शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी मराठी शिकणार नाही, काय करायचं ते करा.…’’, प्रसिद्ध व्यावसायिकाने राज ठाकरेंना डिवचले  
2
“कुठलीही ताकद ठाकरे ब्रँड संपवू शकणार नाही, दोघे भाऊ एकत्र येत असतील तर...”: सुप्रिया सुळे
3
ऑपरेशन सिंदूर: पाकिस्तान सीमेवर भारत एकाचवेळी तीन देशांशी लढत होता; उप लष्करप्रमुखांचा मोठा गौप्यस्फोट  
4
प्राडाला मोठा झटका! कोल्हापुरी चप्पलवरून थेट कोर्टात खेचले, वाचा काय घडले?
5
IND vs ENG: बॅटने कहर केल्यानंतर आता बॉलने इतिहास रचण्याची संधी, जाडेजाच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष!
6
तब्बल ५ लाख २१ हजार ३५४ विद्यार्थ्यांनी घेतला ‘ST पास थेट शाळेत’ योजनेचा लाभ: प्रताप सरनाईक
7
चीनच्या डावपेचात अडकला भारत? EV तयार करणाऱ्या कंपन्यांनी हात वर केले, आता पुढे काय?
8
विराट-रोहितच्या संदर्भात आली मोठी अपडेट; टीम इंडियाच्या चाहत्यांचा पुन्हा होणार 'मूड ऑफ'
9
श्रेया, भाऊ कोहिनूर हिरे पण 'तो' भंगारवाला? शरद उपाध्येंची ६ वर्षांपूर्वीची 'ती' पोस्ट व्हायरल
10
Ashadhi Ekadashi Vrat 2025: आषाढी एकादशीला 'अशी' करा विधिवत पूजा; जाणून घ्या नियम आणि शुभ मुहूर्त!
11
पाकिस्तानचा पाय आणखी खोलात! मायक्रोसॉफ्टने २५ वर्षांनी सोडला देश, कारण ऐकून बसेल धक्का!
12
पुणे बलात्कार प्रकरण: आरोपी तरुणीला आधीपासूनच ओळखत होता; पोलिसांकडून दोघांची चौकशी
13
राजकीय शेरेबाजी करणाऱ्यांना तालिका सभाध्यक्षपदी बसण्याचा अधिकार आहे का?; विरोधकांचा सवाल
14
"किती सुंदर व्यक्त झालायेस डॉक्टर, तू एक...", निलेश साबळेंच्या पोस्टवर प्रवीण तरडे काय म्हणाले?
15
रणबीरच्या 'रामा'ची RRRमधल्या रामचरणशी तुलना, 'रामायण'च्या टीझरनंतर चाहते म्हणतात- "प्रभू श्री रामांच्या भूमिकेसाठी..."
16
होम लोन घेण्याचा विचार करताय? ३ सरकारी बँकांनी कमी केले व्याजदर; पाहा कोणत्या बँकेत मिळतंय स्वस्त कर्ज
17
लेखः 'हिंदी सक्ती' टळली, पण त्याने मराठी भाषेवर आलेलं संकट टळेल? नेमकं कोण चुकतंय?
18
Ashadhi Ekadashi 2025: धर्मशास्त्रानुसार कसा करावा आषाढी एकादशीचा उपास? व्रतनियम वाचा!
19
केजरीवालांचा शीषमहल, तर रेखा गुप्तांचा 'मायामहल'; ९ लाखांचे टीव्ही, रिनोवेशनसाठी ६० लाखांचे टेंडर
20
हृदयद्रावक! खेळताना प्लास्टिकचा बॉल गिळला; दीड वर्षांच्या लेकीचा पालकांसमोर तडफडून मृत्यू

हे घोषणाबाजच नाही तर ‘घुमजाव’ सरकार

By admin | Updated: February 7, 2015 23:25 IST

जनतेची दिशाभूल करून केंद्रात आणि राज्यात भाजप सरकार सत्तारूढ झाले. राज्यात या घोषणाबाज सरकारने गेल्या १०० दिवसात एक तरी घोषणा अंमलात आणली का?

