शहरं
Join us  
Trending Stories
1
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
2
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
3
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
4
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
5
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
6
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
7
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
8
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
9
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
10
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
11
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
12
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
13
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...
14
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
15
Pakistani Citizens Deadline: पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठी नवी डेडलाइन!
16
Waves Summit 2025: "सॉरी, माझी हार्टबीट खूप...", पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर बोलताना कार्तिक आर्यन झाला नर्व्हस
17
Waves 2025: सिनेसृष्टीतील या ५ दिग्गज सेलिब्रिटींच्या स्मरणार्थ टपाल तिकीटं, पंतप्रधान मोदींनी केलं अनावरण
18
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
19
IPL 2025: Mumbai Indians मध्ये आला नवा 'भिडू', कोण आहे Raghu Sharma? किती मिळाले पैसे?
20
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा

कार्यक्षेत्राबाहेरील गावांना अवैध नळजोडणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2019 23:58 IST

अर्जुनी मोरगाव तालुक्यातील खांबी प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेंतर्गत सुजल पाणी वाटप सहकारी संस्थाद्वारे कार्यक्षेत्र नसलेल्या गावात अवैध नळ जोडणी करुन दिली जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे नियमांचे उल्लघंन करून अवैध नळ जोडणी करुन देणाºयावर फौजदारी कारवाई करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.

ठळक मुद्देखांबी पाणी पुरवठा योजना : ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी केला पंचनामा,फौजदारी कारवाई करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कनवेगावबांध : अर्जुनी मोरगाव तालुक्यातील खांबी प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेंतर्गत सुजल पाणी वाटप सहकारी संस्थाद्वारे कार्यक्षेत्र नसलेल्या गावात अवैध नळ जोडणी करुन दिली जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे नियमांचे उल्लघंन करून अवैध नळ जोडणी करुन देणाºयावर फौजदारी कारवाई करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.प्रादेशिक पाणी पुरवठा विभागातंर्गत खांबी प्रादेशिक पाणी पुरवठा योजना कार्यान्वित आहे. सुजल पाणी वाटप सहकारी संस्था सब एजन्सी म्हणून काम पाहते. नवेगावबांध जलाशयातून यासाठी पाणी उपसा केला जातो. त्यामुळे २४ तास पाण्याचा उपसा होत असल्यामुळे जलाशयात फार मोजकाच पाणी साठा उपलब्ध आहे. यासाठी निस्तार हक्क असलेल्या पाच गावात कालव्यातून पाणी सोडता येत नसल्यामुळे या गावातील विहिरी बोअरवेलची पाणी पातळी खोल गेली आहे. तर या भागातील गावकºयांना पाणी टंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. नवेगावबांध ग्रामवासीयांचे संतापाचे हे एक कारण आहे. तर दुसरीकडे, भाजीपाला पिकविणे, घराच्या बांधकामासाठी ही संस्था अवैधरित्या नळ जोडणी देत असल्याने गावकºयांच्या संतापात आणखी भर पडली आहे. ही संस्था स्वत:ला जलाशयाचा नवा मालक समजत आहे. नवेगावबांध येथील देवलगाव रस्त्यावर एका व्यक्तीच्या शेतातील आवार भिंतीचे बांधकाम सुरु आहे. सदर संस्थेने त्यांना अवैध नळ जोडणी दिली आहे. या ठिकाणी पिण्याच्या पाण्याचा वापर सर्रासपणे बांधकामासाठी केला जात आहे.हा संतापजनक प्रकार नवेगावबांध ग्रामवासीयांच्या लक्षात आला. नवेगावबांध ग्रामपंचायतचे उपसरपंच रघुनाथ लांजेवार यांच्यासह काही गावकºयांनी या ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली असता हा प्रकार उघडकीस आला. २६ मे रोजी उपसरपंच लांजेवार व इतर पंचाच्या समक्ष या अनाधिकृत प्रकाराचा पंचनामा करण्यात आला. पिण्याच्या पाण्याचा सर्रास उपयोग बांधकामाकरिता होत असल्याचे निदर्शनास आले. जलाशयात पुरेसे पाणी नसताना निस्तार हक्काच्या पाण्याचे दुरुपयोग होत आहे.खांबी प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेतंर्गत नवेगावबांध, बोंडे, खोली या गावांचा समावेश होत नाही.तरी सुध्दा पांढरवानी ग्रामपंचायत अंतर्गत येणाºया खोलीग्राम या गावात ५२, बोंडे गावात ६० च्यावर, नवेगावबांध येथे टी-पार्इंट परिसरात काही अवैध नळ जोडण्या देण्याचे काम सदर पाणी वाटप संस्थेने केले आहे.नवेगावबांध ग्रामपंचायतची स्वत:ची नळयोजना आहे हे येथे उल्लेखनिय आहे.या संस्थेचे मजूरही परस्पर विनापावती अनामत रक्कम घेवून स्वगावी बोंडे, खोलीग्राम येथे अवैध नळ जोडण्या देत असल्याचे बोलल्या जाते. नळ जोडणी देताना अनामत रक्कम काही दिवसानंतर परत करु असे आश्वासन संस्थेच्या वतीने दिले जाते. मात्र अजूनपर्यंत अनामत रक्कम परत करण्यात आली नसल्याचे नळ कनेक्शन धारकांच्या तक्रारी आहेत.पाटबंधारेविभागाचेही दुर्लक्षआपले कार्यक्षेत्र नसताना मुख्य पाईप लाईनवर अवैधरित्या नळ जोडणी करुन लाखो रुपयाचा गोरखधंदा ही संस्था गेल्या काही वर्षापासून करीत असून पाण्याचा अवैध व्यापार करीत आहे. यावर कुठल्याही शासकीय यंत्रणेचे व पाटबंधारे विभागाचे नियंत्रण नाही. एकीकडे पाण्याचा अवैध व्यापार सुरु असताना नवेगावबांध जलाशयाचे निस्तार हक्क असलेल्या गावाकरिता बारमाही निस्ताराकरीता कालव्याद्वारे पाणी सोडता येईल ऐवढे पाणी राखून ठेवण्याची जबाबदारी पाटबंधारे विभागाची आहे. तसे निस्तारपत्रकात नमूद आहे. तरीपण पाटबंधारे विभाग व प्रादेशिक पाणी पुरवठा विभागाचे या प्रकाराकडे लक्ष नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.शेतकरी रब्बी हंगामापासून वंचितनिस्तार हक्क असलेल्या नवेगावबांधसह पाच गावात कालव्याद्वारे पुरेसा पाणी साठा उपलब्ध नाही. अशी सबब पुढे करुन पाणी न सोडल्यामुळे विहिरी, बोअरवेल आटल्याने पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. तर दुसरीकडे खांबी प्रादेशिक पाणी पुरवठा योजना चालविणाºया संस्थेच्या मनमानी कारभारामुळे या पाच गावातील शेतकरी रबी हंगामापासून वंचित राहावे लागत असल्याचा आरोप नवेगावबांध येथील शेतकºयांनी केला आहे.सखोल चौकशीची मागणीप्रादेशिक पाणी पुरवठा विभाग व पाटबंधारे विभागाच्या अधिकाºयांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करुन संबंधीतांवर फौजदारी कारवाई करण्याची मागणी ग्रामवासीयांनी केली आहे.गावकºयांचे निस्तार हक्काचे संरक्षण करणारी ग्रामपंचात नवेगावबांध याबाबत काय भूमिका घेते, याकडे समस्त गावकºयांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :Waterपाणी