शहरं
Join us  
Trending Stories
1
MVA MNS Morcha Live: ‘सत्याचा मोर्चा’साठी पुन्हा ठाकरे बंधू एकत्र; उद्धव अन् राज ठाकरे मोर्चास्थळी निघाले
2
"नरेंद्र मोदींची छाती ११२ इंचाची, अवघ्या ५ तासांत पूर्ण पाकिस्तानवर कब्जा केला असता, पण..."
3
“मविआचे ३१ खासदार निवडून आले, तेव्हा मतचोरी झाली का”; भाजपाचा सवाल, राज ठाकरेंबद्दल म्हणाले... 
4
Andhra Pradesh Stampede: आंध्र प्रदेशच्या व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात चेंगराचेंगरी; ९ भक्तांचा मृत्यू 
5
आज पुन्हा घसरलं सोनं-चांदी, लग्नसराईला सुरुवात होण्यापूर्वी किती स्वस्त झाला? पटापट चेक करा लेटेस्ट रेट
6
भारतानं मिळवलं दहशतवादावर नियंत्रण, २०१३ नंतर कुठेही मोठा दहशतवादी हल्ला नाही - अजित डोवाल
7
"७५ वर्षांत काश्मीर ताब्यात घेता आले नाही अन्..."; तालिबानने पाकिस्तानच्या दुखऱ्या बाजूवर मीठ रगडले....
8
'या' रेल्वे कंपनीला मुंबई मेट्रोकडून मिळालं २४८१ कोटी रुपयांचं काम, फोकसमध्ये राहणार शेअर्स
9
Mumbai Traffic Update: मनसेचा 'सत्याचा मोर्चा', मुंबईच्या वाहतुकीत बदल;  'या' भागांत रस्त्यांवर निर्बंध, पोलिसांच्या सूचना
10
Plastic Bans: महाराष्ट्राच्या शेजारी राज्याने प्लास्टिक वापराबाबत उचललं कठोर पाऊल!
11
केरळमध्ये आता कुणीही 'अत्यंत गरीब' नाही, मुख्यमंत्री पिनराई विजयन यांचा मोठा दावा
12
टेस्ला... सॅम अल्टमन बुक करून फसला; साडे सात वर्षे झाली डिलिव्हरीच मिळाली नाही, रिफंड तर...
13
शुक्र गोचर २०२५: २ नोव्हेंबर, कार्तिकीच्या मुहूर्तावर 'मालव्य' राजयोगात ५ राशींना धन-समृद्धी योग!
14
SSC-HSC Exam Dates: महाराष्ट्र बोर्डाच्या दहावी-बारावी परीक्षा २०२६ चे वेळापत्रक जाहीर; पहिला पेपर कधी?
15
KYC पूर्ण नसेल तर FASTag बंद होणार का; पाहा NHAI काय म्हटलं? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
16
श्रेयस अय्यरबाबत मोठी अपडेट; रुग्णालयातून आज डिस्चार्ज मिळाला, लगेचच भारतात आणले जाणार?
17
Satyacha Morcha: राज ठाकरे लोकल ट्रेनमधून पोहोचले, तिकीटावर ऑटोग्राफ दिला; 'सत्याचा मोर्चा'ला अद्याप पोलिसांची परवानगी नाही
18
“प्रत्येक संकटाच्या डोळ्यात डोळे घालून तू लढतोस, जिंकतोस”; आदित्य ठाकरेंची राऊतांसाठी पोस्ट
19
IND vs SA World Cup Final: दक्षिण आफ्रिकेचा पुरुष संघ 'चोकर्स', महिलांचा संघ कसा? भारतासोबत ३४ सामने झाले, त्यापैकी...
20
Social Viral: उत्तराखंडच्या 'या' सरोवरात पाणी नाही, तर आहेत फक्त सांगाडे; काय आहे गूढ?

ग्रामीण भागातील आरोग्य सुविधेत वाढ करा ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:29 IST

गोंदिया : जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक झाला असून ग्रामीण भागात रुग्ण संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे आरोग्य सुविधा ...

