शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
3
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
4
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
5
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
6
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
7
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
8
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
9
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
10
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
11
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
12
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
13
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
14
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
15
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
16
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
17
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
18
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
19
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
20
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
Daily Top 2Weekly Top 5

फक्त दोनच तासांची ड्युटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2019 05:00 IST

तिन्ही कार्यालयात १४ अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहेत. यापैकी शाखा अभियंता सह पाच ते सहा कर्मचारी रेल्वेने गोंदियावरून येणे-जाणे करतात. १२.३० वाजता डेमो रेल्वे गाडीने कार्यालयात येतात व दोन तास कार्यालयीन कामकाज आटपून २ वाजताच्या डेमोने निघून जातात. या प्रकाराकडे अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याची तक्रार आहे. त्यामुळे या कार्यालयाशी संबंधित गावातील शेतकऱ्यांना हात हलवत परत जावे लागते किंवा या कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागतात. या कार्यालयाची वेळ सकाळी ९.४५ ते सायंकाळी ५.४५ वाजताची आहे. परंतु हे येणे-जाणे करणारे कर्मचारी रोजच दोन तास कार्यालयात कसेबसे राहतात.

ठळक मुद्देपाटबंधारे उपविभाग व शाखा अभियंता कार्यालय वाऱ्यावर : रेल्वेच्या वेळापत्रकानुसार कामकाज

लोकमत न्यूज नेटवर्कनवेगावबांध : येथे उपविभागीय पाटबंधारे विभाग व शाखा अभियंत्याची दोन कार्यालये अशी तीन कार्यालये आहेत. यात कार्यरत अधिकारी- कर्मचारी फक्त दोन तास सेवा देतात. उपविभागीय कार्यालय व दोन शाखा अभियंता कार्यालय या ठिकाणी आहे. अधिकारी-कर्मचारी अप-डाऊन करीत असल्याने रेल्वेच्या वेळापत्रकानुसार या कार्यालयांचा कारभार सुरू असल्याची तक्रार युवा कास्तकार संघटनेने केली आहे.तिन्ही कार्यालयात १४ अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहेत. यापैकी शाखा अभियंता सह पाच ते सहा कर्मचारी रेल्वेने गोंदियावरून येणे-जाणे करतात. १२.३० वाजता डेमो रेल्वे गाडीने कार्यालयात येतात व दोन तास कार्यालयीन कामकाज आटपून २ वाजताच्या डेमोने निघून जातात. या प्रकाराकडे अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याची तक्रार आहे. त्यामुळे या कार्यालयाशी संबंधित गावातील शेतकऱ्यांना हात हलवत परत जावे लागते किंवा या कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागतात. या कार्यालयाची वेळ सकाळी ९.४५ ते सायंकाळी ५.४५ वाजताची आहे. परंतु हे येणे-जाणे करणारे कर्मचारी रोजच दोन तास कार्यालयात कसेबसे राहतात. दोन तास कार्यालयात राहून पगार मात्र पूर्ण महिन्याचा घेतात. असे उपविभागीय अभियंत्यांना केलेल्या तक् ारीत नमूद आहे.प्रतिनिधीने कार्यालयात फेरफटका मारला असता १४ पैकी केवळ पाच कर्मचारी कार्यालयात उपस्थित असल्याचे निदर्शनास आले. राजोली, भरनोली पासून, नवेगावबांध परिसरातील शेतकरीही दाखले घेण्यासाठी किंवा अन्य शेतीविषयक कामांसाठी या कार्यालयात येत असतात. मात्र कार्यालयात आल्यावर, कार्यालयातील शाखा अभियंतासह कर्मचारी शेतकऱ्यांच्या दृष्टीस पडतच नाहीत. याबाबत शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. अधिकाऱ्यांसह पाटबंधारे कार्यालय वाऱ्यावर आहे. स्थानिक मुख्यालयी राहत असलेले कर्मचारी पूर्णवेळ या कार्यालयात दिसतात. या प्रकाराला अधिकाऱ्यांची कृपादृष्टी असल्याचे शेतकरी बोलत आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष घालून या प्रकारावर आळा घालून, पूर्ण वेळ कर्मचारी कार्यालयात कसे राहतील याकडे लक्ष देण्याची मागणी युवा कास्तकार संघटनेने केली आहे.कार्यालयात जवळपास २० पदे रिक्त आहेत. त्यामुळे उपलब्ध असलेल्या कर्मचाऱ्यांना शासकीय कामानिमित्त बाहेर जावे लागते.- समीर बंसोड, उपविभागीय अधिकारी, पाटबंधारे उपविभाग, नवेगावबांध

टॅग्स :Employeeकर्मचारी