शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वे ठप्प; मेट्रो सेवा सुरळीत, प्रवाशांना अल्प दिलासा
2
'नेहरूंनी पाकिस्तानला मदत केली होती', 'सिंधू जल' करारावरुन पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
3
पाकिस्तानची खोटी बडबड! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये गुडघे टेकले, आता परदेशात जाऊन मारतायत थापा
4
उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी विरोधकांकडून उमेदवार जाहीर; सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती रिंगणात
5
ऑटो कंपन्यांवरील अरिष्ट टळले...! चीनने दरवाजे उघडले; रेअर अर्थ मेटलसह दोन वस्तूंवरील निर्बंध हटविले
6
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधू बाजी मारणार की महायुती मात देणार? निकालाची उत्सुकता शिगेला
7
GST बदलाच्या घोषणेनंतर 'या' ५ शेअर्समध्ये होणार मोठी वाढ? ब्रोकरेजकडून खरेदीचा सल्ला!
8
दिलीप प्रभावळकरांचा रोमांचक 'दशावतार'; कोकणातल्या मातीत घडणाऱ्या सिनेमाचा अंगावर काटा आणणारा ट्रेलर
9
"साहेब माझी आई हरवली"; तक्रार नोंदवण्यासाठी मुलगा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला, तपास सुरू होताच सगळ्यांना धक्का बसला!
10
१९४६ च्या कलकत्ता दंगलीत हजारो हिंदूंचे प्राण वाचवणारे गोपाल पाठा कोण होते? कोण मानतं हिरो, तर कुणी म्हणतं व्हिलन  
11
पापा की परी... सावधान! स्कुटरच्या हँडलमधून साप निघाला साप, तरुणीने उडीच मारली...
12
इंडियन ऑइलने अमेरिकेला दाखवला 'ठेंगा', रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी सुरुच राहणार...
13
VIDEO : किन्नरच्या सौंदर्यावर नेटकरी 'फिदा'! व्हिडिओ पाहून युजर्स म्हणतायत...; तुम्हीही थक्क व्हाल!
14
मिठी नदी धोक्याच्या पातळीवर; नदीलगतच्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं, बीकेसीत पाणी साचण्याची शक्यता
15
Mangalagauri 2025: मंगळगौरीचे पावित्र्य आणि माधुर्य दर्शवणारे दीनानाथ दलाल यांचे चित्र; पहा बारकावे!
16
ऋतुराजनं बॉलिंगमध्ये आजमावला हात; सिक्सर मारल्यावर विकेट्स घेत हिशोब केला चुकता (VIDEO)
17
ती गुढ आग... ज्यात भारताचं सेमीकंडक्टर बनवण्याचं स्वप्न झालं होतं जळून खाक, ७ फेब्रुवारी १९८९ रोजी नेमकं काय झालं होतं?
18
सावधान! अनोळखी व्यक्तीला कॅशच्या बदल्यात पैसे ट्रान्सफर करताय? 'या' एका चुकीमुळे जावं लागेल थेट तुरुंगात
19
Himachal Pradesh: हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटी; अनेक घरे, गाड्या गेल्या वाहून, ४०० रस्ते बंद!
20
Miss Universe India: २२ वर्षांच्या मनिका विश्वकर्माने जिंकला 'मिस युनिव्हर्स इंडिया २०२५' चा खिताब, कोण आहे ही सुंदरी?

कृषी विभागाने सहकार्य करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2017 23:53 IST

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : खरीप हंगामात शेतीसाठी शेतकºयांना पीक कर्जाची आवश्यकता आहे. नैसर्गीक संकटामुळे शेतीची झालेली नुकसान भरपाई शेतकºयांना मिळवून देण्यासाठी जास्तीत जास्त शेतकºयांचा पंतप्रधान पीक विमा योजनेत सहभागी होतील. यासाठी त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी बँकांना कृषी विभागाने सहकार्य करावे असे निर्देश जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी दिले.जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात गुरूवारी (दि.२७) ...

