शहरं
Join us  
Trending Stories
1
'तुला तुरुंगामध्ये टाकेन हा, मी तुला सांगतोय'; अजित पवारांच्या संतापाचा कडेलोट, दीड कोटींच्या उधारीचं प्रकरण काय?
2
PM मोदींच्या 'X' पोस्टने पाकिस्तानचे मंत्री मोहसिन नकवी अन् ख्वाजा आसिफचा 'थयथयाट', म्हणाले...
3
Ahilyanagar: मुस्लीम धर्मगुरूंचे नाव रस्त्यावर लिहून विटंबना; अहिल्यानगरमध्ये तणाव, 'रास्ता रोको'नंतर लाठीचार्ज
4
IND vs PAK : क्रिकेटमध्ये राजकारण आणणारा तू पहिला कॅप्टन! सूर्यानं पाक पत्रकाराला असा दिला रिप्लाय (VIDEO)
5
'अगदी बरोबर केलं...!'; पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्या विनय नरवाल यांचे वडील टीम इंडियावर खुश!
6
आता टीम इंडियाला मिळणार नाही आशिया चषकाची ट्रॉफी? काय आहे ICCचा नियम, जाणून घ्या
7
जन्मदातीने सोडलं, परदेशी जोडप्यानं सांभाळलं; ३८ वर्षांनी स्वित्झर्लंडची नताशा मुंबईत, खऱ्या आईला भेटली
8
भारताविरोधात लढत होता पाकिस्तानी नेव्हीचा अधिकारी, खेळलाही...; पण गुडघे टेकत पराभूत झाला...
9
ज्यांनी भावाची चौकशी केली नाही, ते गावाची काय करणार; शिवाजी सावंतांचा तानाजी सावंतांवर आरोप
10
भारताने ट्रॉफी न घेतल्याचा भविष्यात त्रास होऊ शकतो; पाकिस्तानचा बालिश बहु माजी कर्णधार बडबडला... 
11
Sleep Tourism : नव्या ट्रेंडची भुरळ! फक्त शांत झोपेसाठी लोक करताहेत लांबचा प्रवास; काय आहे स्लीप टूरिझ्म?
12
अष्टमीच्या नैवेद्याला कांदा, लसूण न घालता करा काळ्या वाटण्याची चमचमीत उसळ, पुऱ्या आणि शिरा; खास टिप्स!
13
'सैयारा'नंतर अहान पांडेला लागला मोठा जॅकपॉट, दोन दिग्गज दिग्दर्शकाच्या सिनेमात लागली वर्णी
14
Tamil Nadu Stampede : "माझ्या डोळ्यांसमोरच जमावाने आईला चिरडलं, मी मदतीसाठी..."; महिलेने सांगितलं काय घडलं?
15
टीम इंडियाची ट्रॉफी पाकिस्तानच्या मोहसिन नक्वी यांनी चोरली; सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस
16
चीनच्या माजी मंत्र्यांनी भ्रष्टाचार करून अब्जावधी रुपये कमावले, आता न्यायालयाने दिली मृत्युदंडाची शिक्षा
17
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; Gold पुन्हा ऑल टाइम हायवर, चांदी २००० रुपयांनी वधारली
18
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना जिल्हाधिकाऱ्यांनी सुनावले; "तुम्ही किती किट आणले..."
19
आर्यनच्या सीरिजमध्ये पोलिसाच्या भूमिकेत दिसलेला अभिनेता कोण? समीर वानखेडेंच्या वादावर म्हणाला..
20
अमानवीय! तुमच्या म्हशी आमच्या शेतात चरायला येतात; शेतकऱ्याचा १२ म्हशींवर कुऱ्हाडीने वार...

साहित्यामुळे गोंडी संस्कृती जपणे शक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2017 00:25 IST

बदलत्या काळानुसार गोंडी संस्कृतीचा अनेकांना विसर पडला आहे. त्यांचे वाईट परिणाम सुद्धा समाजाला भोगावे लागतात.

ठळक मुद्देराजमाता फुलवादेवी : धनेगाव येथील भाषा संशोधन केंद्राला भेट

लोकमत न्यूज नेटवर्कसालेकसा : बदलत्या काळानुसार गोंडी संस्कृतीचा अनेकांना विसर पडला आहे. त्यांचे वाईट परिणाम सुद्धा समाजाला भोगावे लागतात. अशात गोंडी साहित्याच्या माध्यमातून गोंडी संस्कृतीचे जतन करणे शक्य होऊ शकते, असे प्रतिपादन राजमाता फुलवादेवी यांनी केले.धनेगाव येथील आंचलिक भाषा संशोधन केंद्राला भेट दिली असता त्यांनी आपले मत व्यक्त केले. त्या पुढे म्हणाल्या, गोंडी संस्कृतीला चिरकाळ टिकवून ठेवण्यासाठी गोंडी साहित्य मैलाचा दगड ठरणार आहे. या दिनेशे भाषा संशोधन केंद्र सुरू करुन उषाकिरण आत्राम आणि त्यांच्या सहकाºयांनी मोठी जबाबदारी हाती घेतली आहे. येणाºया काळात गोंडी संस्कृतीला जिवंत ठेवण्यासाठी व ती जोपासण्यासाठी गोंडी साहित्य सर्वात महत्वाची भूमिका पार पाडणार आहे, असे सांगीतले.राजमाता फुलवादेवी या मांझी सरकार सेनेच्या संचालिका असून दिल्ली येथील आंतरराष्टÑीय कार्यालयातून मांझी सेनेचे संचालन करतात. विदेशात त्यांची मांझी सरकार सेना जल, जंगल व जमिनीचे रक्षण करण्यासाठी सतत कार्य करीत आहे. नुकतेच राजमाता फुलवादेवी यांंनी कचारगडला (धनेगाव) भेट देवून मांझी सरकारच्या सैनिकांशी संपर्क केला. तसेच या भागात आदिवासींच्या विविध विषयांवर माहिती जाणून घेतली. या दरम्यान त्यांनी धनेगाव स्थित भाषा संशोधन केंद्राला भेट दिली व सुप्रसिद्ध लेखिका उषाकिरण आत्राम आणि त्यांचे पती गोंडवाना दर्शनचे संपादक सुन्हेरसिंह ताराम यांच्याशी विविध विषयांवर संवाद साधला.आदिवासींच्या बोलीभाषा, गोंडीभाषा, गोंडी शब्दकोष व इतर रचनेबद्दल चर्चा करीत ताराम दाम्प्त्याचे कौतुक केले. त्या म्हणाल्या, गोंडी शब्दकोष हा अत्यंत महत्वाचा दस्तावेज तयार झाल्यामुळे गोंडीभाषा शिकायला व समजायला इतरांना मदत होईल. यावेळी फुलवादेवी यांंनी भाषा, संस्कृती, परंपरा व पारंपरिक ठेवा याबद्दल सुन्हेरसिंग ताराम आणि उषाकिरण आत्राम यांच्यासोबत चर्चा केली. यावेळी त्यांचा मुलगा कुलदेव कांगे आणि मुलगी अ‍ॅड. राजकुमारी कांगे सोबत उपस्थित होते.१०५ वर्षांपूर्वी कंगला मांझी यांनी मांझी सेना गठित करुन जल, जंगल, जमीन व जीव वाचविण्याचा हेतूने मांझी सेवा सरकार चळवळ सुरू केली होती. पुढे फुलवादेवी यांनी ही चळवळ हाती घेतली व त्या चळवळीचे यशस्वी संचालन करीत आहेत.