शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

सिंचन प्रकल्पांनी गाठला तळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2018 21:39 IST

जिल्ह्यातील सिंचन प्रकल्प आणि तलावानी फेब्रुवारी महिन्यातच तळ गाठल्याने उन्हाळ्यात पाणी टंचाईची समस्या अधिक बिकट होण्याचे संकेत दिले जात आहे. त्यामुळे पशुपालक व शेतकऱ्यांना आत्तापासूनच जनावरांच्या चाºयासह पाण्याची समस्या भेडसावित आहे.

ठळक मुद्देप्रकल्पांमध्ये केवळ १६ टक्के पाणीसाठा : पाणी टंचाईचे संकट गडद

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यातील सिंचन प्रकल्प आणि तलावानी फेब्रुवारी महिन्यातच तळ गाठल्याने उन्हाळ्यात पाणी टंचाईची समस्या अधिक बिकट होण्याचे संकेत दिले जात आहे. त्यामुळे पशुपालक व शेतकऱ्यांना आत्तापासूनच जनावरांच्या चाºयासह पाण्याची समस्या भेडसावित आहे.मागील वर्षी जिल्ह्यात केवळ ५४ टक्के पाऊस झाला. परिणामी जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पात मोजकाच पाणीसाठा आहे. परिणामी जिल्ह्यातील ग्रामीण भागात आतापासूनच पाणी टंचाईची ओरड होत आहे. ३ फेब्रुवारीला जिल्ह्यातील ६९ तलाव व जलाशयात केवळ १६.३५ टक्के पाणीसाठा होता. मागील दोन वर्षांतील याच कालावधीतील पाणीसाठ्यावर नजर टाकल्यास यंदा सर्वात कमी पाणीसाठा आहे. त्यामुळे जिल्हावासीयांना पाणी टंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागणार आहे. ६९ तलावांपैकी २९ तलावांमध्ये केवळ १० टक्के पाणीसाठा आहे. तर ११ प्रकल्प पूर्णपणे कोरडे पडले आहेत. यावरुन यंदा पाण्याची समस्या किती गंभीर असणार याचा अंदाज लावला जात आहे. अद्यापही तीव्र उन्हाळ्याला सुरूवात व्हायची आहे. त्यामुळे प्रकल्पातील पाणीसाठ्यात अजून घट होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील काही भागात आत्तापासून पाणी टंचाईची ओरड होत आहे. मात्र यावर उपाय योजना करण्यासंदर्भात प्रशासनाने अद्यापही कुठलेही पाऊल उचलले नाही. त्यामुळे प्रशासन पाणी टंचाईच्या समस्येवर किती गंभीर आहे हे दिसून येते. ज्या प्रकल्पांमध्ये १० टक्के सुध्दा पाणी नाही, त्यात चोरखमारा, खैरबंदा, कलपाथरी, भदभद्या, डोंगरगाव, गुमडोह, कालीमाटी, पिपरीया, पांगडी, रिसाला, सेरेपार, ओवारा, भानपूर, बोपाबोडी, चिरचाडी, फुलचूर, चिरचाडबांध, गिरोला, कोसबीबकी, ककोडी, काटी, कोकणा, खाडीपार, माहुली, मालीजुंगा, मेंढा, नांदलपार, पळसगाव, सौंदड, तेढा आदी प्रकल्पांचा समावेश आहे.मध्यम प्रकल्पात ११ टक्के पाणीजिल्ह्यात ९ मध्यम प्रकल्प असून त्यामध्ये ११.७९ टक्के पाणीसाठा आहे. मागील वर्षी याच कालावधीत ४६.२२ पाणीसाठा होता. मध्यम प्रकल्पातील पाणीसाठ्यामुळे पाणी टंचाईच्या समस्येवर मात करण्यास मदत होत असते. मात्र यंदा प्रकल्पांनी फेब्रुवारी महिन्यातच तळ गाठल्याने सर्वांचीच चिंता वाढविली आहे.लघु प्रकल्पात २० टक्के पाणीसाठाजिल्ह्यात २२ लघु प्रकल्प असून यामध्ये केवळ २०.९९ टक्के पाणीसाठा आहे. मागील वर्षी याच कालावधीत ५८.७३ टक्के पाणीसाठा होता. तर ३८ मामा तलावांमध्ये २०.९० टक्के पाणीसाठा आहे. मागील वर्षी याच कालावधीत ४७.६५ टक्के पाणीसाठा होता.