शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
3
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
4
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
5
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
6
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
7
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
9
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
10
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
11
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
12
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
13
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
14
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
15
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
16
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
17
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
18
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
19
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
20
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...

एसटीसह जीपगाड्याही ्रप्रवाशांनी फुल्ल

By admin | Updated: October 19, 2014 23:40 IST

रोजगाराच्या शोधात मोठ्या शहरांमध्ये जाणारी मंडळी दिवाळीसाठी गावाकडे परतत असल्याने सध्या रेल्वे, एसटी बसगाड्यांसह खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या गाड्याही सेवा देण्यात कमी पडत आहेत.

गोंदिया : रोजगाराच्या शोधात मोठ्या शहरांमध्ये जाणारी मंडळी दिवाळीसाठी गावाकडे परतत असल्याने सध्या रेल्वे, एसटी बसगाड्यांसह खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या गाड्याही सेवा देण्यात कमी पडत आहेत. त्यामुळे क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक होऊन अपघाताचा धोका निर्माण होत आहे.दिवाळीची चाहूल लागल्याने परप्रांतात कामानिमीत्त जाणारा मजुरांचा लोंढा गावाकडे परतू लागला आहे. शिवाय शाळा व महाविद्यालयांनाही सुट्या लागल्याने विद्यार्थी दिवाळी साजरी करण्यासाठी आपल्या घरी परत येत आहेत. यामुळे प्रवासी वाहनं आता कमी पडू लागले आहेत. दिवाळीची गर्दी पाहता गोंदिया आगारातून दररोज होत असलेल्या फेऱ्या वाढविण्याची पाळी आगारावर आल आहे. विशेषत: गोंदिया जिल्ह्यातील बहुतांश मजूर नागपूर, पुणे शहरात कामाला जातात. ते दिवाळीनिमित्त गावाला परत येत असल्याने सायंकाळच्या वेळी मोठ्या संख्येत प्रवासी संख्या वाढत आहे. दिवाळीचा सण साजरा करण्यासाठी रेल्वेमार्गाने गोंदियात येणाऱ्यांची संख्या फुलली आहे. गोंदिया शहरात विविध कार्यालयांमध्ये असलेले कर्मचारी दिवाळीसाठी स्वगावी जात असल्याने रेल्वे स्थानकावर एकच गर्दी दिसून येत आहे. तर प्रवासी संख्या वाढून रेल्वे गाड्या खचाखच भरून जात आहेत. विशेष म्हणजे रेल्वे स्थानकावर उतरल्यानंतर ग्रामीण भागात जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे रेल्वे स्थानकावरून त्यांना आपल्या गावापर्यंत जाण्यासाठी प्रवासी वाहनांतून जावे लाहेत. याचाच फायदा घेत प्रवासी वाहन चांलकाची दिवाळी जोमात दिसून येत आहे. प्रवाश्यांना ग्रामीण भागात जाण्यासाठी शहरातील खासगी वाहनेही तुडूंब भरून वाहतूक करीत असल्याचे दिसून येत आहे. शहराच्या बालाघाट रस्त्यावर तिरोडा बसस्थानक व जयस्तंभ चौकातून ग्रामीण भागात धावणारी काळीपिवळी वाहने प्रवासी वाहतुक करताना सर्व नियम धाब्यावर ठेऊन प्रवाश्यांची वाहतूक करीत असल्याचेही बघावयास मिळते. ज्या काळी-पिवळीना नऊ अधिक एकचे परमीट आहेत त्या वाहनांतून सध्या क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी डांबून वाहतूक केली जात आहे. दिवाळीच्या सणाला आपआपल्या घराची वाट धरणारे प्रवासी जीव मुठीत घालून काळी-पिवळीतून प्रवास करतानाचे चित्र सध्या दिसत आहे.२१ आॅक्टोबर रोजी धनत्रयोदशी हा दिवाळीचा हिला दिवस येत आहे. म्हणजेच आता नेमका एकच दिवस उरला असून बाहेरगावची मंडळी आपापल्या घराकडची वाट धरू लागली आहे. दिवाळी हिंदू धर्मीयांचा सर्वात मोठा व महत्वाचा सण असल्याने वर्ष भर घराकडे न फिरकणारेही दवाळी आपल्या परिवारासह साजरा करण्यासाठी आवर्जून आपल्या घरी पोहचतात. अशांची संख्या मोठी असून याचे मूर्त उदाहरण सध्या रेल्वे, एसटी व प्रवासी वाहनांतील गर्दीमधून बघावयास मिळत आहे. यामुळे यंदा दिवाळीनंतर एसटीच्या उत्पन्नात बरीच वाढ होणार आहे. भाऊबीजेला गर्दी वाढत असल्याने गोंदिया बस आगाराकडून दिवाळीनंतर बसेस वाढविल्या जातात. त्यानुसार यंदाही काहीना काही व्यवस्था केली जाईल. शिवाय खासगी प्रवासी वाहनांची मोठी संख्या असल्याने प्रवाशांना आल्या गंतव्य स्थानी जाण्यासाठी कोणताच त्रास होत नाही. यामुळेच एसटीसह जीपगाड्यांमध्ये प्रवाशांच गर्दी दिसून येत आहे.