शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
2
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
3
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
4
टॉपर तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार; स्वतःला संपवायला निघालेल्या माय-लेकीला माजी सैनिकाने वाचवलं
5
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
6
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
7
भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर 
8
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
9
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
10
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
11
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
12
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
13
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
14
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
15
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी
16
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
17
४८ तासांत मंजूर झाले कोट्यवधींचे कर्ज ! भंडारा, नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घोटाळा; ईडीकडून कारवाईचा धडाका
18
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
19
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
20
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल

जेसीबीने कालवा फोडून वळविले जात आहे पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2020 05:00 IST

रब्बी हंगामातील हलक्या धानाची कापणी सध्या सुरु आहे. तर काही शेतकऱ्यांनी जड प्रतीचा धान लावला असून त्याला एका पाण्याची गरज आहे. यासाठी गोरेगाव तालुक्यातील कलपाथरी प्रकल्पाचे पाणी मुख्य कालव्याव्दारे सोडण्यात आले आहे. शेतकऱ्यांच्या धान पिकासासाठीच हे पाणी सोडण्यात आले असून त्यांच्या शेतापर्यंत पाणी पोहचण्याची व्यवस्था करुन देण्यात आली आहे.

ठळक मुद्देबबई येथील प्रकार : कलपाथरी प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष, शेतकऱ्यांचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात रब्बी आणि उन्हाळी धानासाठी सध्या कालव्याव्दारे पाणी सोडले जात आहे. याच अंतर्गत गोरेगाव तालुक्यातील कलपाथरी प्रकल्पाच्या मुख्य कालव्याला पाणी सोडण्यात आले असून बबई येथील २ शेतकऱ्यांनी आपल्या शेतात पाणी नेण्यासाठी जेसीबीव्दारे कालवा फोडल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यामुळे इतर शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होत आहे. मात्र या प्रकाराकडे कलपाथरी प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष असल्याचे चित्र आहे.रब्बी हंगामातील हलक्या धानाची कापणी सध्या सुरु आहे. तर काही शेतकऱ्यांनी जड प्रतीचा धान लावला असून त्याला एका पाण्याची गरज आहे. यासाठी गोरेगाव तालुक्यातील कलपाथरी प्रकल्पाचे पाणी मुख्य कालव्याव्दारे सोडण्यात आले आहे. शेतकऱ्यांच्या धान पिकासासाठीच हे पाणी सोडण्यात आले असून त्यांच्या शेतापर्यंत पाणी पोहचण्याची व्यवस्था करुन देण्यात आली आहे.मात्र कलपाथरी मुख्य कालव्या अंतर्गत शेती असणाऱ्या ग्राम बबई येथील २ शेतकऱ्यांनी आपल्या शेतापर्यंत पाणी नेण्यासाठी चक्क जेसीबीने कालवा फोडून कालव्यातील पाणी नेत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.या २ शेतकऱ्यांनी कालव्याला जेसीबीव्दारे मोठी खांड पाडली आहे. हे सर्व करीत असताना संबंधित शेतकऱ्यांनी यासाठी कलपाथरी प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांची परवानगी घेतली नसल्याची माहिती आहे. दरम्यान प्रकारामुळे इतर शेतकऱ्यांचे नुकसान होत असल्याने त्यांनी याला विरोध केला. तसेच याची तक्रार सुध्दा संबंधित विभागाकडे केली आहे. मात्र संबंधित विभागाने याची अद्यापही दखल घेतली नाही. मात्र अन्य शेतकऱ्यांचे पाण्याअभावी धोक्यात आल्याने शेतकºयांमध्ये अधिकाºयांच्या कर्तव्य तत्परतेप्रती संतापाचे वातावरण आहे.कलपाथरी प्रकल्पाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन शेतकºयांचे होणारे नुकसान टाळावे तसेच नियमबाह्यपणे कालवा फोडणाऱ्या २ शेतकऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाई