शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
2
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
3
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
4
चीनचा पाकिस्तानसोबत डबल गेम! UN परिषदेत भेटी-गाठींचा देखावा; पण बाजूने एक शब्दही नाही बोलला
5
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...
6
भीषण अपघात! कार चालवताना रील पाहत होता ड्रायव्हर; नवरदेवाच्या भाचीचा मृत्यू, ५ गंभीर जखमी
7
पाकिस्तानातून भारतात आलेल्या २२ महिलांनी वाढवलं सरकारचं टेन्शन! जन्माला घातली ९५ मुलं अन्...
8
“आता राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यास चालढकल करू नये”: जयंत पाटील
9
कानड्यांनो, बापाला सॉरी म्हणायला लावता राव?; अवधूतने सोनू निगमची बाजू घेत लिहिली कविता
10
भारत-पाकिस्तानमध्ये झालेली युद्धं किती दिवस चालली? एवढ्या दिवसांत उडाला होता पाकिस्तानचा फज्जा
11
जादू की झप्पी! रुग्णांना बरं करणारी 'हग थेरपी' आहे तरी काय?, फायदे ऐकून तुम्हीही माराल मिठी
12
Amazon Prime सबस्क्रिप्शनसाठी पैसे खर्च करू नका; Jio, Airtel आणि Vi च्या रिचार्जवर मोफत मिळतंय
13
Nashik: जाधव बंधू हत्येनंतर ठाण्यात आला अन् ओळख लपवून राहू लागला, अखेर पोलिसांना सापडलाच
14
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
15
मॉकड्रिलमुळे ताज्या झाल्या भारत-पाकिस्तान युद्धाच्या आठवणी; १९६५ आणि १९७१च्या युद्धावेळी काय घडलेलं?
16
सूत जुळलं! ३ मुलांची आई असलेली हॉटेलची मालकीण १९ वर्षीय मजुराच्या पडली प्रेमात अन्...
17
"पहलगाम हल्ल्याच्या तीन दिवस आधी पंतप्रधान मोदींना पाठवला होता गुप्तचर अहवाल"; मल्लिकार्जुन खरगेंचा मोठा दावा
18
Cashless Treatment Scheme: अपघातातील जखमींवर होणार कॅशलेस उपचार, नवी योजना लागू; केंद्राने काढली अधिसूचना
19
बाजार पुन्हा घसरला! बँक ऑफ बडोदाला मोठा धक्का; 'या' सेक्टरमधील शेअर्सही विखुरले
20
भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत LRAD यंत्रणा सज्ज, हल्ल्याची तात्काळ मिळणार सूचना

जिल्हा परिषदचे सिंचन ७९८ प्रकल्प रखडलेले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2019 06:00 IST

गोंदिया जिल्ह्यातील ६३ हजार ७०७ हेक्टर शेती सिंचित होऊ शकेल एवढ्या क्षमतेचे प्रकल्प एकट्या जिल्हा परिषदेकडे आहेत. परंतु ह्या प्रकल्पांची दुरूस्ती मागील अनेक वर्षापासून न झाल्यामुळे तलावाच्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पाण्याअभावी आपली शेतीला सिंचित करता येत नाही.

ठळक मुद्देजिल्ह्यात ३५२९ तलाव : दुरुस्तीसाठी ७० कोटींची गरज, शेतकऱ्यांना सिंचनाची होऊ शकते मदत

