शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
2
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
3
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
4
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
5
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
6
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
7
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
8
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
9
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
10
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
11
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?
12
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
13
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
14
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
15
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
16
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
17
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
18
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
19
"वरण-भात माझं आवडीचं जेवण", ट्रोल झाल्यावर विवेक अग्निहोत्रींची पलटी, म्हणाले- "मला अक्कल आली तेव्हा..."
20
Gold Silver Price 21 August: सोन्याच्या दरातील घसरण थांबली, चांदीमध्ये ₹१७४५ ची तेजी, सोनं किती महाग झालं? जाणून घ्या

पराभवाने न खचता सकारात्मक ध्येय ठेवा

By admin | Updated: January 17, 2017 00:57 IST

राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून महाविद्यालयीन युवकांना सुसंस्कारीत जीवन जगण्याचे सामर्थ्य येते.

अतुल साळुंके : राज्यव्यापी रासेयो शिबिराची सांगता बोंडगावदेवी : राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून महाविद्यालयीन युवकांना सुसंस्कारीत जीवन जगण्याचे सामर्थ्य येते. ग्रामीण जिवनाच्या सानिध्यातून स्नेहाचा झरा पाझरतो. समोर येणाऱ्या कठीण प्रसंगातील यशापयशची तमा बाळगू नये. पराभवाला न खचता सकारात्मक ध्येय ठेवून युवा वर्गाने बिनधास्त पुढे जावे असे मार्मिक प्रतिपादन मुंबई येथील राष्ट्रीय सेवा योजनेचे राज्य संपर्क अधिकारी डॉ. अतूल साळुंके यांनी केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ व एस.एस.जे.महाविद्यालयाच्यावतीने येथईल समाज मंदिरा आयोजीत सात दिवसीय राज्यस्तरीय रासेयो शिबिराच्या समारोपीय समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्था अध्यक्ष लुणकरण चितलंगे होते. प्रमुख पाहुणे म्हणून विद्यापिठाचे कार्यक्रम समन्वयक डॉ. भाऊसाहेब बिडवे, डॉ. भाऊ दायदार, सरंच राधेशाम झोळे, उपसरपंच वैशाली मानकर, जिल्हा परिषद सदस्य कमल पाऊलझगडे, तंटामुक्त समिती अध्यक्ष तुळशीदास बोरकर, प्राचार्य डॉ. संजीव पाटणकर, तत्कालीन प्राचार्य वसंत पाटणकर, डॉ. वासुदेव भांडारकर, बद्रीप्रसाद जायस्वाल उपस्थित होते. पुढे बोलताना डॉ. साळुंके यांनी, रासेयो शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ग्रामीण जिवनासोबत प्रत्यक्षात समरस होण्याची संधी मिळते. प्रत्येकाने आपल्या शांत स्वभावाने माणसे जोडण्याचे तंत्र अवगत करावे. समाजातील विधायक कार्य करण्यासाठी युवकांनी नि:संकोच पुढे यावे. कुटूंब व समाज एकत्र राहण्याची किमया अवगत केल्यास वृद्धाश्रमाची गरज भासणार नाही. त्यामुळे उज्वल भविष्य समोर ठेवून युवकांनी मार्गक्रमण करावे. रासेयोच्या माध्यमातून उज्वल भविष्य घडविण्याची दिशा मिळत असल्याचे मत व्यक्त केले. डॉ. बिडवे यांनी, पर्यावरणाचे संतुलन कायम ठेवण्यासाठी वृक्षारोपण करून संवर्धनासाठी युवा वर्गाने पुढे यावे. तर दुधाळू जनावरांचे संगोपन करण्यासाठी ग्रामस्थांनी पुढे यावे असे आवाहन केले. डॉ.दायदार यांनी, रासेयो शिबिराच्या माध्यमातून गावात चैतन्याची लाट निर्माण होते.शिबिरार्थ्यांच्या श्रमशक्तीमधून गावाचा चेहरा-मोहरा बदलून कायापालट होण्यास मदत होते. गावातील विकास व स्वच्छता अभियानाचा शुभारंभ रासेयोच्या माध्यमातून झाला आहे. आता या पुढे गाव प्रगतीपथावर नेण्याची जबाबदारी सामुहितपणे ग्रामस्थांची असल्याचे मत व्यक्त केले. संचालन डॉ. दिलीप काकडे यांनी केले. प्रास्तावीक शिबिर प्रमुख डॉ. राजेश चांडक यांनी मांडले. अहवाल वाचन अभिजीत कुंभार यांनी केले. तर आभार डॉ. शरद मेश्राम यांनी मानले. (वार्ताहर)