शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये उलटफेर! शेख हसीना यांना विरोध करणारा पक्ष फुटला,जमातमध्ये आश्रय घेतला
2
प्रशासनाचा गलथान कारभार! निवडणूक एका ठिकाणी, अधिकाऱ्यांनी प्रक्रिया केली दुसरीकडे; उमेदवाराच्या विजयानंतर शासनाला आली जाग
3
TATA Steel विरोधात खटला दाखल; १४८ अब्ज रुपयांच्या नुकसान भरपाईची मागणी, प्रकरण काय?
4
IT Manager Gang Rape: हॉटेलमध्ये आले, दीड वाजेपर्यंत पार्टी आणि गुप्तांगावर जखमा; मॅनेजर सामूहिक बलात्कार प्रकरणाची Inside Story
5
Ashes मध्ये तुफान राडा! जो रूटने मार्नस लाबुशेनचा कॅच घेण्यावरून मैदानात गोंधळ, पाहा VIDEO
6
क्रूरतेचा कळस! जावई झाला हैवान; सासू-सासरे आणि बायकोवर तलवारीने केले सपासप वार
7
एकावर मिळणार ४ बोनस शेअर्स; रेकॉर्ड डेट २०२६ च्या पहिल्या आठवड्यात, वर्षभरात 'या' शेअरनं केलाय पैसा दुप्पट
8
VIDEO: डिटर्जंट, युरिया अन् रिफाईंड तेल; अंधेरीत नामांकित ब्रँड्सच्या पिशव्यांमध्ये भरलं भेसळयुक्त दूध, घरात सुरु होतं रॅकेट
9
"फक्त बांगलादेशातच नाही, तर बंगालमध्येही हिंदू सुरक्षित नाहीत"; भाजपाचा ममता बॅनर्जींवर गंभीर आरोप
10
दोन वर्षांत २९००० डॉक्टर, अभियंते, अकाउंटंट्सनी पाकिस्तान सोडले, जगभरात आसिम मुनीर यांची नामुष्की
11
PMC Elections : दोन्ही राष्ट्रवादीची चर्चा फिस्कटली;शरद पवार गटाची काँग्रेस, उद्ववसेनेशी चर्चा सुरू
12
बॉक्सिंग डे कसोटीतील विजयासह इंग्लंडनं साधला मोठा डाव; ऑस्ट्रेलियाला धक्का देत टीम इंडियाशी बरोबरी
13
प्रेयसीच्या नादात हिमांशू भारद्वाजने आधी विकली स्वतःची किडनी, नंतर रॅकेटमध्ये झाला सामील
14
४० किलो स्फोटकांचा वापर आणि २०२३ पासून सुरू होती तयारी; लाल किल्ला स्फोट प्रकरणात खळबळजनक खुलासा!
15
Truecaller चा खेळ संपणार? TRAI च्या एका निर्णयामुळे २५ कोटी भारतीयांच्या फोनमधून 'हे' ॲप गायब होण्याची शक्यता!
16
शाकंभरी नवरात्र २०२५: पौषात रविवारपासून सुरु होतोय शाकंभरी नवरात्रोत्सव; काय आहे महत्त्व आणि कुलाचार?
17
महापालिका निवडणूक : "...तर ताकद दाखवावी लागेल", अमोल मिटकरींचा भाजपाला इशारा, जागांवरून काय फिस्कटले?
18
"यश त्याच्या डोक्यात गेलं आहे"; 'दृश्यम ३'च्या निर्मात्यांची अक्षय खन्नावर सडकून टीका, कायदेशीर नोटीस पाठवणार
19
एलपीजी ते बँकिंग आणि पॅन-आधार, १ जानेवारी २०२६ पासून काय काय बदलणार? थेट खिशावर होणार परिणाम
20
बापरे बाप! जावई संतापला, बायको सतत माहेरी जाते म्हणून सासरच्या घरावर बुलडोझर चालवला अन्...
Daily Top 2Weekly Top 5

