शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
2
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
3
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
4
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
5
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
6
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
7
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
8
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
10
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
11
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
12
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
13
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
14
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
15
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
16
सुट्टीसाठी तळमळणाऱ्या मंत्र्यांना ‘डिसेंबर’ हुडहुडी!
17
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
18
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
19
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
20
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

शेतातील सिंचन विहिरी दोन वर्षांपासून कागदावरच

By admin | Updated: May 31, 2014 23:35 IST

शेतकर्‍यांना पिकासाठी पाणीसाठा उपलब्ध व्हावा या उदात्त हेतूने विविध योजनेतून विहीरी मंजूर झाल्या आहेत. परंतु मागील दोन वर्षापासून सातपैकी एकही विहिरीचे खोदकाम करण्यात आले नाही.

शेंडा/कोयलारी : शेतकर्‍यांना पिकासाठी पाणीसाठा उपलब्ध व्हावा या उदात्त हेतूने विविध योजनेतून विहीरी मंजूर झाल्या आहेत. परंतु मागील दोन वर्षापासून सातपैकी एकही विहिरीचे खोदकाम करण्यात आले नाही. सडक/अर्जुनी ग्रामपंचायत कार्यालयात मागील दोन वर्षापासून सात विहिरी मंजूर झाल्या आहेत. त्यापैकी एकही विहीरीचे बांधकाम करण्यात आले नाही, अशी तक्रार शेतकरी वारंवार करीत आहेत. याची शहानिशा सदर प्रतिनिधीने केली असता ग्रामविस्तार अधिकारी हटवार व खंडविकास अधिकारी धांडे यांच्याशी केली असता त्या दोघांनीही रेशोची समस्या सांगीतली. शेतकर्‍यांना सिंचनाच्या सोई उपलब्ध व्हाव्यात यासाठी विविध योजनेच्या माध्यमातून शंभर टक्के अनुदानावर शेतात विहीरीचे बांधकाम करण्यात येते. परंतु त्या विहीरीच्या बांधकामासाठी शेतकर्‍यांना हेलपाट्या खाव्या लागतात.  सडक/अर्जुनी ग्रामपंचायतचे ग्रामविस्तार अधिकारी हटवार यांनी सांगितले की, आमच्याकडे सात विहिरी मंजूर आहेत. परंतु विहीर बांधकाम करण्यासाठी कुशल व अकुशल कामावर ४0 ते ६0 असा रेशो आहे. त्यासाठी ग्रामपंचायतला आपल्या स्तरावर किमान २0 लाखाचे माती काम करावे लागेल तरच फक्त एका विहिरीचे बांधकाम होईल अन्यथा होणार नाही. वस्तुस्थिती जावून घेण्याकरीता सदर प्रतिनिधीने खंडविकास अधिकारी धांडे यांच्याशी भेट घेतली असता ते म्हणाले की, अगोदर पंचायत समिती स्तरावर कामे करण्यात येत होती. त्यामुळे विहिर बांधकाम होत होते. परंतु आता ग्रामपंचायत स्तरावर काम केले जाते. त्यामुळे विहिर बांधकाम रखडले. शासन शेतकर्‍यांना विहिरी मंजूर केल्याचा गवगवा करून शेतकर्‍यांची दिशाभूल करीत आहे. शेतकर्‍यांना  वाटेल तेवढे पुरावे मागितले जातात. आपल्याला विहीर मंजूर होईल. या आशेने दक्षिणा देण्यास तयार होतो. परंतु त्याच्या पदरी निराशाच पडते. शेतकर्‍यांना विहिरीची आवश्यकता आहे. रेशोची नाही, असे शेतकरी दोन वर्षापासून बोलत आहेत. शासनाने मंजूर केलेल्या विहिरींना रेशोच्या कचाट्यातून दूर सारुन विहीर बांधकाम करून देण्याची मागणी सडक/अर्जुनी येथील शेतकर्‍यांनी केली आहे. (वार्ताहर)