शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
2
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
3
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
4
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
5
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
6
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
7
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
8
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
9
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
10
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
11
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासा

By admin | Updated: April 13, 2016 02:04 IST

भूतप्रेत, जादूटोना, देवी अंगात येणे या बाबी फोल असून जगात चमत्कार नावाची गोष्टच नाही.

श्याम मानव : बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सामाजिक समता सप्ताहगोंदिया : भूतप्रेत, जादूटोना, देवी अंगात येणे या बाबी फोल असून जगात चमत्कार नावाची गोष्टच नाही. चमत्कार कुठेही घडत असेल तर ते वास्तविक चमत्कार नसून त्यामागील खरे कारण काय हे शोधावे. चमत्काराच्या नावाखाली अनेक भोंदूबाबा लोकांची लुबाडणूक करतात. ही लुबाडणूक होवू नये व लोकांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा, यासाठी महाराष्ट्र शासनाने जादूटोणाविरोधी कायदा संमत केला, असे प्रतिपादन अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक संघटक प्रा. श्याम मानव यांनी केले.सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, सहायक आयुक्त, समाजकल्याण कार्यालय गोंदिया व अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती गोंदिया यांच्या संयुक्त विद्यमाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त मंगळवारी सामाजिक सप्ताह कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अंधश्रद्धा निर्मूलनविषयक विचार व जादुटोणाविरोधी कायद्यावर मार्गदर्शन करीत होते.उद्घाटन प्रा. श्याम मानव यांच्या हस्ते, डॉ. वीरेंद्र जायस्वाल यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. अतिथी म्हणून जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, समाजकल्याण उपायुक्त मंगेश वानखेडे, समाजकल्याण अधिकारी मिलिंद रामटेके व इतर मान्यवर उपस्थित होते. प्रा. श्याम मानव पुढे म्हणाले, मला प्राध्यापक बनण्यात रस होता. कारण ज्ञानार्जन करून विद्यार्थ्यांचे चांगले जीवन घडवावे, असे वाटत होते. परंतु मी अपघाताने पत्रकार झालो. १५ वर्षे पत्रकारिता केली. तीन वर्षे प्राध्यापकाची नोकरी केली. पुणे येथे दोन वर्षे प्राध्यापक असताना बुद्धिप्रामाण्यवादाचा चांगलाच अनुभव घेतला. किर्लोस्कर प्रेसमध्ये नोकरी करीत असताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर व वीर सावरकर यांच्या साहित्यांचे अध्ययन करण्याची संधी मिळाली. साप्ताहिकांचाही अनुभव घेतला. या सर्व अध्ययनामुळे मी पार बदलून गेलो. अंधश्रद्धा व चमत्कार यांचे जगात अस्तित्वच नसून लोकांना लुबाडण्यासाठी आबा-बाबा असे कृत्य दाखवितात, असा पक्का समज झाला. त्यानंतर आम्ही बाबागिरीचे आॅपरेशन्स करायला सुरूवात केली व त्या बरोबरच समाजजागृती करण्याचे व्रतही अंगिकारले. यानंतर त्यांनी जादुटोणाविरोधी कायद्यावर मार्गदर्शन केले. ते म्हणाले, थोडक्यात या कायद्याला जादुटोणाविरोधी कायदा म्हटले जाते. हा कायदा प्रथम १६ डिसेंबर २००५ रोजी नागपूर हिवाळी अधिवेशनात विधानसभेत पारित झाला. २६ आॅगस्ट २०१३ रोजी या कायद्याचा अध्यादेश निघाला. १३ डिसेंबर २०१३ रोजी विधानसभेत व २० डिसेंबर २०१३ रोजी विधान परिषदेत संमत होवून या अध्यादेशाचे रूपांतर कायम कायद्यात झाले. या अधिनियमास महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादुटोणा यांना प्रतिबंध घालण्याबाबत व त्यांचे समूळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम २०१३ असे म्हणतात. अंधश्रद्धेने फसवणूक करून कुणी लोकांची लुबाडणूक करीत असेल तर तो गुन्हा ठरतो. दोष सिद्ध झाल्यावर सहा महिने कारावास व पाच हजार रूपये दंड ते सात वर्षे कारावास व ५० हजार रूपये दंड ठोठावला जातो. अंधश्रद्धेचा प्रचार-प्रसार करणे व त्यासाठी सहकार्य करणारेसुद्धा या कायद्यान्वये गुन्हेगार ठरतात. भूत उतरविण्याच्या बहाण्याने त्या व्यक्तीला शारीरिक त्रास देणे आदी अनेक बाबी दंडनिय असल्याचे सांगून त्यांनी जगात पसरलेला बौद्ध धर्म व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा बौद्ध धम्म यातील फरक स्पष्ट केला. बाबासाहेबांचा मार्ग अंधश्रद्धाविरोधी, विज्ञानाधिष्ठित व मानविय असल्याचे त्यांनी सांगितले.यानंतर विविध शासकीय विभागातील अधिकाऱ्यांनी लोकोपयोगी योजनांची माहिती दिली. जि.प. चे पशुसंवर्धन अधिकारी चव्हाण यांनी पशुसंवर्धनाबाबत योजनांची माहिती दिली. कृषी विभाग, शिक्षण विभाग, समाजकल्याण विभाग, विविध महामंडळातील योजनांची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली. प्रास्ताविक समाजकल्याण सहायक आयुक्त मंगेश वानखेडे यांनी, संचालन प्रा. सविता बेदरकर यांनी तर आभार जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे यांनी मानले. (प्रतिनिधी)