शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

आठ महिन्यांत केवळ ३६८ रूग्णांना लाभ

By admin | Updated: August 8, 2014 00:01 IST

बायपास सर्जरी, हृदयाच्या आजारासाठी केली जाणारी सर्जरी, व्हॉल्व बदल व केमोथेरपी आदी मोठ्या आजारांचे उपचार करवून घेणे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर झाले आहे. अशा आजारांवर नि:शुल्क

राजीव गांधी जीवनदायी योजना : खासगी रुग्णालयात होते रुग्णांची बोळवणदेवानंद शहारे - गोंदियाबायपास सर्जरी, हृदयाच्या आजारासाठी केली जाणारी सर्जरी, व्हॉल्व बदल व केमोथेरपी आदी मोठ्या आजारांचे उपचार करवून घेणे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर झाले आहे. अशा आजारांवर नि:शुल्क उपचार करण्यासाठी शासनाने २१ नोव्हेंबर २०१३ रोजी राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेचा शुभारंभ केला. याअंतर्गत गेल्या आठ महिन्यात केवळ ३६८ रूग्णांनाच योजनेचा लाभ मिळू शकला. त्यामुळे या योजनेला गती देण्यात आरोग्य प्रशासन आणि संबंधित यंत्रणा कमी पडत असल्याचे दिसून येते.राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रत्येक कुटुंबाला एक आरोग्य कार्ड तयार करून घ्यावे लागते. हे आरोग्य कार्ड तयार करण्यासाठी कुटुंबाचे रेशन कार्ड व रेशन कार्डात नाव असलेल्या सर्व सदस्यांच्या ओळखपत्रांची गरज असते. मागील आठवड्यापर्यंत गोंदिया जिल्ह्यात एकूण एक लाख ९२ हजार कुटुंबांनी आरोग्य कार्ड तयार करून घेतल्याची नोंद करण्यात आली आहे. जिल्ह्यात या योजनेसाठी पात्र असणाऱ्या कुटूंबांची संख्या दोन लाख ३६ हजार आहे. त्यामुळे अजून ४० हजार कुटुंबीय या योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असणारे आरोग्य कार्ड तयार करण्यापासून वंचित आहेत. त्यामुळे हे कुटुंबिय सदर योजनेच्या माहितीपासूनच अनभिज्ञ असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या योजनेच्या प्रचार आणि प्रसिद्धीसाठी स्थानिक स्तरावर कोणताही निधी खर्च केला जात नसल्यामुळे या योजनेबाबत नागरिक अजूनही अनभिज्ञ असल्याचे दिसून येते.सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी योजनेचे आरोग्य कार्ड नसल्यास त्यांना रेशन कार्डद्वारे लाभ घेता येतो. त्यामुळेच अनेकांनी हे आरोग्य कार्ड तयार करून घेण्यासाठी उत्सुकता दाखविली नसल्याचे संबंधित यंत्रणेतील लोक सांगतात.आता नवीन व जुन्या अशा दोन्ही रेशन कार्डधारकांना सदर योजनेचा लाभ घेता येतो. यात पिवळे, केशरी, अन्नपूर्णा व अंत्योदय रेशन कार्डधारकांचा समावेश आहे. या योजनेच्या प्रचार-प्रसिद्धीसाठी प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर संग्राम केंद्र स्थापन करण्यात आल्याचे सांगण्यात आले. जिल्ह्यात एकूण ५५० ग्रामपंचायती आहेत. ग्रामपंचायत स्तरावर आरोग्य शिबिर घेतली जातात. योजनेच्या माध्यमातून एकूण ९७१ रोगांवर पाच हजार ते १.५ लाख रूपये शासनाच्या खर्चाने औषधोपचार केला जातो. आकाशवाणीच्या माध्यमातून याबाबतचा प्रचार केला जातो.