शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
4
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
5
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
6
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
7
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
8
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
9
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
10
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
11
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
12
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
13
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
14
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
15
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
16
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
17
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
18
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
19
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

अस्ताव्यस्त पार्र्कींगमुळे वाहन चोरीत वाढ

By admin | Updated: August 15, 2016 00:35 IST

गोंदिया जिल्ह्यात दुचाकी पळविण्याचे मोठे प्रमाण आहे. महिन्याकाठी सहा मोटारसायकल पळविण्यात येत असल्याची टक्केवारी मागच्या वर्षी होती.

गर्दीच्या ठिकाणांवर चोरट्यांची नजर: हँडल लॉक केलेली वाहनेही पळविली जातात गोंदिया : गोंदिया जिल्ह्यात दुचाकी पळविण्याचे मोठे प्रमाण आहे. महिन्याकाठी सहा मोटारसायकल पळविण्यात येत असल्याची टक्केवारी मागच्या वर्षी होती. यंदा या आकडेवारीत वाढ झाली आहे. परंतु या मोटारसायकल चोरांना पकडण्यात जिल्हा पोलीस अपयशी ठरले आहेत. आरोपींनी गर्दीच्या ठिकाणी असलेल्या अस्ताव्यस्त वाहनांवर करडी नजर ठेवून त्या गाडी मालकाची नजर चुकवून मोटारसायकल पळविण्याचा उपक्रम सुरू केला आहे. परंतु ते मोटारसायकल चोरटे पोलिसांच्या हातात आले नाही. चोरलेल्या मोटारसायकलवरचा लगेच क्रमांक काढून ते वाहन राजरोसपणे शहरात किंवा जिल्ह्यात चालविल्या जातात. चोरलेल्या वाहनांवर बोगस क्रमांक लावून ते वाहन नेहमी वापरण्यात येत असते. गोंदिया शहरातून सर्वात जास्त वाहने चोरीला जातात. बेशिस्त पार्र्कींगचा फायदा घेत ते वाहन चोरण्यास चोरट्यांना सहज शक्य होते. गोंदियातील बेशिस्त पार्कीेंगमुळे वाहन चोरट्यांना वाहन पळविणे सहज शक्य होते. याकडे लक्ष देण्याची मागणी आहे. (तालुका प्रतिनिधी) गर्दीचे ठिकाण चोरट्यांचे ‘लक्ष्य’ मोटारसायकल चोरी करणारे आरोपी गर्दीचा फायदा घेत वाहन चोरी करतात. गोंदिया शहरातून चोरीला गेलेल्या मोटारसायकल सर्वात जास्त गर्दीच्या ठिकाणातून पळविण्यात आल्या आहेत. रेल्वेस्थानक, बँक परिसर, रूग्णालय, बसस्थानक व बाजार परिसरातून या मोटारसायकल पळविल्या आहेत. गर्दीचा फायदा घेत वाहनाला पळवून नेण्यात चोरटे यशस्वी होतात. वाहनचालकांनी हे करावे वाहन चालकांनी नेहमी आपल्या सोबत वाहनाचे कागदपत्र ठेवावे. परंतु ते कागदपत्र वाहनाच्या डिक्कीत न ठेवता स्वत:कडे ठेवावे. वाहनच्या डिक्कीत कागदपत्र ठेवले व ते वाहन चोरीला गेल्यास त्या वाहनाला विकणे आरोपीला सोपे जाते.त्यासाठी वाहनाच्या डिक्कीत कागदपत्र ठेवू नये. चोरीची वाहने जात असताना पोलिसांना ओळखता येत नाही त्यासाठी प्रत्येक वाहन चालकाने आरसी बुकची झेरॉक्स तरी आपल्याकडे ठेवल्यास वाहन चोरीवर आळा घालण्यासाठी मदत होईल. रात्रीच्या वेळी आपल्या घरी वाहन ठेवताना त्या वाहनांना लोखंडी साखळीने बांधून ठेवावे. ५ रूपयांसाठी ५० हजार जातात रेल्वेस्थानकाच्या बाहेर शेकडो गाड्या बेवारस पडलेल्या असतात. रेल्वेस्थानकावर मोटारसायकल ठेवण्यासाठी स्टँड आहे. मात्र ५ रूपये गाडीच्या सुरक्षेसाठी न देण्याची मानसिकता ठेवणाऱ्या व्यक्तींचे ५० हजार रूपयाचे वाहन चोरीला जाते.