शहरं
Join us  
Trending Stories
1
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
2
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
3
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
4
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
5
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
6
ENG vs IND : इंग्लंड टेस्ट मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळणार? कोच म्हणाला, आम्ही एवढेही मूर्ख नाही की,...
7
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
8
"२० कोटी दिले तरी ...", बिग बॉस १९ मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर राम कपूरने सोडलं मौन
9
BRICS शिखर परिषदेसाठी PM मोदी ब्राझीलमध्ये दाखल; भारताला काय फायदा? जाणून घ्या...
10
भारतीय चलनी नोटांवर फक्त महात्मा गांधीजींचेच चित्र का? आरबीआयने स्वतःच सांगितले कारण
11
2028 च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरणार 'America Party'? इलॉन मस्क यांनी वेगळीच हिंट दिली!
12
संपत्तीवरून वाद झाला, काकीनेच पुतण्याचा गेम केला! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू 
13
अमेरिकेचा मोठा निर्णय! १ ऑगस्टपासून १०० देशांवर लादणार नवीन शुल्क, भारतावर काय परिणाम?
14
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते वडाळा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजा
15
Tata च्या Harrier EV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; काही तासांत हजारो युनिट्सची विक्री...
16
"मी यूपीचा, पण महाराष्ट्रासाठी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे...?"; भाषा वादावरून 26/11 च्या 'नायका'चा राज ठाकरेंना थेट सवाल
17
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
18
'ऑपरेशन सिंदूर'मुळे घाबरलेला पाकिस्तान आता चीनकडून घेणार 'केजे-५००'! कसं आहे 'हे' नवं विमान?
19
तेरा वर्षीय मुलाने तुळशीच्या पानावर साकारले विठ्ठल! पाहा माऊलीचं सुंदर रूप
20
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?

शेतातील सिंचन विहिरी दोन वर्षांपासून कागदावरच

By admin | Updated: May 31, 2014 23:35 IST

शेतकर्‍यांना पिकासाठी पाणीसाठा उपलब्ध व्हावा या उदात्त हेतूने विविध योजनेतून विहीरी मंजूर झाल्या आहेत. परंतु मागील दोन वर्षापासून सातपैकी एकही विहिरीचे खोदकाम करण्यात आले नाही.

शेंडा/कोयलारी : शेतकर्‍यांना पिकासाठी पाणीसाठा उपलब्ध व्हावा या उदात्त हेतूने विविध योजनेतून विहीरी मंजूर झाल्या आहेत. परंतु मागील दोन वर्षापासून सातपैकी एकही विहिरीचे खोदकाम करण्यात आले नाही. सडक/अर्जुनी ग्रामपंचायत कार्यालयात मागील दोन वर्षापासून सात विहिरी मंजूर झाल्या आहेत. त्यापैकी एकही विहीरीचे बांधकाम करण्यात आले नाही, अशी तक्रार शेतकरी वारंवार करीत आहेत. याची शहानिशा सदर प्रतिनिधीने केली असता ग्रामविस्तार अधिकारी हटवार व खंडविकास अधिकारी धांडे यांच्याशी केली असता त्या दोघांनीही रेशोची समस्या सांगीतली. शेतकर्‍यांना सिंचनाच्या सोई उपलब्ध व्हाव्यात यासाठी विविध योजनेच्या माध्यमातून शंभर टक्के अनुदानावर शेतात विहीरीचे बांधकाम करण्यात येते. परंतु त्या विहीरीच्या बांधकामासाठी शेतकर्‍यांना हेलपाट्या खाव्या लागतात.  सडक/अर्जुनी ग्रामपंचायतचे ग्रामविस्तार अधिकारी हटवार यांनी सांगितले की, आमच्याकडे सात विहिरी मंजूर आहेत. परंतु विहीर बांधकाम करण्यासाठी कुशल व अकुशल कामावर ४0 ते ६0 असा रेशो आहे. त्यासाठी ग्रामपंचायतला आपल्या स्तरावर किमान २0 लाखाचे माती काम करावे लागेल तरच फक्त एका विहिरीचे बांधकाम होईल अन्यथा होणार नाही. वस्तुस्थिती जावून घेण्याकरीता सदर प्रतिनिधीने खंडविकास अधिकारी धांडे यांच्याशी भेट घेतली असता ते म्हणाले की, अगोदर पंचायत समिती स्तरावर कामे करण्यात येत होती. त्यामुळे विहिर बांधकाम होत होते. परंतु आता ग्रामपंचायत स्तरावर काम केले जाते. त्यामुळे विहिर बांधकाम रखडले. शासन शेतकर्‍यांना विहिरी मंजूर केल्याचा गवगवा करून शेतकर्‍यांची दिशाभूल करीत आहे. शेतकर्‍यांना  वाटेल तेवढे पुरावे मागितले जातात. आपल्याला विहीर मंजूर होईल. या आशेने दक्षिणा देण्यास तयार होतो. परंतु त्याच्या पदरी निराशाच पडते. शेतकर्‍यांना विहिरीची आवश्यकता आहे. रेशोची नाही, असे शेतकरी दोन वर्षापासून बोलत आहेत. शासनाने मंजूर केलेल्या विहिरींना रेशोच्या कचाट्यातून दूर सारुन विहीर बांधकाम करून देण्याची मागणी सडक/अर्जुनी येथील शेतकर्‍यांनी केली आहे. (वार्ताहर)