शहरं
Join us  
Trending Stories
1
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
2
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
3
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
4
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
5
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
6
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
7
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
8
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
9
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
10
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
11
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
12
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
13
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
14
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
15
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
16
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
17
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
18
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
19
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
Daily Top 2Weekly Top 5

वातावरण बदलाने रुग्णसंख्येत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2019 22:06 IST

मे महिन्याची सुरुवात होण्यापूर्वीच सूर्य आग ओकू लागला आहे. उन्हाचा पारा ४२ अंशांवर पोहोचल्याने जीवाची काहिली होत आहे. वाढत्या उन्हामुळे ताप, सर्दी, खोकला, घसादुखी या विषाणूजन्य आजारांसह उष्माघाताचे रूग्ण आढळून येत आहेत. व्हायरल फीव्हर व उष्माघाताची लक्षणे दिसत असल्याने लगेच औषधोपचार करणे गरजेचे झाले आहे. उन्हाचा तडाखा आणि आजारांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.

ठळक मुद्देकधी उन्ह तर कधी वादळ : दवाखान्यात रूग्णांची गर्दी, लहान्यांसह मोठेही आजारी

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : मे महिन्याची सुरुवात होण्यापूर्वीच सूर्य आग ओकू लागला आहे. उन्हाचा पारा ४२ अंशांवर पोहोचल्याने जीवाची काहिली होत आहे. वाढत्या उन्हामुळे ताप, सर्दी, खोकला, घसादुखी या विषाणूजन्य आजारांसह उष्माघाताचे रूग्ण आढळून येत आहेत. व्हायरल फीव्हर व उष्माघाताची लक्षणे दिसत असल्याने लगेच औषधोपचार करणे गरजेचे झाले आहे. उन्हाचा तडाखा आणि आजारांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.वाढत्या उन्हामुळे दुपारी १२ वाजतापासून रस्ते भकास होतात. तापमानात वाढ झाल्याने शीतपेयांची विक्री वाढली आहे. रस्त्यावर फिरणाऱ्या ऊसाच्या रसाच्या बंड्याही सुगीचे दिवस अनुभवत आहे. विद्यार्थ्यांसाठी परीक्षांचा काळ असला तरी बहुतांश लोक पंखे, कुलरच्या गारव्यात दुपारी घरीच राहणे पसंत करतात. वाढत्या उन्हामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते. यामुळे टरबूज, अननस, अंगूर, खरबूज आदी पाण्याचे प्रमाण अधिक असलेल्या फळांची तसेच काकडी, निंबू, पालेभाज्या यांचीही मागणी बाजारात वाढल्याचे दिसून येत आहे.वाढत्या तापमानात काकडी, टरबूज, अंगूर ही फळे वापरल्याने पाण्याची कमतरता भरून काढणे शक्य आहे. जलजन्य फळांची वाढती मागणी लक्षात घेता बाजारात फळविक्रेते सर्वच प्रकारची फळे विक्रीस ठेवून ग्राहकांची गरज भागवित असल्याचे दिसून येत आहे. बहुतांश फळे कार्बाइडने पिकविली जात असली तरी मगजदार पिवळी टेंभर, आंबटगोड चवीच्या खिरण्या बेपत्ता असल्याचे दिसून येते. यामुळे आरोग्याला रानमेवा मिळणे कठीण झाले आहे.वाढत्या उन्हामुळे डोक्याला बांधावयाचे दुपट्टे, स्कार्फ व टोप्यांची मागणी वाढली आहे. उन्हापासून डोळ्यांचे संरक्षण करणारे सनगॉगल्स मोठ्या प्रमाणात विकले जात आहेत. यावर्षी आॅनलाईन खरेदीला युवक, महिला अधिक प्राधान्य देत असल्याचे दिसून येत आहे. विविध संकेतस्थळाच्या माध्यमातून वस्तू बोलविण्यावर अधिक भर दिसून येत आहे.यामुळे बाजारात या वस्तूंना अधिक उठाव नसला तरी आॅनलाईन बाजार मात्र फुलल्याचे दिसून येत आहे. वाढत्या उन्हामुळे विषाणूजन्य आजारांसह उष्माघाताचे रूग्णही आढळून येत आहेत. यामुळे अधिक उन्हात जाण्याचे टाळले पाहिजे, असे मत वैद्यकीय तज्ज्ञ व्यक्त करतात.अधिक पाणी पिणे गरजेचेरूग्णांच्या संख्येत विशेष वाढ झाली नसली तरी उष्माघाताचे रूग्ण आढळून येत आहेत. बालकांमध्ये पाण्याचे प्रमाण कमी होत असल्याने हगवण, उलटी, पोटदुखी आदी विकार दिसून येत आहे. हे टाळण्यासाठी बालकांना उन्हात अधिक वेळ खेळू न देणे, बाहेर घेऊन न जाणे, अधिक पाणी पिणे हे उपाय करणे गरजेचे आहे.जलयुक्त फळांच्या विक्रीत वाढतापमानात वाढ झाल्याने शीतपेयांची विक्रीही कमालीची वाढली आहे. शहरातील चौक, रस्त्यांवर असलेल्या रसवंत्यांमध्ये नागरिकांची गर्दी वाढल्याचे दिसून येत आहे. रस्त्यावर फिरणाऱ्या ऊसाच्या रसाच्या बंड्यांनाही सुगीचे दिवस आल्याचे दिसून येत आहे. शिवाय बर्फगोले, कुल्फी आदींच्या विक्रीतही वाढ झाली आहे.