शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

बेरोजगारांच्या संख्येत वाढ

By admin | Updated: July 15, 2015 02:20 IST

संगणकीय युगात भारताने घोडदौड सुरू ठेवली असून संगणकानंतर अत्याधुनिक यंत्रे उपलब्ध होऊ लागली आहेत.

गोंदिया : संगणकीय युगात भारताने घोडदौड सुरू ठेवली असून संगणकानंतर अत्याधुनिक यंत्रे उपलब्ध होऊ लागली आहेत. शेतातील पीक काढत असताना त्याचप्रमाणे खोदकाम अथवा कोणतीही कामे यंत्रामार्फत केली जातात. यामुळे मजुरांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे.भारतात संगणकाने प्रवेश केला. त्या पाठोपाठ विविध यंत्रणा कामाला लागल्याने शासकीय कामातही मोठ्या प्रमाणात यंत्राचा वापर होऊ लागला आहे. एकीकडे शासन रोजगार हमी योजना सारख्या कामातून यंत्राचा वापर करु लागला आहे. कुठल्याही शहरात शासकीय स्तरावर खोदकाम असो किंवा कोणत्याही बांधकामासाठीचे खोदकाम असो यंत्राद्वारे अगदी कमी वेळात उरकवून घेतले जाते. ज्या ठिकाणी शेकडो मजूर पूर्वी कामाला लावले जात होते, त्या ठिकाणी कमी मजुरांकडून कामे करवून घेण्याचा प्रकार मोठ्या प्रमाणात सुरू आहे. ही सर्व कामे यंत्रांकडून केली जात आहेत. देशात बेरोजगारांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढत होत आहे. तसेच यंत्रांच्याही संख्येत वाढ होत आहे. शासकीय कंत्राटदार लाखो रुपये खर्च करून यंत्र खरेदी करीत असतात. सिमेंट, काँक्रेटचे काम करण्यासाठीसुद्धा आता यंत्र उपलब्ध झाले आहे. यामुळे सिमेंट, रेती, गिट्टी यांना एकत्रीत करुन बांधकामही लवकरात लवकर केले जाते.शेतातही ट्रॅक्टरसारख्या यंत्राने मशागत केली जाते. वखर, नागर यासारखी शेतोपयोगी अवजारे आता नेस्तनाबूत झाली आहेत. शेतीला मजूर नाही व सुशिक्षितांना काम नाही अशी स्थिती आहे. (तालुका प्रतिनिधी)