शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
3
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
4
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
5
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
6
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
7
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
8
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
9
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
10
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
11
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
12
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
13
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
14
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
15
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
16
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
17
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
18
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
19
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
20
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली

वाहन चोरांची आंतरराज्यीय टोळी अटक

By admin | Updated: December 18, 2014 01:21 IST

जिल्ह्यात वाहन चोरांच्या टोळीने मोठ्या प्रमाणात वाहन चोरी करुन सीमेलगतच्या राज्यात या वाहनांची विक्री करुन विल्हेवाट लावली जात आहे.

आमगाव : जिल्ह्यात वाहन चोरांच्या टोळीने मोठ्या प्रमाणात वाहन चोरी करुन सीमेलगतच्या राज्यात या वाहनांची विक्री करुन विल्हेवाट लावली जात आहे. त्यामुळे पोलिसांपुढे या वाहन चोरांचे मोठे आव्हान पुढे ठाकले होते. आमगाव पोलिसांनी या टोळीतील सदस्यांना अटक करुन १४ वाहने हस्तगत करण्यात यश मिळविले आहे.आामगाव तालुक्यातील विविध परिसरातून तसेच जिल्ह्यातील विविध ठिकाणाहुन वाहन चोरांच्या टोळीने दुचाकी वाहनांवर हात साफ करुन या वाहनांची विक्री करुन जवळच्या छत्तीगसड व मध्यप्रदेश राज्यातील विविध भागात विल्हेवाट लावली होती.आमगाव येथील व्यवसायी विजयकुमार अग्रवाल यांची दुचाकी चोरांनी बनावट किल्लीच्या आधाराने चोरी केली. या वाहनचोरीची दखल घेत आमगाव पोलिसांनी वाहन चोरांचा पाठलाग करीत चोरट्यांच्या टोळीला गाठले. शहरातील शंकर सलुनजवळून दुचाकी वाहन चोरी प्रकरणात वाहनांसह अटक करण्यात आलेला आरोपी दीपक नारद खरे (१८) रा.ग्राम खजरी जि. राजनांदगाव (छत्तीसगड) या अरोपीला ८ डिसेंबरला अटक केली. या आरोपीने दुचाकी वाहन चोरीत स्वत:सह टोळी सक्रिय असल्याची माहिती पोलिसांनी दिली. प्रकरणाच्या तपासाकरीता उपविभागीय अधिकारी अजय देवरे यांच्या मार्गदर्शनारत पथक तयार करुन पोलीस निरीक्षक बी.डी. मडावी, उपनिरीक्षक सचिन पवार, पोलीस हवालदार निलू बैस, खेमराज खोब्रागडे, विनोद बरैया, देवचंद सोनटक्के यांनी कारवाई करीत छत्तीसगड राज्यातील विविध ठिकाणाहून ३४ दुचाकी वाहन हस्तगत केले. प्रकरणातील आरोपी जुळे भाऊ विनोद साधुराम मच्छिरके उर्फ मस्करे (२१) रा. टेकापार पो. पिपरीया ता. खैरागड जि. राजनांदगाव राज्य छत्तीसगड, विनोद साधुराम मच्छिरके (२१) याला अटक करण्यात यश मिळविले. दुचाकी वाहन चोरणाऱ्या आंतरराज्यीय टोळीतील सदस्य राज्यातील चोरटी वाहनांची विक्री कमी किंमतीत स्वत:च्या नातेवाईकांना करीत असल्याची माहिती आरोपींनी दिली. आमगाव पोलिसांनी अटक केलेली आरोपींमध्ये विनोद तसेच विनोद मच्छिरके हे दोघे जुळे भाऊ असून कमी वेळात श्रीमंत होण्यासाठी चोरीकडे वळल्याची त्यांनी माहिती दिली. (शहर प्रतिनिधी)वाहनचोरांचे छत्तीसगड व मध्यप्रदेशात वास्तव्यमहाराष्ट्र राज्यातील सीमा लगतच्या जिल्ह्यातील दुचाकी वाहनांची चोरी मोठ्या प्रमाणात होत असताना चोरांचा पाठलाग करण्यासाठी पोलिसांची दमछाक व्हायची. वाहन चोरांची माहिती मिळत नसल्याने नागरिकांमध्ये पोलीस विभागावर ताशेरे ओठण्यात येत असे. यातच आमगाव येथील वाहन चोरी प्रकरणातील चोरीची माहिती पुढे आली. यामध्ये महाराष्ट्रतील सीमा भागातून वाहनांची चोरी करणारी टोळी छत्तीसगड, मध्यप्रदेशात असल्याचे उघड झाले.