शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

आंतरराष्ट्रीय शाळेचे नावच आले ‘वांद्यात’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2018 21:42 IST

महाराष्ट्रात १३ ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शाळा तयार करण्यात आल्या. या १३ ही शाळांचे लोकार्पण मुंबई येथून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे २५ डिसेंबरला व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे करणार आहेत. या सर्व शाळांना भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळा असे नाव देण्याच्या सूचना राज्यसरकार कडून देण्यात आल्या होत्या.

ठळक मुद्देविदेशातील शिक्षण मिळणार : शहीद जान्या तिम्याचं नाव कायम ठेवा

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : महाराष्ट्रात १३ ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शाळा तयार करण्यात आल्या. या १३ ही शाळांचे लोकार्पण मुंबई येथून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे २५ डिसेंबरला व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे करणार आहेत. या सर्व शाळांना भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळा असे नाव देण्याच्या सूचना राज्यसरकार कडून देण्यात आल्या होत्या. परंतु गोरेगाव येथे तयार होणाऱ्या या शाळेत नावाला घेऊन वाद निर्माण झाला आहे. भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळा नावाऐवजी शहीद जान्या तिम्या आंतरराष्ट्रीय शाळा हेच नाव कायम ठेवण्याची मागणी केली जात आहे.शासकीय शाळांना आता चांगले दिवस यावे, मुलांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण मिळावे यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था, आदिवासी विकास विभाग, सामाजिक न्याय विभाग व शालेय शिक्षण विभागाच्या शाळा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शाळा करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. गोरेगाव येथील शहीद जान्या-तिम्या जि.प.उच्च प्राथमिक शाळेत ‘ओजस’ आंतरराष्ट्रीय शाळा सत्र २०१८-१९ पासून सुरूवात करण्यात येत आहे. २५ विद्यार्थ्यांना नर्सरी ते केजी-२ चे शिक्षण दिले जाणार आहे. आंतरराष्ट्रीय शाळा तयार करण्याच्या पहिल्या टप्यात १३ शाळांची ओजस म्हणून निवड करण्यात आली. आंतरराष्ट्रीय शाळांना महाराष्टÑ विद्या प्राधिकरणाच्या आंतरराष्ट्रीय कक्षातून मार्गदर्शन व सहकार्य मिळणार आहे. एक ओजस शाळेच्या अंतर्गत नऊ तेजस आंतरराष्ट्रीय शाळा तयार करण्यात येईल असे शासनाचे म्हणणे होते. परंतु या तेजस शाळासंदर्भात विचार करण्यात आला नाही. राज्याचे शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार यांनी विदेशाच्या धर्तीवर महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे म्हणून पुढाकार घेतला होता. २५ डिसेंबर रोजी महाराष्ट्रातील १३ ही शाळांचे नामकरण व लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला. गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव येथे तयार करण्यात आलेल्या या आंतरराष्ट्रीय शाळेला भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी असे नाव देण्याचे ठरविण्यात आले. मुख्यमंत्र्याच्या हस्ते व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे हे लोकार्पण करण्यात येणार होते. लोकार्पण कार्यक्रमाला उदघाटक म्हणून जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले, अध्यक्षस्थानी जि.प. अध्यक्ष सीमा मडावी राहणार आहेत. परंतु अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावाला घेऊन गोरेगावतील काही लोकांनी तिव्र विरोध दर्शविला.त्यामुळे भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या जागी त्या शाळेचे जूनेच नाव शहीद जान्या-तिम्या आंतरराष्ट्रीय शाळाच राहणार असल्याचे जवळ-जवळ निश्चीत मानले जात आहे.पत्रिका, बॅनर्स व नामफलक बदलणारदोन दिवसावर येऊन ठेपलेल्या आंतरराष्ट्रीय शाळा लोकार्पण कार्यक्रमाच्या ५०० पत्रिका शिक्षण विभागाने छापून त्या वाटपही केल्या. त्या पत्रिकेत भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी असे नाव देण्यात आले आहे. परंतु त्या पत्रिका गोरेगावातील लोकांच्या हातात पडल्याने त्यांनी तिव्र विरोध दर्शविला. परिणामी शिक्षण विभागाने जूनेच नाव देण्याचे ठरविले आहे. या नावाच्या घोळाला घेऊन प्रकरण मुंबईपर्यंत पोहचले. त्यामुळे मुंबईवरून झालेल्या हालचालीवरून हे नाव बदलल्याचे कळते. तीन होर्डिंग, ५०० पत्रिका व नामफलक बदलविण्याची प्रक्रीया शिक्षण विभागाने सुरू केली आहे.आनंददायी शिक्षण; पण नावासाठी वादशासनमान्य आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रम, दर्र्जेदार व गुणवत्तायुक्त शिक्षण, प्रशस्त वर्गखोल्या, मोठी पटांगण, खेळणी साहित्य, तज्ज्ञ महिला शिक्षिका, डिजीटल शिक्षण, वाहतूक व्यवस्था व आनंददायी कृतीतून शिक्षण दिले जाणार आहे. लोकसहभागावर ही शाळा चालणार आहे.या शाळेसाठी राज्यस्तरीय संस्थेकडून चाचणी परीक्षेद्वारे गुणवंत शिक्षकांची निवड जात आहे. बालकांच्या सर्वांगीण बौद्धीक, शारीरिक व शैक्षणिक स्तर उंचावण्यासाठी शिक्षकांना वेळोवेळी प्रशिक्षण दिले जाणार आहे.आनंददायी पध्दतीतून देण्यात येणाºया शाळेच्या नावासाठी वाद निर्माण झाला आहे.

टॅग्स :Schoolशाळा