शहरं
Join us  
Trending Stories
1
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठ्या पर्वाचा अंत; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त!
2
अरे देवा! मृताच्या कुटुंबाला ६ लाखांची मदत जाहीर; ६ महिला म्हणतात, "मीच यांची खरी बायको..."
3
"वारकरी संप्रदायाची थट्टा चालविली... ऐका सुप्रिया ताई...!"; संत तुकाराम महाराजांचा अभंग सांगत भाजपचा हल्लाबोल
4
'अमेरिका स्वतः रशियन तेल खरेदीची परवानगी देते; हा ढोंगीपणा...' भारतीय कंपन्यांनी केली पोलखोल
5
हृदयद्रावक! पुरामुळे आयुष्य उद्ध्वस्त... घरं, दुकानं गेली वाहून; अन्नाचा, औषधांचा मोठा तुटवडा
6
दे दणादण! मेट्रोमध्ये एकमेकींच्या झिंज्या उपटल्या तरी गप्प नाही बसल्या, Video तुफान व्हायरल
7
बँक एफडीपेक्षा जास्त व्याज! पोस्ट ऑफिसची या योजनेत १ लाख रुपयांवर मिळेल २३,५०८ रुपयांचा नफा
8
ये नया हिंदुस्तान है...! केवळ पुतिनच नाही, झेलेंस्कीसुद्धा भारतात येणार...; तिकडे अमेरिकेचा 'यू-टर्न', इकडे वेगळाच 'पिक्चर' दिसणार?
9
येस बँकेच्या भागधारकांसाठी मोठी बातमी! जपानी बँक २५% पर्यंत हिस्सा खरेदी करणार, काय होणार बदल?
10
"पप्पांनी टॉप मॉडेल स्कॉर्पिओ दिली, तरी निक्कीला जाळलं..."; बहिणीचा धक्कादायक खुलासा
11
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका
12
Bigg Boss 19: 'बिग बॉस १९'च्या ग्रँड प्रीमिअरला काही तास शिल्लक, शो कधी-कुठे पाहता येईल?
13
कधी करावी गणेश स्थापना, ज्येष्ठा गौरींचे पूजन कधी? जाणून घ्या मुहुर्त आणि इतर माहिती
14
ठरलं तर! बॉलिवूडमधील 'या' प्रसिद्ध गायकाची Bigg Boss 19 मध्ये एन्ट्री, वडिलांच्या कमेंटने वेधलं लक्ष
15
AUS vs SA: टॉस जिंकून ऑस्ट्रेलियन कर्णधारानं पहिल्यांदाच घेतला 'असा' निर्णय!
16
तुमच्या नोकऱ्यांचा एआय शत्रू आहे का?
17
मुकेश किंवा नीता अंबानी नाही तर रिलायन्समध्ये सर्वात जास्त शेअर्स कोणाकडे आहेत?
18
गणेशभक्तांना घेऊन जाणारी बस कशेडी बोगद्याजवळ पेटली; प्रवासी झोपेत असतानाच उडाला आगीचा भडका
19
Video - राजस्थानमध्ये पुराचे थैमान; बचावकार्यासाठी येणाऱ्या NDRF जवानांच्या गाडीचा अपघात
20
ऑनलाइन गेमिंगच्या जाळ्यात तुमचाच ‘गेम’ तर होत नाही ना?

हे घोषणाबाजच नाही तर ‘घुमजाव’ सरकार

By admin | Updated: February 7, 2015 23:25 IST

जनतेची दिशाभूल करून केंद्रात आणि राज्यात भाजप सरकार सत्तारूढ झाले. राज्यात या घोषणाबाज सरकारने गेल्या १०० दिवसात एक तरी घोषणा अंमलात आणली का?

काँंग्रेसचा हल्लाबोल : जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले हजारों कार्यकर्ते व नागरिकगोंदिया : जनतेची दिशाभूल करून केंद्रात आणि राज्यात भाजप सरकार सत्तारूढ झाले. राज्यात या घोषणाबाज सरकारने गेल्या १०० दिवसात एक तरी घोषणा अंमलात आणली का? असा सवाल करीत हे घोषणाबाजच नाही तर ‘घुमजाव’ सरकार आहे, असा हल्ला काँग्रेसचे विधानसभेतील विरोधीपक्ष नेते आणि माजी कृषीमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला.जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आलेल्या मोर्चाप्रसंगी आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या या सभेला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, माजी मंत्री नितीन राऊत, आ.गोपालदास अग्रवाल, आ.सुनील केदार, माजी मंत्री भरत बहेकार, माजी आ.रामरतन राऊत, सेवक वाघाये, अशोक लंजे, अमर वऱ्हाडे, राजेश नंदागवळी, डॉ.योगेंद्र भगत, नामदेव किरसान आदी अनेक पदाधिकारी मंचावर उपस्थित होते.धान उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी १० हजार रुपये अनुदान द्या, कृषी उत्पादनाच्या हमीभावात वाढ करा, भूमी अधिग्रहण कायद्यात सुधारणा करणारा अध्यादेश परत घ्या, आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाचे भाव कमी झाल्याने पेट्रोल-डिझेलचे भाव कमी करा, गॅस पुरवठा धोरण पुर्ववत करा, ग्रामीण भागातील लोडशेडींग बंद करा अशा प्रमुख मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला. दुपारी २ वाजता सर्कस मैदानावरून निघालेला हा मोर्चा २.३० वाजताच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला. विविध घोषणा देत मोर्चेकऱ्यांनी आपल्या मागण्यांकडे नागरिकांचे लक्ष वेधून घेतले.जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या मोर्चाचे रूपांतर जाहीर सभेत झाले. यावेळी मार्गदर्शन करताना ना.राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, या सरकराने सत्तेत आल्यापासून केवळ घोषणाच केल्या आहेत. दिलेल्या आश्वासनांपैकी कोणत्याच आश्वासनाची पूर्तता केली आहे. सत्तेत सहभागी असणाऱ्या शिवसेनेच्या एका आमदारानेही ही बाब खासगीत कबुल करताना सरकार किती नाकर्ते आहे हे सांगितल्याचे विखे पाटील म्हणाले. सरकारमध्ये संवेदनशीलता नाही. मराठवाड्यासारख्या क्षेत्रात कधी शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत नव्हत्या. मात्र या सरकारच्या काळात तेथील आत्महत्या वाढल्या आहेत. हेच अच्छे दिन आहेत का? असा सवाल करून आता ‘बुरे दिन’ आले असल्याचे ते म्हणाले.प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी हे सरकार शेतकऱ्यांचे आणि सर्वसामान्यांचे नसून केवळ भांडवलदारांचे असल्याचा आरोप केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आपली खुर्ची वाचविण्यासाठी पंतप्रधान मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहा म्हणतील तसे निर्णय घेत आहेत, असा आरोप करताना महाराष्ट्रातील उद्योग आणि पाणी गुजरातमध्ये पळविले जात असल्याचे ते म्हणाले.धानाला ५०० रुपये बोनस दिला नाही तर कोणत्याही खासदार, आमदार, मंत्र्याला गावात येऊ देऊ नका, असे सांगून त्यासाठी काँग्रेस पक्ष आपल्यासाठी आंदोलन करेल, असेही यावेळी सांगण्यात आले. यावेळी आ.गोपालदास अग्रवाल यांनी आपल्या भाषणात आगामी जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकीत आपली चूक सुधारण्याचे आवाहन केले. (जिल्हा प्रतिनिधी)