शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक निर्णय! देशात चार नवे कामगार कायदे तात्काळ लागू; २९ जुने कायदे रद्द, श्रम धोरणाला आधुनिक स्वरूप
2
धक्कादायक! पत्नीने प्रियकरासाठी लग्नाच्या सातव्या दिवशी पतीची हत्या केली
3
बिहारमध्ये भाजपाचा डाव! नितीश कुमारांना मुख्यमंत्रीपद दिलं पण, गृहमंत्रीपद BJP कडे ठेवले, २० वर्षांनंतर गृह खाते सोडले
4
कर्नाटकच्या राजकारणात खळबळ! "सर्व १४० आमदार माझ्यासोबत", डी. के. शिवकुमार यांचे थेट विधान
5
तुम्हाला तुमची गाडी खूपच प्यारी आहे...! २० वर्षांहून जुन्या वाहनांच्या फिटनेस टेस्ट शुल्कात १५ पट वाढ
6
फेस्टीव्ह संपला नाही तोच...! फ्लिपकार्ट 'ब्लॅक फ्रायडे सेल २०२५' ची तारीख ठरली, अमेझॉन थांबतेय होय...
7
'G-20 मध्ये सामील होणार नाही', डोनाल्ड ट्रम्प दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्राध्यक्षांवर नाराज, कारण...
8
जॉब, इन्व्हेस्टमेंट, WFH च्या नावाने फ्रॉड; ऑपरेशन CyHawk अंतर्गत ४८ तासांत ८७७ जणांना अटक
9
Tejas Fighter Jet Crashed : भारताचे लढाऊ विमान तेजस कोसळले, पायलटचा मृत्यू; दुबई एअर शो दरम्यान मोठी दुर्घटना
10
भाजपा-शिंदे गटात वाद, चंद्रशेखर बावनकुळे थेट बोलले; म्हणाले, “कारवाई करू, आमचे संस्कार...”
11
Travel : अवघ्या ३ दिवसात फिरता येईल 'हा' सुंदर देश; भारताचे १०००० होतील तब्बल ५८०००! फिरण्यासाठी बेस्ट
12
"बँक खात्यात ५ लाख आले, तरीही म्हणाला आणखी पैसे लागतील"; डॉ. आदिलच्या whatsApp चॅटमध्ये काय काय?
13
केरळ, यूपीसह अनेक राज्यात SIR ला आव्हान; सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला मागितले उत्तर...
14
मोठी बातमी! इस्रायलचे पंतप्रधान बेजामिन नेतान्याहून भारत दौऱ्यावर येणार, जुनी दोस्ती आणखी घट्ट होणार
15
Local Body ELection: दोंडाईचा नगरपालिका निवडणुकीत भाजपचा ऐतिहासिक विजय, नगराध्यक्ष आणि सर्वच २६ नगरसेवक बिनविरोध!
16
स्लीपर वंदे भारत देशभर फिरवली, ट्रायलनंतर परत पाठवली; ५ फॉल्ट समोर आले, लोकार्पण लांबणार?
17
रात्री लाईट ऑन करून झोपण्याची सवय असेल तर आताच बदला, आरोग्याचं होईल मोठं नुकसान
18
IND A vs BAN A 1st Semi Final : १२ चेंडूत ५० धावा! बांगलादेशनं भारतीय संघासमोर ठेवलं मोठं टार्गेट
19
ना थांबा, ना विश्रांती… गरुडाचा ६१०० किलोमीटर प्रवास थक्क करणारा; आशियातून आफ्रिकेत ६ दिवसांत पोहोचला
20
पाच वर्ष लपूनछपून डेटिंग, मग भरमैदानात प्रपोज... अशी फुलली स्मृती मंधाना-पलाशची Love Story
Daily Top 2Weekly Top 5

जेसीबीने कालवा फोडून वळविले जात आहे पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2020 05:00 IST

रब्बी हंगामातील हलक्या धानाची कापणी सध्या सुरु आहे. तर काही शेतकऱ्यांनी जड प्रतीचा धान लावला असून त्याला एका पाण्याची गरज आहे. यासाठी गोरेगाव तालुक्यातील कलपाथरी प्रकल्पाचे पाणी मुख्य कालव्याव्दारे सोडण्यात आले आहे. शेतकऱ्यांच्या धान पिकासासाठीच हे पाणी सोडण्यात आले असून त्यांच्या शेतापर्यंत पाणी पोहचण्याची व्यवस्था करुन देण्यात आली आहे.

ठळक मुद्देबबई येथील प्रकार : कलपाथरी प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष, शेतकऱ्यांचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात रब्बी आणि उन्हाळी धानासाठी सध्या कालव्याव्दारे पाणी सोडले जात आहे. याच अंतर्गत गोरेगाव तालुक्यातील कलपाथरी प्रकल्पाच्या मुख्य कालव्याला पाणी सोडण्यात आले असून बबई येथील २ शेतकऱ्यांनी आपल्या शेतात पाणी नेण्यासाठी जेसीबीव्दारे कालवा फोडल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यामुळे इतर शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होत आहे. मात्र या प्रकाराकडे कलपाथरी प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष असल्याचे चित्र आहे.रब्बी हंगामातील हलक्या धानाची कापणी सध्या सुरु आहे. तर काही शेतकऱ्यांनी जड प्रतीचा धान लावला असून त्याला एका पाण्याची गरज आहे. यासाठी गोरेगाव तालुक्यातील कलपाथरी प्रकल्पाचे पाणी मुख्य कालव्याव्दारे सोडण्यात आले आहे. शेतकऱ्यांच्या धान पिकासासाठीच हे पाणी सोडण्यात आले असून त्यांच्या शेतापर्यंत पाणी पोहचण्याची व्यवस्था करुन देण्यात आली आहे.मात्र कलपाथरी मुख्य कालव्या अंतर्गत शेती असणाऱ्या ग्राम बबई येथील २ शेतकऱ्यांनी आपल्या शेतापर्यंत पाणी नेण्यासाठी चक्क जेसीबीने कालवा फोडून कालव्यातील पाणी नेत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.या २ शेतकऱ्यांनी कालव्याला जेसीबीव्दारे मोठी खांड पाडली आहे. हे सर्व करीत असताना संबंधित शेतकऱ्यांनी यासाठी कलपाथरी प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांची परवानगी घेतली नसल्याची माहिती आहे. दरम्यान प्रकारामुळे इतर शेतकऱ्यांचे नुकसान होत असल्याने त्यांनी याला विरोध केला. तसेच याची तक्रार सुध्दा संबंधित विभागाकडे केली आहे. मात्र संबंधित विभागाने याची अद्यापही दखल घेतली नाही. मात्र अन्य शेतकऱ्यांचे पाण्याअभावी धोक्यात आल्याने शेतकºयांमध्ये अधिकाºयांच्या कर्तव्य तत्परतेप्रती संतापाचे वातावरण आहे.कलपाथरी प्रकल्पाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन शेतकºयांचे होणारे नुकसान टाळावे तसेच नियमबाह्यपणे कालवा फोडणाऱ्या २ शेतकऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाई