शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
2
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
3
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
4
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
5
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
6
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
7
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
8
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
9
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
10
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
11
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
12
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
13
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
14
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
15
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
16
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
17
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हणाल्या...
18
रेल्वे प्रवासासाठी आता मोजावे लागणार जादा पैसे! जास्त सामान नेण्यावरही अतिरिक्त शुल्क लागू होणार
19
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
20
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
Daily Top 2Weekly Top 5

अवैध रेतीची वाहतूक सुरुच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2017 00:36 IST

तालुक्यातील बिंझली परिसरात कुआढास नाल्यातून अवैध रेतीचा उपसा करून वनीकरणाच्या जागेवरून वाहतूक केली जात आहे.

सालेकसा : तालुक्यातील बिंझली परिसरात कुआढास नाल्यातून अवैध रेतीचा उपसा करून वनीकरणाच्या जागेवरून वाहतूक केली जात आहे. त्यामुळे अनेक वृक्षांचे नुकसान झाल्याचा आरोप येथील वन व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पूनमचंद गिरीया यांनी केला आहे. तसेच या परिसरातून रेती वाहतूक थांबविण्याची यावी, वृक्षांची सुरक्षा करण्यात सहकार्य करावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.मागील जुलै महिन्यात राज्य शासनाने दोन कोटी वृक्ष लागवडीचा उपक्रम हाती घेतला होता. त्या अंतर्गत तालुक्यात विविध ठिकाणी वृक्ष लागवड मोहीम राबविण्यात आली. बिंझली गावाच्या १० हेक्टर परिसरात जवळपास २५ हजार रोपट्यांची लागवड करण्यात आली होती. त्या वनीकरणाला कुंपणसुद्धा करण्यात आले होते. परंतु त्या परिसरातूनच अनेक शेतकऱ्यांना आपल्या शेतात ये-जा करावी लागत असल्यामुळे त्यांना रस्ता देण्यात आला. परंतु रेती वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांनी कुंपण जास्त प्रमाणात हटवून वनीकरण केलेल्या परिसरातून रेतू वाहतूक करणे सुरू केले. ६ फेब्रुवारीला महसूल विभागाने तीन ट्रॅक्टर अवैध रेती वाहतूक करताना पकडले व कारवाई केली. परंतु या दरम्यान अनेक वृक्षांची नासधूस झाली आहे. तसेच कुंपण तोडल्यामुळे गाव परिसरातील जनावरेसुद्धा मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड परिसरात जावून चरतात, त्यामुळे जनावरांनीही अनेक वृक्ष नष्ट करून टाकले आहेत. या प्रकारामुळे शासनाची दोन कोटी वृक्ष लागवड योजना यशस्वी होणार की लोकांच्या असहकार्यामुळे मोठ्या परिश्रमाने लावलेले वृक्ष जमीनदोस्त होतील किंवा गुरांचा चारा बनून राहतील, असे सदर परिस्थिती पाहून वाटते. वृक्षांची जोपासना व्हावी म्हणून वन व्यवस्थापन समितीच्या सर्व सदस्यांसह सचिव यांचीसुद्धा देखरेख व निगा आवश्यक असते. परंतु सचिव व वन क्षेत्र सहायक सी.जी. मडावी येथील वृक्षांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष करीत आहेत, असा आरोप वन व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पूनमचंद गिरिया, उपाध्यक्ष जियालाल लिल्हारे, कोषाध्यक्ष लेखसिंह मस्करे, सहसचिव गणेश लिल्हारे, सदस्य हरिलाल रत्नाकर, छबिलाल लिल्हारे, रमेश सूर्यवंशी, नोहरलाल लिल्हारे, रमणलाल रत्नाकर, रामदास ढेकवार यांनी केला आहे.(तालुका प्रतिनिधी)गावातील मतभेदांमुळे नुकसानबिंझली परिसरात १० हेक्टर जागेवर २५ हजार वृक्ष लागवड करण्यात आली आहे. या परिसरातच शेतकऱ्यांना आपल्या शेतात ये-जा करण्यासाठी आधीपासूनच पांदण रस्ता आहे. त्यामुळे वृक्ष लागवड केली तेव्हा त्यांना रस्ता मोकळा करून देण्यात आला. वृक्षांच्या देखरेखीची जबाबदारी वन विभाग व वन व्यवस्थापन समितीची असली तरी गावकऱ्यांचे सहकार्य आवश्यक आहे. परंतु बिंझली गावात गटबाजी आणि आपसात वैमनस्य असल्यामुळे वृक्षांचे मोठे नुकसान होत आहे. तसेच त्या ठिकाणातून रेतीची वाहतूक होते. त्यामुळे वनीकरण बाधित होत आहे.