचं 'वॉकआउट'
7
संजूचा गगनचुंबी सिक्सर! चाहतीचे ठुमके अन् ड्रेसिंग रुममध्ये सनथ जयसूर्याला कळायचं झालं बंद (VIDEO)
8
अभिषेक शर्माचा महारेकॉर्ड! T20 आशिया कप स्पर्धेत ३०९ धावांसह पाकच्या रिझवानला दिली 'धोबीपछाड'
9
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
10
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
11
अग्निशमन दलाचे जवान घरात घुसताच सिलिंडरचा स्फोट; फ्लॅटमध्ये लागलेल्या आगीत मुलाचा मृत्यू, ५ जण जखमी
12
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
13
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
14
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
15
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
16
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
17
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
18
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
19
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
20
MPSC Exam 2025: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर

कायद्याची जाण असायला हवी

By admin | Updated: November 10, 2014 22:46 IST

भारताच्या राज्यघटनेनुसार प्रत्येक व्यक्तीला मूलभूत अधिकार दिलेले आहेत. त्या अधिकारांमुळे व्यक्ती आपला विकास करतो. एका व्यक्तीच्या अधिकारांचे दुसऱ्या व्यक्तीकडून उल्लंघन झाले

गोंदिया : भारताच्या राज्यघटनेनुसार प्रत्येक व्यक्तीला मूलभूत अधिकार दिलेले आहेत. त्या अधिकारांमुळे व्यक्ती आपला विकास करतो. एका व्यक्तीच्या अधिकारांचे दुसऱ्या व्यक्तीकडून उल्लंघन झाले तर त्या व्यक्तीवर अन्याय होतो. हा अन्याय होऊ नये, आपले अधिकार ठिकवून ठेवण्याकरिता प्रत्येक व्यक्तीला कायद्याची जाण असायला हवी. ज्यामुळे अन्याय होत असेल तर न्यायालयात दाद मागता येते व न्याय मिळतो, असे मत प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश मु.ग. गिरटकर यांनी व्यक्त केले. रविवारी राष्ट्रीय विधी सेवा दिनानिमित्त डोंगरगाव येथे कायदेविषयक जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन केले होते. ग्रापंचायत डोंगरगाव येथे ग्राम विधी व दक्षता केंद्राच्या उद्घाटनही करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी न्या. गिरटकर होते.जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा न्यायालय, गोंदिया, ग्रामपंचायत डोंगरगाव, म.गां. तंमुस डोंगरगाव, जिल्हा वकील संघ गोंदिया व महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती कार्यक्रम, पंचायत समिती, गोंदिया यांच्या संयुक्त विद्यमाने ९ नोव्हेंबर रोजी महिलांकरिता व गावातील इतर नागरिकांकरिता कायदेविषयक साक्षरता शिबिराचे आयोजन तसेच ग्रामपंचायत कार्यालय, डोंगरगाव येथे ग्राम विधी दक्षता व सहायता केंद्राच्या उद्घाटन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाची औपचारिक सुरूवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करुन करण्यात आली. प्रास्ताविकपर मार्गदर्शन तसेच विधी सेवा प्राधिकरणातर्फे जनतेसाठी योजनांबद्दलची माहिती निखिल मेहता, सदस्य सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकारणाचे व वरिष्ठ न्यायाधीश यांनी दिली. यामध्ये जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व तालुका विधी सेवा समितीतर्फे कायदेविषयक जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करणे, गरीब व गरजू पात्र व्यक्तींना मोफत वकील पुरविणे, लोक अदालतीचे आयोजन करणे, मध्यस्थी योजना राबविणे व वरिष्ठांकडून वेळोवेळी निर्देश प्राप्त झाल्याप्रमाणे योजना राबविणे इत्यादी कार्य करण्यात येतात.यावेळी त्यांनी ग्रामपंचायतच्या ठिकाणी ग्राम विधी दक्षता व सहाय केंंद्र, पॅरा लिगल व्हालंटीयर्स योजना बचपन बचाव आंदोलनासंदर्भात १८ वर्षाखालील हरविलेले बालक व शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबविण्याकरिता व त्यांना येणाऱ्या अडचणीवर मात करण्याकरिता, अत्याचार पीडित व्यक्तीस कलम ३५७ ए नुसार नुकसानभरपाई मिळवून देणे इत्यादी योजना जिल्हा विधी सेवा प्राधिकारणांमार्फत राबविल्या जातात अशी माहिती यावेळी देण्यात आली. कोणत्याही व्यक्तिला कायदेविषयक अडचणी येत असतील तर त्यांनी नि:संकोचपणे जिल्हा विधी सेवा प्राधिकारणाच्या कार्यालयात येऊन माहिती घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.प्रमुख पाहुणे पोलीस निरीक्षक सुरेश कदम यांनी पोलीस नागरिक समन्वय पोलीस मित्र योजना याबाबत उपस्थित महिला व नागरिकांना माहिती दिली. महिलांचे संरक्षणविषयक कायदे याबाबतची माहिती न्यायाधिश एस.पी. सदाफळे यांनी दिली. कार्यक्रमात सरपंच नरेंद्र टेंभरे, तंटामुक्त ग्राम समितीचे अध्यक्ष भेदीराम डोंगरे, पुरणसिंह चौधरी, अ‍ॅड.बी.जी लिल्हारे, अ‍ॅड.एच.गौतम, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जिवन्नोती अभियान पंचायत समिती, गोेंदियाचे तालुका समन्वयक पी.टी. बिसेन, प्रशिक्षक मेश्राम व इतर मान्यवर उपस्थित होते. संयोजक रामकिशोर नागवंशी यांनी आभार प्रदर्शन केले. या कार्यक्रमासाठी ग्रामसेवक बी.टी. वैद्य, महेंद्र पटेले, शिवदास थोरात, आर्यचंद्र गणविर, गुरुदयाल जैतवार, अशोक लिल्हारे, हेमराज पटले, तसेच ग्रामपंचायतचे व तंटामुक्त गाव समितीचे सर्व पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले. (तालुका प्रतिनिधी)