शहरं
Join us  
Trending Stories
1
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
2
मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
3
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
4
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
5
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
6
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
7
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
8
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
9
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
10
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
11
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
12
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
13
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
14
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
15
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
16
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
17
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
18
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
19
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
20
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार

लहान मुलांना वटवृक्षाप्रमाणे वाढवावे

By admin | Updated: February 6, 2016 01:51 IST

लहान मुलांना वटवृक्षाप्रमाणे वाढवावे. ज्याप्रमाणे आपण वटवृक्ष लावतो, त्यापासून फूल, फळ व सावली मिळते. रोपटे लावल्यापासून त्यांची देखरेख व निगा राखतो.

कार्लेकर : बाल कल्याण जनजागृती कार्यक्रमगोठणगाव : लहान मुलांना वटवृक्षाप्रमाणे वाढवावे. ज्याप्रमाणे आपण वटवृक्ष लावतो, त्यापासून फूल, फळ व सावली मिळते. रोपटे लावल्यापासून त्यांची देखरेख व निगा राखतो. त्याप्रमाणे लहान मुलांची काळजी व निगा राखावी, असे दिवाणी न्यायाधीश कार्लेकर म्हणाले.पंचायत समिती अर्जुनी-मोरगाव येथील सभागृहात बालकल्याण न्यायमंडळ व बालकल्याण जनजागृती कार्यक्रम घेण्यात आले. याप्रसंगी अध्यक्षस्थानी तहसीलदार बाम्बोर्डे व उद्घाटक न्यायाधीश कार्लेकर होते. अतिथी म्हणून खंड विकास अधिकारी नारायण जमईवार, ठाणेदार नामदेव बंडगर, अ‍ॅड. कापगते, पालीवाल, बनपुरकर, जिल्हा बालकल्याण अधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते. न्यायाधीश कार्लेकर पुढे म्हणाले, शेतकरी आत्महत्या करतो. परंतु तो आत्महत्या का करतो? याच्या मुळापर्यंत जाऊन त्याचे संशोधन करणे गरजेचे आहे. तेव्हाच परिवर्तन घडून येऊ शकते. एवढेच नाही तर मुलांमध्ये दहशत निर्माण होऊ नये, असे कृत्य आपण करु नये, याची काळजी घेणे प्रत्येक पालकाचे कर्तव्य आहे. विद्यार्थ्यांना प्रोजेक्ट तयार करण्यास सांगितले जाते. प्रोजेक्ट वेडावाकडा जरी केला तरी त्या मुलाचे आपापल्या परिने भेटवस्तू देऊन स्वागत केले पाहिजे. त्यामुळे त्या मुलाला आपोआपच दुसऱ्यांदा अधिक चांगला प्रोजेक्ट तयार करण्याची प्रवृती निर्माण होईल.मंचावरील मान्यवरांनी बालगुन्हेगारीच्या संबंधात मोलाचे मार्गदर्शन केले. शिबिरामध्ये अर्जुनी मोरगाव तालुक्यातील पोलीस पाटील, अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनिस, पर्यवेक्षिका, बचत गटाच्या कार्यकर्त्या, ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी उपस्थित होते. प्रास्ताविक महिला व बालकल्याण अधिकारी उषा आखरे, संचालन विस्तार अधिकारी भुरे व आभार पर्यवेक्षिका सुनीता दमाहे यांनी केले. (वार्ताहर)