शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सेंट्रल स्टेशनचे नाव बदलले जाणार, नवे नाव काय असणार? CM देवेंद्र फडणवीस म्हणाले...
2
हरयाणा,गोव्यासह लडाखला मिळाले नवे राज्यपाल; घोष, गुप्ता आणि गजपती राजू यांची राष्ट्रपतींकडून नियुक्ती
3
"तुला पक्षात यावं लागेल"; उद्धव ठाकरेंच्या ऑफरवर प्रवीण दरेकर म्हणाले, "मी बाळासाहेबांचा शिवसैनिक"
4
IND vs ENG : जड्डू -ब्रायडन कार्स यांच्यात टक्कर! मग वातावरण चांगलेच तापलं! नेमकं काय घडलं?
5
अस्तित्वातच नसलेला माणूस बनला जगातील बारावी सर्वात श्रीमंत व्यक्ती, कोण आहे तो? एवढी आहे एकूण संपत्ती
6
जिममध्ये चोरी करणं महागात पडलं, ट्रेनरनं अशी शिक्षा दिली की...; आता चोर कधी मनात चोरीचा विचारही आणणार नाही!
7
IND vs ENG : गौतम गंभीरने Live सामन्यात दिली शिवी; अपशब्द उच्चारतानाचा Video झाला व्हायरल
8
पाकिस्तान जय श्रीरामच्या घोषणेने दुमदुमले; कराचीत मुस्लिम कलाकारांकडून रामलीलेचे सादरीकरण
9
काव्या मारनचा अजब निर्णय ! ५० विकेट्सही न घेता आलेल्या गोलंदाजाला केलं SRH 'बॉलिंग कोच'
10
"सरकार आणि उद्योगपतींच्या फायद्यासाठी जनसुरक्षा कायदा, काँग्रेस त्याची प्रत्येक जिल्ह्यात होळी करणार”, हर्षवर्धन सपकाळ यांची घोषणा
11
नो टॅक्स, नो टेन्शन! 'या' देशांमध्ये श्रीमंत लोकही भरत नाहीत एक रुपयाही कर, मग पैसा कुठून येतो?
12
खऱ्या आयुष्यातही सचिवजी अन् रिंकी प्रेमात? सानविकाच्या 'त्या' उत्तरावर जितेंद्र लाजला
13
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा जास्त उकळणं आरोग्यासाठी हानिकारक, कारण...
14
वैभव सूर्यवंशीची स्फोटक फलंदाजीनंतर आता गोलंदाजीत कमाल! युवा टीम इंडियाकडून कसोटीत रचला इतिहास
15
"नाव घ्यायला भीती वाटते तर बोलू नका" ; आदित्य ठाकरेंनी चड्डी बनियन गॅँगचा उल्लेख करताच राणे संतापले
16
घरभाडं, वीजबिल भरायला पैसे नव्हते, राष्ट्रीय खेळाडू बनले चोर, व्यापाऱ्याचं अपहरण करून लुटले, त्यानंतर... 
17
भाच्याच्या प्रेमात वेडी झालेली बायको पळाली, घरी आणण्यासाठी गेलेल्या नवऱ्याचा हार्ट अटॅकने मृत्यू
18
भारताच्या शेअर बाजारात घसरण, पण पाकिस्तानच्या स्टॉक मार्केटमध्ये तुफान तेजी; १,३५,००० अंकांच्या पार, कारण काय?
19
"पहाटे ४ वाजता उठतो, रात्री ८ ला झोपतो", लेकाची शिस्त पाहून आर माधवनही होतो दंग; म्हणाला...
20
IND vs ENG :दुखापतग्रस्त पंत 'डिफेन्स' करताना फसला! जोफ्रा आर्चरची 'वेदनादायी' गोलंदाजी

नवेगावबांध येथे अशुद्ध पाणी पुरवठा

By admin | Updated: August 2, 2015 01:59 IST

येथील ग्राम पंचायतमार्फत नळ योजना चालविण्यात येत आहे. सदर योजनेला जल शुध्दीकरणाची व्यवस्था नसल्याकारणाने तलावातील पाणी सरळसरळ नळाद्वारे पुरविल्या जाते.

प्रश्न आरोग्याचा : डायरियासह विविध आजार जडू शकतात नवेगावबांध : येथील ग्राम पंचायतमार्फत नळ योजना चालविण्यात येत आहे. सदर योजनेला जल शुध्दीकरणाची व्यवस्था नसल्याकारणाने तलावातील पाणी सरळसरळ नळाद्वारे पुरविल्या जाते. पावसाळ्याच्या दिवसात तलावाचे पाणी गढूळ असते. त्यामुळे गावातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. नवेगावबांध येथे अनेक वर्षापासून ग्रामपंचायतीद्वारे नळ योजना राबविण्यात येत आहे. यामध्ये नवेगावबांध जलाशयाचे पाणी मोटारपंपाद्वारे गावातील पाणी टाकीमध्ये भरले जाते. तेच पाणी नळाद्वारे नागरिकांना पुरविले जाते. वास्तविकपणे पावसाळ्याच्या दिवसात विविध ठिकाणचे पाणी तलावात वाहून येते. त्यामुळे तलावाचे पाणी गढूळ झाले आहे. त्याच पाण्याचा पुरवठा नळ योजनेद्वारे नागरिकांना केला जातो. विशेषत: पावसाळ्यामध्ये अनेक संक्रामक रोग पाण्याद्वारे पसरत असतात. अशातच पाणी जर अशुध्द येत असेल तर त्याची शक्यता अधिक असते. वास्तविकपणे नवेगावबांध जलाशयावर खांबी प्रादेशिक पाणी पुरवठा योजना व सिरेगावबांध प्रादेशिक पाणी पुरवठा योजना सध्या सुरू आहेत. या दोन्ही योजनांद्वारे परिसरातील २२ गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. परंतु या योजनांमध्ये नवेगावबांधचा समावेश करण्यात आला नाही. ज्या गावच्या तलावावर दोन-दोन पाणी पुरवठा योजनेचे पंप आहेत. त्याच गावाचा योजनेत समावेश करण्यात आला नाही याबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. शुध्द पिण्याचे पाणी मिळणे हा नागरिकांचा अधिकार आहे. त्या अधिकारालाच डावलण्यात येत असल्याचे बोलले जाते. पिण्याच्या पाण्याच्या बदल्यात नागरिक पाणीपट्टी कर देखील देतात परंतु सदर पाण्याच्या शुध्दतेकडे विशेषत: लक्ष दिले जात नाही याचेही आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. चांगल्या बाबीसाठी ग्रामपंचायतने धाडसी निर्णय घेणे आवश्यक आहे. परंतु येथे देखील मतांचे राजकारण होत असल्यामुळे तसे निर्णय घेतले जात नाहीत असा अनेकांचा आरोप आहे. त्यामुळे ग्रामपंचायतने आता तरी शुध्द पाण्याचा पुरवठा करून नागरिकांच्या आरोग्याची काळजी घ्यावी अशी नागरिकांची मागणी आहे. (वार्ताहर)