शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
4
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
5
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
6
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
8
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
9
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
10
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
11
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
12
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
13
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
14
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
15
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
16
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
17
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
18
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
19
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
20
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल

सिंचन प्रकल्पांनी गाठला तळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2018 21:39 IST

जिल्ह्यातील सिंचन प्रकल्प आणि तलावानी फेब्रुवारी महिन्यातच तळ गाठल्याने उन्हाळ्यात पाणी टंचाईची समस्या अधिक बिकट होण्याचे संकेत दिले जात आहे. त्यामुळे पशुपालक व शेतकऱ्यांना आत्तापासूनच जनावरांच्या चाºयासह पाण्याची समस्या भेडसावित आहे.

ठळक मुद्देप्रकल्पांमध्ये केवळ १६ टक्के पाणीसाठा : पाणी टंचाईचे संकट गडद

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यातील सिंचन प्रकल्प आणि तलावानी फेब्रुवारी महिन्यातच तळ गाठल्याने उन्हाळ्यात पाणी टंचाईची समस्या अधिक बिकट होण्याचे संकेत दिले जात आहे. त्यामुळे पशुपालक व शेतकऱ्यांना आत्तापासूनच जनावरांच्या चाºयासह पाण्याची समस्या भेडसावित आहे.मागील वर्षी जिल्ह्यात केवळ ५४ टक्के पाऊस झाला. परिणामी जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पात मोजकाच पाणीसाठा आहे. परिणामी जिल्ह्यातील ग्रामीण भागात आतापासूनच पाणी टंचाईची ओरड होत आहे. ३ फेब्रुवारीला जिल्ह्यातील ६९ तलाव व जलाशयात केवळ १६.३५ टक्के पाणीसाठा होता. मागील दोन वर्षांतील याच कालावधीतील पाणीसाठ्यावर नजर टाकल्यास यंदा सर्वात कमी पाणीसाठा आहे. त्यामुळे जिल्हावासीयांना पाणी टंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागणार आहे. ६९ तलावांपैकी २९ तलावांमध्ये केवळ १० टक्के पाणीसाठा आहे. तर ११ प्रकल्प पूर्णपणे कोरडे पडले आहेत. यावरुन यंदा पाण्याची समस्या किती गंभीर असणार याचा अंदाज लावला जात आहे. अद्यापही तीव्र उन्हाळ्याला सुरूवात व्हायची आहे. त्यामुळे प्रकल्पातील पाणीसाठ्यात अजून घट होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील काही भागात आत्तापासून पाणी टंचाईची ओरड होत आहे. मात्र यावर उपाय योजना करण्यासंदर्भात प्रशासनाने अद्यापही कुठलेही पाऊल उचलले नाही. त्यामुळे प्रशासन पाणी टंचाईच्या समस्येवर किती गंभीर आहे हे दिसून येते. ज्या प्रकल्पांमध्ये १० टक्के सुध्दा पाणी नाही, त्यात चोरखमारा, खैरबंदा, कलपाथरी, भदभद्या, डोंगरगाव, गुमडोह, कालीमाटी, पिपरीया, पांगडी, रिसाला, सेरेपार, ओवारा, भानपूर, बोपाबोडी, चिरचाडी, फुलचूर, चिरचाडबांध, गिरोला, कोसबीबकी, ककोडी, काटी, कोकणा, खाडीपार, माहुली, मालीजुंगा, मेंढा, नांदलपार, पळसगाव, सौंदड, तेढा आदी प्रकल्पांचा समावेश आहे.मध्यम प्रकल्पात ११ टक्के पाणीजिल्ह्यात ९ मध्यम प्रकल्प असून त्यामध्ये ११.७९ टक्के पाणीसाठा आहे. मागील वर्षी याच कालावधीत ४६.२२ पाणीसाठा होता. मध्यम प्रकल्पातील पाणीसाठ्यामुळे पाणी टंचाईच्या समस्येवर मात करण्यास मदत होत असते. मात्र यंदा प्रकल्पांनी फेब्रुवारी महिन्यातच तळ गाठल्याने सर्वांचीच चिंता वाढविली आहे.लघु प्रकल्पात २० टक्के पाणीसाठाजिल्ह्यात २२ लघु प्रकल्प असून यामध्ये केवळ २०.९९ टक्के पाणीसाठा आहे. मागील वर्षी याच कालावधीत ५८.७३ टक्के पाणीसाठा होता. तर ३८ मामा तलावांमध्ये २०.९० टक्के पाणीसाठा आहे. मागील वर्षी याच कालावधीत ४७.६५ टक्के पाणीसाठा होता.