शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
2
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
3
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
4
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
5
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
6
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
7
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
8
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
9
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
10
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
11
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
12
निमिषा प्रियासाठी सरकार जनतेकडून ८ कोटी मागत आहे? परराष्ट्र मंत्रालयाने सत्य सांगितले
13
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
14
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार
15
काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली?
16
ऑनलाइन बेटिंग आता दंडनीय गुन्हा, केंद्रीय मंत्रिमंडळाचा गेमिंग विधेयकाला हिरवा कंदील
17
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
18
Viral Video : तरुणीने ट्रक चालकाशी बांधली लग्नगाठ; स्वतः सांगितलं भन्नाट कारण! व्हिडीओ होतोय व्हायरल
19
KBC च्या हॉट सीटवर अमिताभ बच्चन यांच्यासोबत खेळण्याची सुवर्णसंधी! BHIM App वर अशी करा नोंदणी
20
पत्नीचा संशयास्पद मृत्यू, अनेक महिलांशी संबंध...निळ्या ड्रम प्रकरणातील आरोपी प्रियकराचा 'कारनामा'

वाचन संस्कृती जोपासा

By admin | Updated: March 24, 2015 02:01 IST

कादंबरी, आत्मकथा, कथा-कथन, महापुरूषांचे चरित्र आदि पुस्तकांचे वाचन केले पाहिजे. वाचनाने माणूस मोठा

ग्रंथोत्सव २०१५ ला सुरूवात : ज्येष्ठ साहित्यिक हरिश्चंद्र बोरकरांचा उपदेशगोंदिया : कादंबरी, आत्मकथा, कथा-कथन, महापुरूषांचे चरित्र आदि पुस्तकांचे वाचन केले पाहिजे. वाचनाने माणूस मोठा होत असतो. पुस्तकांचे वाचन कराल तेवढेच ज्ञान वाढत जाईल. ग्रंथ हे गुरू आहेत. ग्रंथोत्सवात येणाऱ्या ग्रंथाच्या माध्यमातून वाचन संस्कृती जोपासावी, असे मत झाडीबोलीचे ज्येष्ठ साहित्यिक डॉ. हरिश्चंद्र बोरकर यांनी व्यक्त केले. मराठी भाषा विभाग महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, जिल्हा माहिती कार्यालय, जिल्हा शासकीय ग्रंथालय आणि श्री शारदा वाचनालय गोंदिया यांच्या संयुक्त विद्यमाने श्री शारदा वाचनालयाच्या बजाज सांस्कृतिक सभागृहात सोमवारी (दि.२३) गोंदिया ग्रंथोत्सव-२०१५ चे उद्घाटन डॉ.बोरकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी उपविभागीय अधिकारी के.एन.राव, कवयित्री अंजनाबाई खुणे, शारदा वाचनालयाचे सचिव जगदिश मिश्रा, ग्रंथपाल शिव शर्मा यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ. बोरकर पुढे म्हणाले, जिल्ह्यात ग्रंथोत्सवाचे आयोजन करणे हा एक स्तुत्य उपक्रम आहे. ग्रंथ व पुस्तके वाचनाच्या सवयीमुळे माणसाची स्वत:ची ओळख निर्माण होते. आजही वाचक वर्ग आहे म्हणून साहित्य लोकांपर्यंत पोहोचविण्याचे काम केले पाहिजे. विज्ञानाने जे दिले आहे त्याचा सदुपयोग करून घ्यावा. आपल्या आयुष्याचा महत्वाचा वेळ वाया घालवू नये. प्रत्येकाने नेहमी कामकाजाशी निगडीत राहावे. आज लेखकांची संख्या निश्चितच वाढली आहे. परंतु असे लिहा की, ज्याला मूल्य आहे. पुस्तकांचे जतन केले पाहिजे. ग्रंथाच्या माध्यमातून वाचन संस्कृती वाढवा असे आवाहनही त्यांनी याप्रसंगी केले.प्रमुख अतिथी म्हणून बोलताना एसडीओ राव म्हणाले, ग्रंथोत्सवाच्या माध्यमातून आपल्याला एकाच ठिकाणी सर्वप्रकारची पुस्तके पहायला मिळतात. ग्रंथाचे जीवनात अनन्यसाधारण महत्व आहे. ग्रंथ व पुस्तके वाचनामुळे व्यक्तीची विचारशक्ती वाढते. आजच्या परिस्थितीत वाचन ही काळाची गरज आहे. प्रत्येकाने वाचनाची सवय लावली पाहिजे. ग्रंथाचे महत्व जनतेला माहित झाले पाहिजे असेही त्यांनी यावेळी सांगितले. झाडीबोलीच्या साहित्यिक अंजनाबाई खुणे म्हणाल्या, जेवढे वाचन कराल तेवढे आपले ज्ञान वाढेल, कुंभार जसा मडकी घडवितो तसे आपण आपल्या मुलांना संस्कार द्यावे, त्यांना घडवावे. प्रास्ताविकातून जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे यांनी गोंदिया ग्रंथोत्सव-२०१५ चे आयोजनाबाबत सविस्तर माहिती विशद केली. ते म्हणाले विद्यार्थ्यांमध्ये जास्तीत जास्त वाचनाची गोडी निर्माण व्हावी. वाचन चळवळ अधिकाधिक मजबूत झाली पाहिजे हा यामागचा उद्देश आहे. या गोंदिया ग्रंथोत्सवाला भेट देवून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी पुस्तके विकत घ्यावी असे आवाहन ही त्यांनी यावेळी केले. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते शहिद भगतसिंह यांच्या स्मृती दिनानिमित्त व ग्रंथालयाचे जनक डॉ. एस.रंगनाथक यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलन करण्यात आले. तसेच ग्रंथोत्सवात लावलेल्या पुस्तकांच्या स्टॉलचे फित कापून मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. संचालन माहिती सहायक पल्लवी धारव यांनी केले तर उपस्थितांचे आभार जिल्हा ग्रंथालय अधिकारी खुमेंद्र बोपचे यांनी मानले. (जिल्हा प्रतिनिधी)गोंदियाकरांचा थंड प्रतिसादमूळातच वाचन संस्कृतीचा अभाव असलेल्या व्यापार नगरी गोंदियात या ग्रंथोत्सवाबद्दल जिव्हाळा आणि औत्सुक्य असणारे फारच कमी लोक आहेत. त्यातही हा कार्यक्रम केवळ मराठी वाचक-श्रोत्यांसाठी असल्याचे समजून अनेकांनी या ग्रंथ प्रदर्शनाला उपस्थित न राहणेच पसंत केले. परिसंवादाच्या वेळी गोंदियातील चोखंदळ वाचक, श्रोत्यांची कमतरता दिसून आली. यामुळे उपस्थित पाहुण्यांच्या चेहऱ्यावरही गोंदिया खरोखरच व्यापार नगरी असल्याचे पटल्याचे भाव दिसत होते.