शहरं
Join us  
Trending Stories
1
विंडिजची 'मसल पॉवर' संपली! रसेलची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून अचानक निवृत्ती, 'या' दिवशी शेवटची मॅच
2
व्वा रं पठ्ठ्या !! मगरीनं अचानक येऊन त्याचं डोकं जबड्यात धरलं, पण धाडसाने वाचवले स्वत:चे प्राण
3
विठुरायाच्या कृपेने अवचितराव पुन्हा स्वगृही! घर सोडून गेले अन् तब्बल २० वर्षांनी परतले मुळगावी...
4
पत्नीला पोटगी देण्यासाठी बेरोजगार बनला ‘चेनस्नॅचर’; नागपुरच्या पाच जबरी चोरीच्या गुन्ह्यांची उकल
5
धक्कादायक! नागपूर मध्यवर्ती कारागृहात अंडरविअरच्या इलॅस्टिकने कैद्याने घेतली फाशी
6
२५ लाखांची टेस्ला ६० लाखांना घ्यावी लागतेय, जबाबदार कोण? आदित्य ठाकरेंचा सवाल; म्हणाले, "अडचणी आणल्या नसत्या तर..."
7
VIDEO: घाबरलेली अँकर Live शो सोडून पळाली... स्फोटांनी हादरलं सिरिया; हल्ल्याने उडाली दाणादाण
8
खापरी–गुमगावदरम्यान ऑटोमॅटिक ब्लॉक सिग्नलिंग सिस्टम; मध्य रेल्वेकडून तंत्रज्ञानाची कास
9
कौतुकास्पद! उद्योगांच्या मदतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ शिकवणार कार्पोरेट प्रशासन
10
'महाराष्ट्र मेरीटाईम समिट २०२५' मुळे राज्याच्या सागरी क्षेत्राला बळकटी मिळेल- नितेश राणे
11
विशेष मुलांचे प्रश्न सोडवण्यासाठी शासन सहकार्य करणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही
12
"सोबतचे जड झाले असतील म्हणून..."; CM फडणवीसांनी दिलेल्या ऑफरवर ठाकरेंचे प्रत्युत्तर
13
₹96 च्या IPO वर गुंतवणूकदारांच्या उड्या, 142 पट सब्सक्राइब झाला; GMP ला 43 रुपयांचा फायदा!
14
भयानक!! इस्रायलचा सीरियाच्या संरक्षण मंत्रालयावर मोठा हल्ला; संपूर्ण इमारतीच्या चिंधड्या, पाहा VIDEO
15
₹ 350 वरून थेट ₹19 वर आला हा शेअर, आता लागतंय 10% चं अप्पर सर्किट; करतोय मालामाल
16
“CM फडणवीस रामासारखे चारित्र्यवान, कृष्णासारखे चतूर”; भाजपा आमदारांकडून कौतुकाचा वर्षाव
17
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
18
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
19
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
20
Budget Cars: कुटुंबासाठी कमी बजेटमध्ये ७-सीटर कार शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन! 

अपघात विम्याप्रकरणी विमा कंपनीला झटका

By admin | Updated: March 12, 2015 01:12 IST

शेतकरी अपघात विम्याच्या प्रकरणात दावा मंजूर करण्यास टाळाटाळ करणाऱ्या न्यू इंडिया इंशुरंस कंपनीला ग्राहक तक्रार निवारण न्यायमंचाने चांगलाच झटका दिला.

गोंदिया : शेतकरी अपघात विम्याच्या प्रकरणात दावा मंजूर करण्यास टाळाटाळ करणाऱ्या न्यू इंडिया इंशुरंस कंपनीला ग्राहक तक्रार निवारण न्यायमंचाने चांगलाच झटका दिला. शेतकऱ्याला पत्नीला एक लाख रूपये देण्याचा आदेश सदर न्यू इंडिया विमा कंपनीला दिला.देवरीच्या वॉर्ड-३ येथील रहिवासी शेतकरी राजकुमार हिरामन वैद्य यांचा मृत्यू ५ मार्च २०१२ रोजी ट्रक चालकाच्या बाजून बसून जाताना ट्रेलरने दिलेल्या धडकेत झाला. त्यांची पत्नी मंजू वैद्य यांनी न्यू इंडिया विमा कंपनीकडे शेतकरी अपघात विम्याचा दावा दाखल केला. मात्र जवळपास दोन वर्षाचा कालावधी लोटूनही सदर कंपनीने दावा मंजूर किंवा नामंजूर, असे कळविले नव्हते. त्यामुळे तिने नुकसान भरपाईसह त्रासाचा खर्च मिळविण्यासाठी न्यायमंचात तक्रार दाखल केली. न्यायमंचाने विरुद्ध पक्षाचे न्यू इंडिया विमा कंपनीचे विभागीय व्यवस्थापक, क्षेत्रीय व्यवस्थापक व देवरीचे तालुका कृषी अधिकारी यांना नोटिसेस पाठविल्या. त्यांनी न्यायमंचात उपस्थित राहून आपला लेखी जबाब नोंदविला. त्यात मंजू वैद्य यांनी व्हिसेरा रिपोर्ट सादर न केल्यामुळे दावा फेटाळण्यात आल्याचे व तसे कळविल्याचे नमूद केले. तसेच मृतकाच्या रासायनिक पृथ:करणाच्या अहवालाबाबत डॉक्टरांचे अभिप्राय प्रमाणपत्र मिळत नसल्याबाबत वारसदाराचा अर्ज आल्याचे कृषी अधिकाऱ्याने नमूद केले होते. तक्रारकर्ती मंजू वैद्यच्या बाजूने अ‍ॅड. उदय क्षिरसागर व विरूद्ध पक्षाच्या बाजूने अ‍ॅड.इंदिरा बघेले यांनी युक्तिवाद केला. याबाबत न्यायमंचाने कारणमिमांसा केली. त्यात शेतकरी राजकुमार वैद्य यांचा मृत्यू ट्रक चालकाच्या बाजूने बसून जाताना ट्रेलरच्या धडकेत झाला. शासन निर्णयानुसार रस्ता अपघाताबाबत दावा करताना जे कागदपत्रे लागतात, त्यात कुठेही रासायनिक विश्लेषण अहवालावर संबंधित डॉक्टरचे मत आवश्यक असल्याचा उल्लेख नाही. चालक वगळता शेतकऱ्याचा अपघात झाल्यास वारसदारांना दावा रक्कम देण्याचे स्पष्ट नमूद आहे. (प्रतिनिधी)