आठ महिन्यांत केवळ ३६८ रूग्णांना लाभ

By admin | Updated: August 8, 2014 00:01 IST

बायपास सर्जरी, हृदयाच्या आजारासाठी केली जाणारी सर्जरी, व्हॉल्व बदल व केमोथेरपी आदी मोठ्या आजारांचे उपचार करवून घेणे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर झाले आहे. अशा आजारांवर नि:शुल्क

राजीव गांधी जीवनदायी योजना : खासगी रुग्णालयात होते रुग्णांची बोळवणदेवानंद शहारे - गोंदियाबायपास सर्जरी, हृदयाच्या आजारासाठी केली जाणारी सर्जरी, व्हॉल्व बदल व केमोथेरपी आदी मोठ्या आजारांचे उपचार करवून घेणे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर झाले आहे. अशा आजारांवर नि:शुल्क उपचार करण्यासाठी शासनाने २१ नोव्हेंबर २०१३ रोजी राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेचा शुभारंभ केला. याअंतर्गत गेल्या आठ महिन्यात केवळ ३६८ रूग्णांनाच योजनेचा लाभ मिळू शकला. त्यामुळे या योजनेला गती देण्यात आरोग्य प्रशासन आणि संबंधित यंत्रणा कमी पडत असल्याचे दिसून येते.राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रत्येक कुटुंबाला एक आरोग्य कार्ड तयार करून घ्यावे लागते. हे आरोग्य कार्ड तयार करण्यासाठी कुटुंबाचे रेशन कार्ड व रेशन कार्डात नाव असलेल्या सर्व सदस्यांच्या ओळखपत्रांची गरज असते. मागील आठवड्यापर्यंत गोंदिया जिल्ह्यात एकूण एक लाख ९२ हजार कुटुंबांनी आरोग्य कार्ड तयार करून घेतल्याची नोंद करण्यात आली आहे. जिल्ह्यात या योजनेसाठी पात्र असणाऱ्या कुटूंबांची संख्या दोन लाख ३६ हजार आहे. त्यामुळे अजून ४० हजार कुटुंबीय या योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असणारे आरोग्य कार्ड तयार करण्यापासून वंचित आहेत. त्यामुळे हे कुटुंबिय सदर योजनेच्या माहितीपासूनच अनभिज्ञ असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या योजनेच्या प्रचार आणि प्रसिद्धीसाठी स्थानिक स्तरावर कोणताही निधी खर्च केला जात नसल्यामुळे या योजनेबाबत नागरिक अजूनही अनभिज्ञ असल्याचे दिसून येते.सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी योजनेचे आरोग्य कार्ड नसल्यास त्यांना रेशन कार्डद्वारे लाभ घेता येतो. त्यामुळेच अनेकांनी हे आरोग्य कार्ड तयार करून घेण्यासाठी उत्सुकता दाखविली नसल्याचे संबंधित यंत्रणेतील लोक सांगतात.आता नवीन व जुन्या अशा दोन्ही रेशन कार्डधारकांना सदर योजनेचा लाभ घेता येतो. यात पिवळे, केशरी, अन्नपूर्णा व अंत्योदय रेशन कार्डधारकांचा समावेश आहे. या योजनेच्या प्रचार-प्रसिद्धीसाठी प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर संग्राम केंद्र स्थापन करण्यात आल्याचे सांगण्यात आले. जिल्ह्यात एकूण ५५० ग्रामपंचायती आहेत. ग्रामपंचायत स्तरावर आरोग्य शिबिर घेतली जातात. योजनेच्या माध्यमातून एकूण ९७१ रोगांवर पाच हजार ते १.५ लाख रूपये शासनाच्या खर्चाने औषधोपचार केला जातो. आकाशवाणीच्या माध्यमातून याबाबतचा प्रचार केला जातो.