ठळक मुद्देजिल्हाधिकारी काळे यांचे निर्देश : पीक विमा योजनेची आढावा बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : खरीप हंगामात शेतीसाठी शेतकºयांना पीक कर्जाची आवश्यकता आहे. नैसर्गीक संकटामुळे शेतीची झालेली नुकसान भरपाई शेतकºयांना मिळवून देण्यासाठी जास्तीत जास्त शेतकºयांचा पंतप्रधान पीक विमा योजनेत सहभागी होतील. यासाठी त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी बँकांना कृषी विभागाने सहकार्य करावे असे निर्देश जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी दिले.जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात गुरूवारी (दि.२७) खरीप पीक कर्ज वाटप व पंतप्रधान पीक विमा योजनेचा आढावा घेताना आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा अग्रणी प्रबंधक सिल्हारे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनिल इंगळे, जिल्हा उपनिबंधक संदीप जाधव, नाबार्डचे जिल्हा व्यवस्थापक निरज जागरे, आत्माचे प्रकल्प संचालक हिंदूराव चव्हाण प्रामुख्याने उपस्थित होते.जिल्हाधिकारी काळे म्हणाले, आज शेतकºयांना खरीप हंगामासाठी पीक कर्जाची आवश्यकता आहे. अशावेळी बँकांनी शेतकºयांना पीक कर्ज देण्यास टाळाटाळ करु नये. ज्या बँका शेतकºयांना पीक कर्ज देण्यास टाळाटाळ करतील तर अशा बँकांच्या अधिकाºयांची वेतनवाढ थांबविण्यात यावी अशी सल्ला आपण मुख्यमंत्र्यांना नुकत्याच व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये दिल्याचे त्यांनी सांगितले. जिल्ह्यातील शेतकºयांना पीक विम्याचा लाभ देण्यासाठी पीक कर्ज देताना विम्याचा प्रिमियम कपात करावा. हा प्रिमियम ३१ जुलै पूर्वी शेतकºयांच्या खात्यातून कपात करु न भरावा असेही त्यांनी यावेळी सांगितले.तसेच ३० जुलैला देखील बँका सुरु राहणार असल्याचे सांगत, या दिवशी देखील शेतकºयांना पीक कर्ज वाटप करु न व प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा हप्ता भरता येईल. बँकांनी जर शेतकºयांचा विमा हप्ता कपात केला नाही तर संबंधित बँकेकडून शेतकºयांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई वसूल करण्यात येईल. आता कमी दिवस शिल्लक असल्यामुळे जिल्ह्यातील प्रत्येक गावात कृषी सहाय्यकामार्फत जास्तीत जास्त बिगर कर्जदार शेतकरी विमा काढतील यादृष्टीने नियोजन करावे. शेतकºयांना पीक विमा योजनेची विस्तृत माहिती कृषि सहायकांनी समजावून सांगावी. एक कृषी सहायक २५ बिगर कर्जदार शेतकरी पीक विमा काढतील यादृष्टीने त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी नियोजन करावे. ३१ जुलै पर्यंत जिल्ह्यातील २५०० बिगर कर्जदार शेतकºयांनी पीक विमा योजनेचा लाभ घेतला पाहिजे यासाठी कृषी विभागाने व रिलायंस कंपनीच्या प्रतिनिधींनी पुढाकार घ्यावा असेही जिल्हाधिकारी काळे म्हणाले.जिल्हा अग्रणी प्रबंधक सिल्हारे यांनी, जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत बँका शेतकºयांना पीक कर्ज देण्यास टाळाटाळ करीत असल्याचे दिसून येते. यापुढे शेतकºयांच्या तक्र ारी येणार नाही याची दक्षता घ्यावी. १० हजार रूपयापर्यंत तात्काळ कर्ज सर्व बँक शाखांनी शेतकºयांना ३१ आॅगस्ट पर्यंत उपलब्ध करु न दयावे. बँकांनी आपला व्यवसाय करतांना पीक कर्ज वाटपाबाबत शेतकºयांकडे दुर्लक्ष करु नये. कर्जमाफीचे अर्ज सर्व बँक शाखांमध्ये उपलब्ध करु न द्यावे असे सांगीतले. अधीक्षक कृषी अधिकारी इंगळे यांनी, तालुका कृषी अधिकाºयांनी प्रत्येक शाखेत पीक कर्ज वाटप व पीक विमा योजनेसाठी कृषी सहायकांची समन्वयक म्हणून नेमणूक करावी. ३१ जुलै पर्यंत प्रत्येक शेतकºयांकडून ७८० रु पये प्रति हेक्टर याप्रमाणे विमा हप्ता शेतकºयांकडून भरुन घ्यावा. प्रत्येक तालुका कृषी अधिकारी कार्यालयात रिलायंस कंपनीचा व्यक्ती समन्वयक म्हणून नियुक्त केला असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी कृषी विकास अधिकारी वंदना शिंदे, कृषी उपसंचालक अश्विनी भोपळे, उपविभागीय कृषी अधिकारी नाईनवाड, तालुका कृषी अधिकारी मंगेश वावधने, तुमडाम, श्रृंगारे, तोडसाम यांच्यासह बँकांचे जिल्हा समन्वयक तसेच विविध बँकेचे शाखा प्रबंधक उपस्थित होते.