गोंदिया : जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक झाला असून ग्रामीण भागात रुग्ण संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे आरोग्य सुविधा अपुऱ्या पडत असून ग्रामीण भागातील रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी कोविड केअर सेंटर तसेच आरोग्य विषयक सोयीसुविधांमध्ये वाढ करण्याची मागणी माजी आ. राजेंद्र जैन यांनी पालकमंत्री नवाब मलिक यांच्याकडे केली आहे.

जिल्ह्यात दररोज ६०० कोरोनाबाधित रुग्णांची भर पडत आहे. परिणामी शासकीय आणि खासगी रुग्णालयातसुध्दा जागा अपुरी पडत आहे. खाटा कमी पडत असल्याने रुग्ण उपचारासाठी वेटिंगवर असल्याचे चित्र बिकट आहे. गोंदिया येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात केवळ एकच आरटीपीसीआर चाचणी प्रयोगशाळा असल्याने या प्रयोगशाळेवरील ताण वाढला आहे. त्यामुळे रुग्णांना अहवाल मिळण्यास विलंब होत असल्याने रुग्ण संख्येत वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नवीन आरटीपीसीआर मशीन त्वरित खरेदी करण्यात यावी. येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात १३ हजार लिटर क्षमतेचे ऑक्सिजन जनरेशन प्लांट मंजूर करण्यात आले आहे. त्यामुळे तो लवकर सुरु झाल्यास जिल्ह्यात ऑक्सिजनची समस्या निर्माण होणार नाही. मागील काही दिवसांपासून रुग्ण संख्येत वाढ होत असल्याने रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे रुग्णांचा जीव धोक्यात आला आहे. त्यामुळे रेमडेसिविर इंजेक्शनचा त्वरित पुरवठा करण्यात यावा. शासकीय रुग्णालयात ऑक्सिजन बेडची संख्या वाढविण्यासाठी ऑक्सिजनची खरेदी करण्यात यावी. गोंदिया येथे एकमेव शासकीय रक्तपेढी असून त्यात वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे रिक्त असून आवश्यक सोयी सुविधासुध्दा नाहीत. त्यामुळे नेहमीच रक्ताचा तुटवडा जाणवत असतो. त्यामुळे या पीढीचे आधुनिकीकरण करण्यात यावे. अदानी वीज प्रकल्पाच्या सीएसआर निधीतून ऑक्सिजन टँक उभारण्याचे काम सुरु असून ते युध्द पातळीवर पूर्ण करण्यात यावे. केटीएस रुग्णालयातील डॉक्टरांची हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था करण्यात यावी. तसेच ऑक्सिजनची समस्य दूर करण्यासाठी भिलाई येथून लिंक करण्यात यावे. आदी मागण्याबाबत खा. प्रफुल्ल पटेल आणि माजी आ. राजेंद्र जैन, मनोहर चंद्रिकापुरे यांनी पालकमंत्री नवाब मलिक यांचे लक्ष वेधले. यावेळी गंगाधर परशुरामकर, रमेश ताराम, विनीत सहारे व पक्ष के पदाधिकारी उपस्थित होते.

.......

प्रफुल्ल पटेल यांची पालकमंत्र्याशी चर्चा

पालकमंत्री नवाब मलिक हे शुक्रवारी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. या दरम्यान खा. प्रफुल्ल पटेल यांनी त्यांच्याशी मोबाईलवरुन तब्बल २० मिनिटे चर्चा करुन जिल्ह्यात आरोग्य विषयक सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्यास सांगितले. ऑक्सिजन आणि रेमडेसिविर इंजेक्शनचा पुरेसा साठा उपलब्ध करुन देण्याची मागणी केली.

....

लसींचा पुरेसा पुरवठा करा

कोरोनाचा संसर्ग वाढत असून त्याला प्रतिबंध लावण्यासाठी लसीकरण हा एक प्रभावी उपाय आहे. जिल्ह्यात आतापर्यंत सव्वा लाख नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. मात्र लसींचा पुरवठा होत नसल्याने वांरवार लसीकरण मोहिमेला ब्रेक लागत आहे. लसीकरण मोहिमेची गती वाढविण्यासाठी पुरेशा प्रमाणात लसींचा पुरवठा करण्यात यावा.

.....