शहरं
Join us  
Trending Stories
1
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
2
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
3
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
4
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
5
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
6
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
7
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
8
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
9
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीरावर फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
10
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
11
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
12
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
13
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
14
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
15
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
16
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
17
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
18
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
19
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
20
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
Daily Top 2Weekly Top 5

पराभवाने न खचता सकारात्मक ध्येय ठेवा

By admin | Updated: January 17, 2017 00:57 IST

राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून महाविद्यालयीन युवकांना सुसंस्कारीत जीवन जगण्याचे सामर्थ्य येते.

अतुल साळुंके : राज्यव्यापी रासेयो शिबिराची सांगता बोंडगावदेवी : राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून महाविद्यालयीन युवकांना सुसंस्कारीत जीवन जगण्याचे सामर्थ्य येते. ग्रामीण जिवनाच्या सानिध्यातून स्नेहाचा झरा पाझरतो. समोर येणाऱ्या कठीण प्रसंगातील यशापयशची तमा बाळगू नये. पराभवाला न खचता सकारात्मक ध्येय ठेवून युवा वर्गाने बिनधास्त पुढे जावे असे मार्मिक प्रतिपादन मुंबई येथील राष्ट्रीय सेवा योजनेचे राज्य संपर्क अधिकारी डॉ. अतूल साळुंके यांनी केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ व एस.एस.जे.महाविद्यालयाच्यावतीने येथईल समाज मंदिरा आयोजीत सात दिवसीय राज्यस्तरीय रासेयो शिबिराच्या समारोपीय समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्था अध्यक्ष लुणकरण चितलंगे होते. प्रमुख पाहुणे म्हणून विद्यापिठाचे कार्यक्रम समन्वयक डॉ. भाऊसाहेब बिडवे, डॉ. भाऊ दायदार, सरंच राधेशाम झोळे, उपसरपंच वैशाली मानकर, जिल्हा परिषद सदस्य कमल पाऊलझगडे, तंटामुक्त समिती अध्यक्ष तुळशीदास बोरकर, प्राचार्य डॉ. संजीव पाटणकर, तत्कालीन प्राचार्य वसंत पाटणकर, डॉ. वासुदेव भांडारकर, बद्रीप्रसाद जायस्वाल उपस्थित होते. पुढे बोलताना डॉ. साळुंके यांनी, रासेयो शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ग्रामीण जिवनासोबत प्रत्यक्षात समरस होण्याची संधी मिळते. प्रत्येकाने आपल्या शांत स्वभावाने माणसे जोडण्याचे तंत्र अवगत करावे. समाजातील विधायक कार्य करण्यासाठी युवकांनी नि:संकोच पुढे यावे. कुटूंब व समाज एकत्र राहण्याची किमया अवगत केल्यास वृद्धाश्रमाची गरज भासणार नाही. त्यामुळे उज्वल भविष्य समोर ठेवून युवकांनी मार्गक्रमण करावे. रासेयोच्या माध्यमातून उज्वल भविष्य घडविण्याची दिशा मिळत असल्याचे मत व्यक्त केले. डॉ. बिडवे यांनी, पर्यावरणाचे संतुलन कायम ठेवण्यासाठी वृक्षारोपण करून संवर्धनासाठी युवा वर्गाने पुढे यावे. तर दुधाळू जनावरांचे संगोपन करण्यासाठी ग्रामस्थांनी पुढे यावे असे आवाहन केले. डॉ.दायदार यांनी, रासेयो शिबिराच्या माध्यमातून गावात चैतन्याची लाट निर्माण होते.शिबिरार्थ्यांच्या श्रमशक्तीमधून गावाचा चेहरा-मोहरा बदलून कायापालट होण्यास मदत होते. गावातील विकास व स्वच्छता अभियानाचा शुभारंभ रासेयोच्या माध्यमातून झाला आहे. आता या पुढे गाव प्रगतीपथावर नेण्याची जबाबदारी सामुहितपणे ग्रामस्थांची असल्याचे मत व्यक्त केले. संचालन डॉ. दिलीप काकडे यांनी केले. प्रास्तावीक शिबिर प्रमुख डॉ. राजेश चांडक यांनी मांडले. अहवाल वाचन अभिजीत कुंभार यांनी केले. तर आभार डॉ. शरद मेश्राम यांनी मानले. (वार्ताहर)