काँंग्रेसचा हल्लाबोल : जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले हजारों कार्यकर्ते व नागरिकगोंदिया : जनतेची दिशाभूल करून केंद्रात आणि राज्यात भाजप सरकार सत्तारूढ झाले. राज्यात या घोषणाबाज सरकारने गेल्या १०० दिवसात एक तरी घोषणा अंमलात आणली का? असा सवाल करीत हे घोषणाबाजच नाही तर ‘घुमजाव’ सरकार आहे, असा हल्ला काँग्रेसचे विधानसभेतील विरोधीपक्ष नेते आणि माजी कृषीमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला.जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आलेल्या मोर्चाप्रसंगी आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या या सभेला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, माजी मंत्री नितीन राऊत, आ.गोपालदास अग्रवाल, आ.सुनील केदार, माजी मंत्री भरत बहेकार, माजी आ.रामरतन राऊत, सेवक वाघाये, अशोक लंजे, अमर वऱ्हाडे, राजेश नंदागवळी, डॉ.योगेंद्र भगत, नामदेव किरसान आदी अनेक पदाधिकारी मंचावर उपस्थित होते.धान उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी १० हजार रुपये अनुदान द्या, कृषी उत्पादनाच्या हमीभावात वाढ करा, भूमी अधिग्रहण कायद्यात सुधारणा करणारा अध्यादेश परत घ्या, आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाचे भाव कमी झाल्याने पेट्रोल-डिझेलचे भाव कमी करा, गॅस पुरवठा धोरण पुर्ववत करा, ग्रामीण भागातील लोडशेडींग बंद करा अशा प्रमुख मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला. दुपारी २ वाजता सर्कस मैदानावरून निघालेला हा मोर्चा २.३० वाजताच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला. विविध घोषणा देत मोर्चेकऱ्यांनी आपल्या मागण्यांकडे नागरिकांचे लक्ष वेधून घेतले.जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या मोर्चाचे रूपांतर जाहीर सभेत झाले. यावेळी मार्गदर्शन करताना ना.राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, या सरकराने सत्तेत आल्यापासून केवळ घोषणाच केल्या आहेत. दिलेल्या आश्वासनांपैकी कोणत्याच आश्वासनाची पूर्तता केली आहे. सत्तेत सहभागी असणाऱ्या शिवसेनेच्या एका आमदारानेही ही बाब खासगीत कबुल करताना सरकार किती नाकर्ते आहे हे सांगितल्याचे विखे पाटील म्हणाले. सरकारमध्ये संवेदनशीलता नाही. मराठवाड्यासारख्या क्षेत्रात कधी शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत नव्हत्या. मात्र या सरकारच्या काळात तेथील आत्महत्या वाढल्या आहेत. हेच अच्छे दिन आहेत का? असा सवाल करून आता ‘बुरे दिन’ आले असल्याचे ते म्हणाले.प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी हे सरकार शेतकऱ्यांचे आणि सर्वसामान्यांचे नसून केवळ भांडवलदारांचे असल्याचा आरोप केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आपली खुर्ची वाचविण्यासाठी पंतप्रधान मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहा म्हणतील तसे निर्णय घेत आहेत, असा आरोप करताना महाराष्ट्रातील उद्योग आणि पाणी गुजरातमध्ये पळविले जात असल्याचे ते म्हणाले.धानाला ५०० रुपये बोनस दिला नाही तर कोणत्याही खासदार, आमदार, मंत्र्याला गावात येऊ देऊ नका, असे सांगून त्यासाठी काँग्रेस पक्ष आपल्यासाठी आंदोलन करेल, असेही यावेळी सांगण्यात आले. यावेळी आ.गोपालदास अग्रवाल यांनी आपल्या भाषणात आगामी जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकीत आपली चूक सुधारण्याचे आवाहन केले. (जिल्हा प्रतिनिधी)