शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
2
पाकिस्तानमध्ये शिजला पहलगाम हल्ल्याचा कट, सहा जणांविरोधात १,५९७ पानांचे आरोपपत्र!
3
इंडिगो गोंधळाबाबतच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागण्याचे आदेश
4
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
5
ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला
6
संपादकीय : यत्र, तत्र, पाकिस्तान सर्वत्र! ऑस्ट्रेलियातील हल्ल्याचे पाकिस्तानी कनेक्शन
7
...जेव्हा गुंडच पोलिसांच्या कॉलरला हात घालतात; कांदिवलीत ५ अटकेत
8
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
9
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
10
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
11
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
12
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
13
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
14
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
15
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
16
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
17
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
18
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
19
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
20
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
Daily Top 2Weekly Top 5

इटियाडोह विकासाच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2017 23:21 IST

अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील इटियाडोह जलाशय हे जिल्ह्याच्या पर्यटन स्थळांपैकी एक महत्त्वाचे स्थळ म्हणून ओळखले जाते. या जलाशयाच्या चारही बाजूने हिरवागार शालू परिधान करुन उभ्या असलेल्या पर्वत रांगा आणि त्यामध्ये इटियाडोह जलाशयाची निर्मिती झाली आहे.

ठळक मुद्देसुविधांकडे शासनाचे दुर्लक्ष : लोकसहभागातून श्रमदानाचा संकल्प

लोकमत न्यूज नेटवर्ककेशोरी : अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील इटियाडोह जलाशय हे जिल्ह्याच्या पर्यटन स्थळांपैकी एक महत्त्वाचे स्थळ म्हणून ओळखले जाते. या जलाशयाच्या चारही बाजूने हिरवागार शालू परिधान करुन उभ्या असलेल्या पर्वत रांगा आणि त्यामध्ये इटियाडोह जलाशयाची निर्मिती झाली आहे. हे पर्यटकांसाठी अत्यंत मनमोहक व आकर्षित करणारे स्थळ आहे. परंतु या स्थळाकडे शासनाचे दुर्लक्ष होत असल्याने अनेक सोईसुविधांपासून हे स्थळ वंचित आहे.अनेकदा वर्तमानपत्रामधून येथील सोयीसुविधांच्या अभावाकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र शासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे. यासाठी श्रीधर हटवार यांच्या नेतृत्वात या परिसरातील तरुण उत्साही मंडळी एकत्र येवून त्यांनी इटियाडोह परिसर विकास मंच स्थापन केला. तसेच दर रविवारी लोकसहभागातून श्रमदानाच्या माध्यमातून या परिसराचा विकास करण्याचा संकल्प करुन ठराव पारित करण्यात आला.या परिसराकडे शासनाचे पर्यायाने इटियाडोह प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची सुविधा नाही. नळ योजना बंद पडली आहे. विद्युत सुविधा नाही, विद्युत पोल आहेत, परंतु दिवे बंद आहेत. विश्रामगृहामधील फ्रीज बंद आहे. पर्यटकांसाठी हॉटेल व जेवणाची व्यवस्था नाही. वाहन पार्किंगची व्यवस्था नाही. येथील बगिचा सौंदर्यीकरणाच्या प्रतीक्षेत आहे. या महत्वाच्या असुविधांमुळे पर्यटकांची गैरसोय व निराशा होत आहे.ही बाब लक्षात घेवून शासनाचे लक्ष वेधण्यासाठी योगेश नाकाडे, चेतन दहीकर, श्रीधर हटवार यांच्या नेतृत्वात इटियाडोह जलाशय परिसर विकास मंच तयार करण्यात आला. लोकसहभागाच्या माध्यमातून श्रमदान करुन रविवार (दि.२४) पाणी विसर्ग मुख्य गेट ते ओवर फ्लोपर्यंतच्या पाळीवरील वाढलेल्या झाडझुडपांची कापणी करुन स्वच्छता अभियान राबविण्यात आले.यामध्ये प्रामुख्याने राजे ग्रुप अर्जुनी-मोरगावसह योगेश नाकाडे, चेतन दहीकर, श्रीधर हटवार, सचिन फटींग, गुणवंत पेशने, सुनील बांते, आशीष डोंगरवार, प्रशांत डोंगरवार, मिथुन टेंभरे, हितेश हलमारे, लिलाधर निर्वाण, कांतीलाल डोंगरवार, सतीश शहारे, चंदू बोरकर, हर्ष हलमारे यांचा प्रामुख्याने सहभाग होता.या वेळी परिसरातील १०० कार्यकर्त्यांच्या उपस्थित स्वच्छता अभियान यशस्वीपणे राबविण्यात आले. यानंतर शासनाची कोणतीही मदत न घेता स्वतंत्र निधी उभारुन अत्यंत आवश्यक असणारी कामे हाती घेवून पूर्ण करण्याचा संकल्प घेण्यात आल्याचे लोकमतला सांगण्यात आले.