नरेश रहिले ।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शासन एकीकडे सिंचन क्षमता वाढविण्यासाठी किंवा भूगर्भातील पाण्याच्या पातळीत वाढ करण्यासाठी जलयुक्त शिवार अभियान राबवित आहे. परंतु तलावांचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या गोंदिया जिल्ह्यातील ७९८ प्रकल्प पैश्याअभावी रखडले आहेत. जिल्ह्यात लघु पाटबंधारे विभागामार्फत सिंचनासाठी ३ हजार ५२९ प्रकल्प आहेत. त्यापैकी ७८९ प्रकल्प रखडले असल्याने तलावांच्या जिल्ह्यात पाण्याचा दुष्काळ आहे.गोंदिया जिल्ह्यातील ६३ हजार ७०७ हेक्टर शेती सिंचित होऊ शकेल एवढ्या क्षमतेचे प्रकल्प एकट्या जिल्हा परिषदेकडे आहेत. परंतु ह्या प्रकल्पांची दुरूस्ती मागील अनेक वर्षापासून न झाल्यामुळे तलावाच्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पाण्याअभावी आपली शेतीला सिंचित करता येत नाही. शासन जलयुक्त शिवार अभियानाचा गाजावाजा करीत आहे. परंतु या रखडलेल्या या प्रकल्पांची कामे करण्यास उत्सुकता दाखवित नसल्याचे चित्र सद्या उभे आहे. १९० लघु सिंचन तलावपैकी ८८ नादुरूस्त, २९४ कोल्हापुरी बंधाऱ्यांपैकी ७० नादुरूस्त, १३ उपसा सिंचनापैकी ९ उपसा सिंचन नादुरूस्त, २६ पाझर तलाव आहेत ते संपूर्ण दुरूस्त आहेत.१५४५ साठवण बंधाऱ्यांपैकी १०६ नादुरूस्त, माजी मालगुजारी १४२१ तलावांपैकी ५२५ तलाव नादुरूस्त असल्याची माहिती संबधित विभागाने दिली. यामुळे सिंचनाच्या सोयी करण्यास शासन कसा उदासिन आहे याची प्रचिती येते.गोंदिया जिल्हा तलावांचा जिल्हा म्हणून ओळख निर्माण करणारा असला तरी या जिल्ह्यातील बहुतांश शेती कोरडवाहू आहे. शेतकºयांना सिंचनाची सोय उपलब्ध व्हावी सोयीस्कर म्हणून माजी मालगुजारी तलाव आहेत. परंतु गोंदिया जिल्ह्यातील ८० टक्के मामा तलावांमध्ये उन्हाळ्यात पाण्याचा ठणठणाट असतोे.गोंदिया जिल्ह्यातील १४२१ माजी मालगुजारी तलावांपैकी ५२५ तलावांची दुरूस्ती करण्याची गरज आहे. परंतु दुरूस्ती न झाल्यामुळे शेतकºयांना सिंचन करण्यासाठी पाणी पुरत नाही.परिणामी हे मामा तलाव हिवाळ्यातच कोरडे पडतात. जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येणाºया लघु पाटबंधारे विभागाच्या अखत्यारित लघुसिंचन तलाव, कोल्हापुरी बंधारे, उपसा सिंचन योजना, पाझर तलाव, साठवण बंधारे व माजी मालगुजारी तलावात दरवर्षीच पाण्याचा ठणठणाट पडतो.७० कोटीची गरजशासनाने गोंदिया जिल्हा परिषद अंतर्गत असलेले सिंचन प्रकल्प दुरूस्त करण्याची तयारी दर्शविली तर ७९८ प्रकल्प दुरूस्तीसाठी ६९ कोटी ८१ लाख रूपयाची गरज आहे. सदर प्रकल्पाची दुरूस्ती झाल्यास १८ हजार ९९७ हेक्टर शेती सिंचीत होऊ शकेल. मामा तलावांची दुरूस्ती झाल्यास ९०२० हेक्टर, लपा तलाव दुरूस्त झाल्यास ५४८२ हेक्टर, पाझर तालवाच्या दुरूस्तीमुळे ३२ हेक्टर, कोल्हापूरी बंधाऱ्यांमुळे ३०८० हेक्टर, साठवण बंधाऱ्यांमुळे ५३३ हेक्टर, उपसा सिंचनामुळे ८५० हेक्टर शेती सिंचीत होऊ शकेल.१९ हजार हेक्टर शेती सिंचीतवर्षानुवर्षापासून गोंदिया जिल्ह्यात असलेल्या तलावांमधून आजघडीला १९ हजार २२० हेक्टर शेती सिंचीत होते. मामा तलावांमधून १० हजार ११६ हेक्टर, लपा तलावांमधून ४ हजार ४५८ हेक्टर, कोल्हापूरी बंधाºयांमुळे २ हजार ३९८ हेक्टर, साठवण बंधाºयांमुळे ९९० हेक्टर, उपसा सिंचनामुळे ७५२ हेक्टर शेती सिंचीत होऊ शकते.

टॅग्स :Irrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प