शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

फक्त दोनच तासांची ड्युटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2019 05:00 IST

तिन्ही कार्यालयात १४ अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहेत. यापैकी शाखा अभियंता सह पाच ते सहा कर्मचारी रेल्वेने गोंदियावरून येणे-जाणे करतात. १२.३० वाजता डेमो रेल्वे गाडीने कार्यालयात येतात व दोन तास कार्यालयीन कामकाज आटपून २ वाजताच्या डेमोने निघून जातात. या प्रकाराकडे अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याची तक्रार आहे. त्यामुळे या कार्यालयाशी संबंधित गावातील शेतकऱ्यांना हात हलवत परत जावे लागते किंवा या कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागतात. या कार्यालयाची वेळ सकाळी ९.४५ ते सायंकाळी ५.४५ वाजताची आहे. परंतु हे येणे-जाणे करणारे कर्मचारी रोजच दोन तास कार्यालयात कसेबसे राहतात.

ठळक मुद्देपाटबंधारे उपविभाग व शाखा अभियंता कार्यालय वाऱ्यावर : रेल्वेच्या वेळापत्रकानुसार कामकाज

लोकमत न्यूज नेटवर्कनवेगावबांध : येथे उपविभागीय पाटबंधारे विभाग व शाखा अभियंत्याची दोन कार्यालये अशी तीन कार्यालये आहेत. यात कार्यरत अधिकारी- कर्मचारी फक्त दोन तास सेवा देतात. उपविभागीय कार्यालय व दोन शाखा अभियंता कार्यालय या ठिकाणी आहे. अधिकारी-कर्मचारी अप-डाऊन करीत असल्याने रेल्वेच्या वेळापत्रकानुसार या कार्यालयांचा कारभार सुरू असल्याची तक्रार युवा कास्तकार संघटनेने केली आहे.तिन्ही कार्यालयात १४ अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहेत. यापैकी शाखा अभियंता सह पाच ते सहा कर्मचारी रेल्वेने गोंदियावरून येणे-जाणे करतात. १२.३० वाजता डेमो रेल्वे गाडीने कार्यालयात येतात व दोन तास कार्यालयीन कामकाज आटपून २ वाजताच्या डेमोने निघून जातात. या प्रकाराकडे अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याची तक्रार आहे. त्यामुळे या कार्यालयाशी संबंधित गावातील शेतकऱ्यांना हात हलवत परत जावे लागते किंवा या कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागतात. या कार्यालयाची वेळ सकाळी ९.४५ ते सायंकाळी ५.४५ वाजताची आहे. परंतु हे येणे-जाणे करणारे कर्मचारी रोजच दोन तास कार्यालयात कसेबसे राहतात. दोन तास कार्यालयात राहून पगार मात्र पूर्ण महिन्याचा घेतात. असे उपविभागीय अभियंत्यांना केलेल्या तक् ारीत नमूद आहे.प्रतिनिधीने कार्यालयात फेरफटका मारला असता १४ पैकी केवळ पाच कर्मचारी कार्यालयात उपस्थित असल्याचे निदर्शनास आले. राजोली, भरनोली पासून, नवेगावबांध परिसरातील शेतकरीही दाखले घेण्यासाठी किंवा अन्य शेतीविषयक कामांसाठी या कार्यालयात येत असतात. मात्र कार्यालयात आल्यावर, कार्यालयातील शाखा अभियंतासह कर्मचारी शेतकऱ्यांच्या दृष्टीस पडतच नाहीत. याबाबत शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. अधिकाऱ्यांसह पाटबंधारे कार्यालय वाऱ्यावर आहे. स्थानिक मुख्यालयी राहत असलेले कर्मचारी पूर्णवेळ या कार्यालयात दिसतात. या प्रकाराला अधिकाऱ्यांची कृपादृष्टी असल्याचे शेतकरी बोलत आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष घालून या प्रकारावर आळा घालून, पूर्ण वेळ कर्मचारी कार्यालयात कसे राहतील याकडे लक्ष देण्याची मागणी युवा कास्तकार संघटनेने केली आहे.कार्यालयात जवळपास २० पदे रिक्त आहेत. त्यामुळे उपलब्ध असलेल्या कर्मचाऱ्यांना शासकीय कामानिमित्त बाहेर जावे लागते.- समीर बंसोड, उपविभागीय अधिकारी, पाटबंधारे उपविभाग, नवेगावबांध

टॅग्स :Employeeकर्मचारी