शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

एसटीसह जीपगाड्याही ्रप्रवाशांनी फुल्ल

By admin | Updated: October 19, 2014 23:40 IST

रोजगाराच्या शोधात मोठ्या शहरांमध्ये जाणारी मंडळी दिवाळीसाठी गावाकडे परतत असल्याने सध्या रेल्वे, एसटी बसगाड्यांसह खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या गाड्याही सेवा देण्यात कमी पडत आहेत.

गोंदिया : रोजगाराच्या शोधात मोठ्या शहरांमध्ये जाणारी मंडळी दिवाळीसाठी गावाकडे परतत असल्याने सध्या रेल्वे, एसटी बसगाड्यांसह खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या गाड्याही सेवा देण्यात कमी पडत आहेत. त्यामुळे क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक होऊन अपघाताचा धोका निर्माण होत आहे.दिवाळीची चाहूल लागल्याने परप्रांतात कामानिमीत्त जाणारा मजुरांचा लोंढा गावाकडे परतू लागला आहे. शिवाय शाळा व महाविद्यालयांनाही सुट्या लागल्याने विद्यार्थी दिवाळी साजरी करण्यासाठी आपल्या घरी परत येत आहेत. यामुळे प्रवासी वाहनं आता कमी पडू लागले आहेत. दिवाळीची गर्दी पाहता गोंदिया आगारातून दररोज होत असलेल्या फेऱ्या वाढविण्याची पाळी आगारावर आल आहे. विशेषत: गोंदिया जिल्ह्यातील बहुतांश मजूर नागपूर, पुणे शहरात कामाला जातात. ते दिवाळीनिमित्त गावाला परत येत असल्याने सायंकाळच्या वेळी मोठ्या संख्येत प्रवासी संख्या वाढत आहे. दिवाळीचा सण साजरा करण्यासाठी रेल्वेमार्गाने गोंदियात येणाऱ्यांची संख्या फुलली आहे. गोंदिया शहरात विविध कार्यालयांमध्ये असलेले कर्मचारी दिवाळीसाठी स्वगावी जात असल्याने रेल्वे स्थानकावर एकच गर्दी दिसून येत आहे. तर प्रवासी संख्या वाढून रेल्वे गाड्या खचाखच भरून जात आहेत. विशेष म्हणजे रेल्वे स्थानकावर उतरल्यानंतर ग्रामीण भागात जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे रेल्वे स्थानकावरून त्यांना आपल्या गावापर्यंत जाण्यासाठी प्रवासी वाहनांतून जावे लाहेत. याचाच फायदा घेत प्रवासी वाहन चांलकाची दिवाळी जोमात दिसून येत आहे. प्रवाश्यांना ग्रामीण भागात जाण्यासाठी शहरातील खासगी वाहनेही तुडूंब भरून वाहतूक करीत असल्याचे दिसून येत आहे. शहराच्या बालाघाट रस्त्यावर तिरोडा बसस्थानक व जयस्तंभ चौकातून ग्रामीण भागात धावणारी काळीपिवळी वाहने प्रवासी वाहतुक करताना सर्व नियम धाब्यावर ठेऊन प्रवाश्यांची वाहतूक करीत असल्याचेही बघावयास मिळते. ज्या काळी-पिवळीना नऊ अधिक एकचे परमीट आहेत त्या वाहनांतून सध्या क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी डांबून वाहतूक केली जात आहे. दिवाळीच्या सणाला आपआपल्या घराची वाट धरणारे प्रवासी जीव मुठीत घालून काळी-पिवळीतून प्रवास करतानाचे चित्र सध्या दिसत आहे.२१ आॅक्टोबर रोजी धनत्रयोदशी हा दिवाळीचा हिला दिवस येत आहे. म्हणजेच आता नेमका एकच दिवस उरला असून बाहेरगावची मंडळी आपापल्या घराकडची वाट धरू लागली आहे. दिवाळी हिंदू धर्मीयांचा सर्वात मोठा व महत्वाचा सण असल्याने वर्ष भर घराकडे न फिरकणारेही दवाळी आपल्या परिवारासह साजरा करण्यासाठी आवर्जून आपल्या घरी पोहचतात. अशांची संख्या मोठी असून याचे मूर्त उदाहरण सध्या रेल्वे, एसटी व प्रवासी वाहनांतील गर्दीमधून बघावयास मिळत आहे. यामुळे यंदा दिवाळीनंतर एसटीच्या उत्पन्नात बरीच वाढ होणार आहे. भाऊबीजेला गर्दी वाढत असल्याने गोंदिया बस आगाराकडून दिवाळीनंतर बसेस वाढविल्या जातात. त्यानुसार यंदाही काहीना काही व्यवस्था केली जाईल. शिवाय खासगी प्रवासी वाहनांची मोठी संख्या असल्याने प्रवाशांना आल्या गंतव्य स्थानी जाण्यासाठी कोणताच त्रास होत नाही. यामुळेच एसटीसह जीपगाड्यांमध्ये प्रवाशांच गर्दी दिसून येत आहे.