शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
7
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
8
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

रस्ते विकासातून येणार औद्योगिक क्रांती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2018 22:30 IST

शेतकऱ्यांच्या समृध्दीमुळेच परिसर खºया अर्थाने समृध्द होईल.शेतकरी अधिक समृध्द व्हावा यासाठी परिसराचा सर्वांगिन विकास होणे आवश्यक आहे. रस्त्यांचा विकासामुळेच परिसरात उद्योग धंदे स्थापन होवून औद्योगिक क्रांती होण्यास मदत होईल.

ठळक मुद्देगोपालदास अग्रवाल : ११ कोटी रुपयांच्या कामांचे भूमिपूजन

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शेतकऱ्यांच्या समृध्दीमुळेच परिसर खºया अर्थाने समृध्द होईल.शेतकरी अधिक समृध्द व्हावा यासाठी परिसराचा सर्वांगिन विकास होणे आवश्यक आहे. रस्त्यांचा विकासामुळेच परिसरात उद्योग धंदे स्थापन होवून औद्योगिक क्रांती होण्यास मदत होईल. तसेच रोजगाराच्या संधी निर्माण होतील असे प्रतिपादन गोपालदास अग्रवाल यांनी केले.तालुक्यातील देवरी-सोनबिहरी-बलमाटोला, देवरी-किन्ही-डांर्गोली-तेढवा या ११ कोटी रुपयांच्या रस्ता बांधकामाच्या भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून जि.प.अध्यक्ष सीमा मडावी, जि.प.आरोग्य व शिक्षण सभापती रमेश अंबुले, पं.स.सभापती माधुरी हरिणखेडे, उपसभापती चमन बिसेन, विमल नागपूरे, प्रकाश रहमतकर, नटवर जैतवार, सरोज मस्करे, निता पटले, विनिता टेंभरे, रुखन चिखलोंडे, चैनलाल लिल्हारे, हनस गराडे, रामेश्वर हरिणखेडे, मनोज नागपुरे, डॉ. मनोहर चिखलोंडे, जयचंद डहारे, ओम रहांगडाले, विक्की बघेले, योगेश बिसेन, व्यकंट मेश्राम, मिना चोखांद्रे, कृपाल लिल्हारे, नमिता शहारे उपस्थित होते. अग्रवाल म्हणाले, या क्षेत्रातील शेतकऱ्यांची सिंचनाची समस्या दूर करण्यासाठी येणाºया काळात नवेगाव-देवरी उपसा सिंचन योजनेची मदत होणार आहे. या योजनेचे काम लवकरच सुरू करण्यात येणार आहे. याचा लाभ दवनीवाडा, धापेवाडा, रतनारा या परिसरातील शेतकऱ्यांना मिळेल. या योजनेचे पाणी थेट बाघ सिंचन प्रकल्पांच्या नहरांव्दारे सोडण्यात येणार असून यामुळे या क्षेत्रात हरितक्रांती येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आ. अग्रवाल यांच्या माध्यमातून मागील २५ वर्षांपासून या क्षेत्रात विविध विकास कामे सुरू आहेत. त्यांनी ग्रामीण भागातील शेवटच्या घटकांपर्यंत पोहचून त्यांच्या समस्या दूर करण्याचा प्रयत्न केल्याचे जि.प.सदस्य रुद्रसेन खांडेकर यांनी सांगितले. अर्जुन नागपुरे यांनी आ.अग्रवाल यांच्या माध्यमातून सिंचन, रस्ते तसेच शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यातील त्रृटी दूर करण्यास मदत झाली.त्यांच्याच सक्षम नेतृत्त्वामुळे परिसराचा सर्वांगिन विकास झाल्याचे सांगितले. या वेळी आ.अग्रवाल यांच्या हस्ते रस्ता बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले.

टॅग्स :Gopaldas Agarwalगोपालदास अग्रवाल