शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

२० हजार हेक्टरमधील पिकांवर कीडरोग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2017 00:51 IST

आधी पावसाने पाठ फिरविल्याने आणि आता धानपिकांवर कीड रोगांचा प्रादुर्भाव वाढल्याने जिल्ह्यातील शेतकरी बेजार झाले आहेत.

ठळक मुद्देशासनाने दिले सर्वेक्षणाचे निर्देश : शेतकरी चिंतातूर

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : आधी पावसाने पाठ फिरविल्याने आणि आता धानपिकांवर कीड रोगांचा प्रादुर्भाव वाढल्याने जिल्ह्यातील शेतकरी बेजार झाले आहेत. कृषी विभागाने सुध्दा २० हजार हेक्टरमधील धान पिकांवर कीडरोगांचा प्रादुर्भाव झाला असल्याचे म्हटले आहे. परिणामी जिल्ह्यातील धानपिक संकटात आल्याचे चित्र आहे.यंदा सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस झाला. पावसाचा खंड आणि ढगाळ वातावरणामुळे धानपिकांवर मोठ्या प्रमाणात मावा तुडतुडा, खोडकीडा या कीडरोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. कीडरोगांमुळे शेतकºयांना हाती आलेले पिक गमविण्याची वेळ आली आहे. कीडरोग नियंत्रणासाठी शेतकरी महागडी कीटकनाशके खरेदी करुन फवारणी करित आहे. मात्र कीडरोगासाठी पोषक वातावरण असल्याने फवारणीचा कसालाच उपयोग होत नसल्याचे चित्र आहे. अर्जुनी-मोरगाव, सडक अर्जुनी, देवरी या तालुक्यातील धानपिकांवर कीडरोगांचा सर्वाधिक प्रादुर्भाव असल्याची माहिती आहे. तीन दिवसांपूर्वी कीडरोगांमुळे शेतातील पूर्ण पिक फस्त झाल्याने देवलगाव येथील दोन शेतकºयांनी त्रस्त होवून साडेचार एकारातील धानपिक जाळून टाकले. आधीच कमी पावसामुळे धानाच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. त्यातच आता कीडरोगांचा प्रादुर्भाव झाल्याने केलेला लागवड खर्च सुध्दा भरुन निघणार की नाही, अशी चिंता शेतकºयांना सतावित आहे.जिल्ह्यात १ लाख ८५ हजार हेक्टरवर धानाची लागवड केली जाते. मात्र यंदा कमी पाऊस झाल्याने आधीच ७० हजार हेक्टर क्षेत्र पडीक राहिले. त्यातच आता धानाचे पिक शेतकºयांच्या हाती येण्याची स्थिती असताना २० हजार हेक्टरवरील धानपिकांवर कीडरोगांचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकºयांवर संकट ओढवले आहे. कीडरोग आणि वादळी पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीचे सर्वेक्षण करुन शेतकºयांना आर्थिक मदत देण्याची मागणी शेतकºयांकडून होत आहे.तातडीने पंचनामे कराजिल्ह्यात तीन चार दिवसांपूर्वी आलेल्या वादळी पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. नुकसानग्रस्त शेतकºयांना सर्वेक्षण करुन आर्थिक मदत देण्याची मागणी केली जात होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याची दखल घेत धानपिकाच्या नुकसानीचे सर्वेक्षण करण्याचे निर्देश बुधवारी (दि.२५) जिल्हा प्रशासनाला दिले आहे. या दरम्यान कीडरोगामुळे झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण केले जाणार असल्याचीे माहिती आहे.