शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

इटियाडोह विकासाच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2017 23:21 IST

अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील इटियाडोह जलाशय हे जिल्ह्याच्या पर्यटन स्थळांपैकी एक महत्त्वाचे स्थळ म्हणून ओळखले जाते. या जलाशयाच्या चारही बाजूने हिरवागार शालू परिधान करुन उभ्या असलेल्या पर्वत रांगा आणि त्यामध्ये इटियाडोह जलाशयाची निर्मिती झाली आहे.

ठळक मुद्देसुविधांकडे शासनाचे दुर्लक्ष : लोकसहभागातून श्रमदानाचा संकल्प

लोकमत न्यूज नेटवर्ककेशोरी : अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील इटियाडोह जलाशय हे जिल्ह्याच्या पर्यटन स्थळांपैकी एक महत्त्वाचे स्थळ म्हणून ओळखले जाते. या जलाशयाच्या चारही बाजूने हिरवागार शालू परिधान करुन उभ्या असलेल्या पर्वत रांगा आणि त्यामध्ये इटियाडोह जलाशयाची निर्मिती झाली आहे. हे पर्यटकांसाठी अत्यंत मनमोहक व आकर्षित करणारे स्थळ आहे. परंतु या स्थळाकडे शासनाचे दुर्लक्ष होत असल्याने अनेक सोईसुविधांपासून हे स्थळ वंचित आहे.अनेकदा वर्तमानपत्रामधून येथील सोयीसुविधांच्या अभावाकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र शासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे. यासाठी श्रीधर हटवार यांच्या नेतृत्वात या परिसरातील तरुण उत्साही मंडळी एकत्र येवून त्यांनी इटियाडोह परिसर विकास मंच स्थापन केला. तसेच दर रविवारी लोकसहभागातून श्रमदानाच्या माध्यमातून या परिसराचा विकास करण्याचा संकल्प करुन ठराव पारित करण्यात आला.या परिसराकडे शासनाचे पर्यायाने इटियाडोह प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची सुविधा नाही. नळ योजना बंद पडली आहे. विद्युत सुविधा नाही, विद्युत पोल आहेत, परंतु दिवे बंद आहेत. विश्रामगृहामधील फ्रीज बंद आहे. पर्यटकांसाठी हॉटेल व जेवणाची व्यवस्था नाही. वाहन पार्किंगची व्यवस्था नाही. येथील बगिचा सौंदर्यीकरणाच्या प्रतीक्षेत आहे. या महत्वाच्या असुविधांमुळे पर्यटकांची गैरसोय व निराशा होत आहे.ही बाब लक्षात घेवून शासनाचे लक्ष वेधण्यासाठी योगेश नाकाडे, चेतन दहीकर, श्रीधर हटवार यांच्या नेतृत्वात इटियाडोह जलाशय परिसर विकास मंच तयार करण्यात आला. लोकसहभागाच्या माध्यमातून श्रमदान करुन रविवार (दि.२४) पाणी विसर्ग मुख्य गेट ते ओवर फ्लोपर्यंतच्या पाळीवरील वाढलेल्या झाडझुडपांची कापणी करुन स्वच्छता अभियान राबविण्यात आले.यामध्ये प्रामुख्याने राजे ग्रुप अर्जुनी-मोरगावसह योगेश नाकाडे, चेतन दहीकर, श्रीधर हटवार, सचिन फटींग, गुणवंत पेशने, सुनील बांते, आशीष डोंगरवार, प्रशांत डोंगरवार, मिथुन टेंभरे, हितेश हलमारे, लिलाधर निर्वाण, कांतीलाल डोंगरवार, सतीश शहारे, चंदू बोरकर, हर्ष हलमारे यांचा प्रामुख्याने सहभाग होता.या वेळी परिसरातील १०० कार्यकर्त्यांच्या उपस्थित स्वच्छता अभियान यशस्वीपणे राबविण्यात आले. यानंतर शासनाची कोणतीही मदत न घेता स्वतंत्र निधी उभारुन अत्यंत आवश्यक असणारी कामे हाती घेवून पूर्ण करण्याचा संकल्प घेण्यात आल्याचे लोकमतला सांगण्यात आले.