शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

सिंचन प्रकल्पांनी गाठला तळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2018 21:39 IST

जिल्ह्यातील सिंचन प्रकल्प आणि तलावानी फेब्रुवारी महिन्यातच तळ गाठल्याने उन्हाळ्यात पाणी टंचाईची समस्या अधिक बिकट होण्याचे संकेत दिले जात आहे. त्यामुळे पशुपालक व शेतकऱ्यांना आत्तापासूनच जनावरांच्या चाºयासह पाण्याची समस्या भेडसावित आहे.

ठळक मुद्देप्रकल्पांमध्ये केवळ १६ टक्के पाणीसाठा : पाणी टंचाईचे संकट गडद

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यातील सिंचन प्रकल्प आणि तलावानी फेब्रुवारी महिन्यातच तळ गाठल्याने उन्हाळ्यात पाणी टंचाईची समस्या अधिक बिकट होण्याचे संकेत दिले जात आहे. त्यामुळे पशुपालक व शेतकऱ्यांना आत्तापासूनच जनावरांच्या चाºयासह पाण्याची समस्या भेडसावित आहे.मागील वर्षी जिल्ह्यात केवळ ५४ टक्के पाऊस झाला. परिणामी जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पात मोजकाच पाणीसाठा आहे. परिणामी जिल्ह्यातील ग्रामीण भागात आतापासूनच पाणी टंचाईची ओरड होत आहे. ३ फेब्रुवारीला जिल्ह्यातील ६९ तलाव व जलाशयात केवळ १६.३५ टक्के पाणीसाठा होता. मागील दोन वर्षांतील याच कालावधीतील पाणीसाठ्यावर नजर टाकल्यास यंदा सर्वात कमी पाणीसाठा आहे. त्यामुळे जिल्हावासीयांना पाणी टंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागणार आहे. ६९ तलावांपैकी २९ तलावांमध्ये केवळ १० टक्के पाणीसाठा आहे. तर ११ प्रकल्प पूर्णपणे कोरडे पडले आहेत. यावरुन यंदा पाण्याची समस्या किती गंभीर असणार याचा अंदाज लावला जात आहे. अद्यापही तीव्र उन्हाळ्याला सुरूवात व्हायची आहे. त्यामुळे प्रकल्पातील पाणीसाठ्यात अजून घट होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील काही भागात आत्तापासून पाणी टंचाईची ओरड होत आहे. मात्र यावर उपाय योजना करण्यासंदर्भात प्रशासनाने अद्यापही कुठलेही पाऊल उचलले नाही. त्यामुळे प्रशासन पाणी टंचाईच्या समस्येवर किती गंभीर आहे हे दिसून येते. ज्या प्रकल्पांमध्ये १० टक्के सुध्दा पाणी नाही, त्यात चोरखमारा, खैरबंदा, कलपाथरी, भदभद्या, डोंगरगाव, गुमडोह, कालीमाटी, पिपरीया, पांगडी, रिसाला, सेरेपार, ओवारा, भानपूर, बोपाबोडी, चिरचाडी, फुलचूर, चिरचाडबांध, गिरोला, कोसबीबकी, ककोडी, काटी, कोकणा, खाडीपार, माहुली, मालीजुंगा, मेंढा, नांदलपार, पळसगाव, सौंदड, तेढा आदी प्रकल्पांचा समावेश आहे.मध्यम प्रकल्पात ११ टक्के पाणीजिल्ह्यात ९ मध्यम प्रकल्प असून त्यामध्ये ११.७९ टक्के पाणीसाठा आहे. मागील वर्षी याच कालावधीत ४६.२२ पाणीसाठा होता. मध्यम प्रकल्पातील पाणीसाठ्यामुळे पाणी टंचाईच्या समस्येवर मात करण्यास मदत होत असते. मात्र यंदा प्रकल्पांनी फेब्रुवारी महिन्यातच तळ गाठल्याने सर्वांचीच चिंता वाढविली आहे.लघु प्रकल्पात २० टक्के पाणीसाठाजिल्ह्यात २२ लघु प्रकल्प असून यामध्ये केवळ २०.९९ टक्के पाणीसाठा आहे. मागील वर्षी याच कालावधीत ५८.७३ टक्के पाणीसाठा होता. तर ३८ मामा तलावांमध्ये २०.९० टक्के पाणीसाठा आहे. मागील वर्षी याच कालावधीत ४७.६५ टक्के पाणीसाठा होता.