शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण अपघात! चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
2
'आता हिशोब सरळ आहे'; राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येताच भाजपने मांडलं मतांचे गणित, आकडेवारीत कोण वरचढ?
3
३ तासांत चेकद्वारे पैसे मिळणार का? आरबीआयने ऐनवेळी घेतला मोठा निर्णय, वाचा नवे परिपत्रक
4
तैवानमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के, समोर आला इमारत हलतानाचा धडकी भरवणारा VIDEO
5
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
6
मेहुण्याचा जाच आणि भावाचा राग! दारू पाजली अन् सपासप केले वार; वादाचं कारण ऐकून होईल संताप
7
घटस्फोटानंतर मुलांपासून दूर झाली अभिनेत्री, पतीने ख्रिसमसलाही भेटू दिलं नाही; म्हणाली...
8
एक दोन नाही...! पंधरा राज्यांमध्ये बहिणी झाल्या लाडक्या; त्या कुठे कुठे करतात खर्च...
9
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
10
'धुरंधर'च्या FA9LA गाण्यावर स्वत:च्याच लग्नात नाचला मराठी अभिनेता, सगळे बघतच राहिले, व्हिडीओ व्हायरल
11
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
12
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
13
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
14
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
15
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
16
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
17
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
18
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
19
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
20
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
Daily Top 2Weekly Top 5

अपघात विम्याप्रकरणी विमा कंपनीला झटका

By admin | Updated: March 12, 2015 01:12 IST

शेतकरी अपघात विम्याच्या प्रकरणात दावा मंजूर करण्यास टाळाटाळ करणाऱ्या न्यू इंडिया इंशुरंस कंपनीला ग्राहक तक्रार निवारण न्यायमंचाने चांगलाच झटका दिला.

गोंदिया : शेतकरी अपघात विम्याच्या प्रकरणात दावा मंजूर करण्यास टाळाटाळ करणाऱ्या न्यू इंडिया इंशुरंस कंपनीला ग्राहक तक्रार निवारण न्यायमंचाने चांगलाच झटका दिला. शेतकऱ्याला पत्नीला एक लाख रूपये देण्याचा आदेश सदर न्यू इंडिया विमा कंपनीला दिला.देवरीच्या वॉर्ड-३ येथील रहिवासी शेतकरी राजकुमार हिरामन वैद्य यांचा मृत्यू ५ मार्च २०१२ रोजी ट्रक चालकाच्या बाजून बसून जाताना ट्रेलरने दिलेल्या धडकेत झाला. त्यांची पत्नी मंजू वैद्य यांनी न्यू इंडिया विमा कंपनीकडे शेतकरी अपघात विम्याचा दावा दाखल केला. मात्र जवळपास दोन वर्षाचा कालावधी लोटूनही सदर कंपनीने दावा मंजूर किंवा नामंजूर, असे कळविले नव्हते. त्यामुळे तिने नुकसान भरपाईसह त्रासाचा खर्च मिळविण्यासाठी न्यायमंचात तक्रार दाखल केली. न्यायमंचाने विरुद्ध पक्षाचे न्यू इंडिया विमा कंपनीचे विभागीय व्यवस्थापक, क्षेत्रीय व्यवस्थापक व देवरीचे तालुका कृषी अधिकारी यांना नोटिसेस पाठविल्या. त्यांनी न्यायमंचात उपस्थित राहून आपला लेखी जबाब नोंदविला. त्यात मंजू वैद्य यांनी व्हिसेरा रिपोर्ट सादर न केल्यामुळे दावा फेटाळण्यात आल्याचे व तसे कळविल्याचे नमूद केले. तसेच मृतकाच्या रासायनिक पृथ:करणाच्या अहवालाबाबत डॉक्टरांचे अभिप्राय प्रमाणपत्र मिळत नसल्याबाबत वारसदाराचा अर्ज आल्याचे कृषी अधिकाऱ्याने नमूद केले होते. तक्रारकर्ती मंजू वैद्यच्या बाजूने अ‍ॅड. उदय क्षिरसागर व विरूद्ध पक्षाच्या बाजूने अ‍ॅड.इंदिरा बघेले यांनी युक्तिवाद केला. याबाबत न्यायमंचाने कारणमिमांसा केली. त्यात शेतकरी राजकुमार वैद्य यांचा मृत्यू ट्रक चालकाच्या बाजूने बसून जाताना ट्रेलरच्या धडकेत झाला. शासन निर्णयानुसार रस्ता अपघाताबाबत दावा करताना जे कागदपत्रे लागतात, त्यात कुठेही रासायनिक विश्लेषण अहवालावर संबंधित डॉक्टरचे मत आवश्यक असल्याचा उल्लेख नाही. चालक वगळता शेतकऱ्याचा अपघात झाल्यास वारसदारांना दावा रक्कम देण्याचे स्पष्ट नमूद आहे. (प्रतिनिधी)