शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

अस्वलाच्या हल्ल्यात जखमीची वन विभागाकडून थट्टा

By admin | Updated: October 15, 2015 02:04 IST

सडक-अर्जुनी तालुक्यातील कोहळीपार (शेंडा) येथील कास्तकार संतोष तेजराम वरकडे (४५) हे आपल्या शेतात गेले असता त्यांच्यावर अस्वलाने हल्ला करून...

शेंडा-कोयलारी : सडक-अर्जुनी तालुक्यातील कोहळीपार (शेंडा) येथील कास्तकार संतोष तेजराम वरकडे (४५) हे आपल्या शेतात गेले असता त्यांच्यावर अस्वलाने हल्ला करून जबर जखमी केले होते. नुकसान भरपाई म्हणून वन विभागाने १ हजार २७० रुपयाचा चेक देऊन त्यांची थट्टाच केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सविस्तर असे की, ६ आॅगस्ट २०१४ रोजी सकाळी ६ वाजताच्या दरम्यान सदर कास्तकार नित्याप्रमाणे धानाच्या बांध्यात पाणी आहे किंवा नाही हे बघण्यासाठी गेला असता त्यांच्यावर अस्वलाने हल्ला करून जबर जखमी केले होते. चेहऱ्याला नखाने गोटून डोळ्या खालचा मांस काढून टाकला होता. शेतकऱ्याच्या कुत्र्याने जोरजोराने भूकुंन अस्वलाला पळून जाण्यास भाग पाडले. त्याच शेतशिवारातील इतर कास्तकार धावून गेले असता संतोष वरखडे जखमी अवस्थेत पडले होते. आरडाओरड झाल्याने इतरही लोक जमा झाले व जखमी संतोषला उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले. जखमीवर प्रथमोपचार करून त्वरित केटीएस रुग्णालय गोंदिया येथे पुढील उपचारासाठी पाठविले. त्यांची अवस्था बघून तेथून लगेच वैद्यकीय महाविद्यालय नागपूर येथे हलविण्यात आले. तेथे दोन आठवडे उपचार चालला. परिस्थिती हलाखीची असल्याने गावातील लोकांनी मदत केली तर काही रक्कम कर्जाच्या स्वरुपात घेऊन औषधोपचार केला. हिंस्त्र पशूने हल्ला केल्याने वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी दखल घेऊन पंचनामा करून नुकसान भरपाई देण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. चेहरा विद्रुप झाल्याने डॉ.के.के. रामटेके यांच्याकडून सर्जरी करून घेतली, त्याचा खर्च १९ हजार ७०० रुपये आला होता. नुकसान भरपाई मिळाल्यावर इतरांकडून घेतलेली रक्कम परत करणार होते. वन विभागाच्या अधिकाऱ्यांकडे चकरा मारतामारता जवळपास एक वर्षाचा कालावधी लोटला. त्यानंतर त्यांना वन विभाग कार्यालय गोंदिया यांच्याकडून फक्त १ हजार २७० रुपयांचा चेक देण्यात आला. चेकची रक्कम बघून पीडित कास्तकाराला धक्काच बसला. हिंस्त्र पशूपासून मृत्यू पावले त्यांना अथवा गंभीर जखमींना शासन लाखोचा निधी देतो. मग एवढ्या गंभीर जखमीला १ हजार २७० रूपयांचा चेक कोणत्या आधारे देण्यात आला, हे न उलगडणारे कोडे आहे. वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून पीडित व्यक्तीला त्वरित नुकसान भरपाईची रक्कम अदा करण्यात यावी, अशी मागणी पीडित व्यक्तीने केली आहे. (वार्ताहर)