शहरं
Join us  
Trending Stories
1
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
2
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
3
"आदित्य ठाकरे बुरख्यात लपून भारत-पाकिस्तान मॅच पाहतील"; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
4
'या' देशाने मंत्रिमंडळात आणला AI मंत्री ! राजकारणाच्या इतिहासात पहिल्यांदाच असा प्रयोग
5
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
6
वर्गमित्रांचा प्रताप! झोपेत असताना डोळ्यात टाकलं फेविक्विक; ८ विद्यार्थ्यांचे चिकटले डोळे अन्...
7
पत्नीला ५ गोळ्या घातल्या, क्राइम सीनवरून फेसबुक लाईव्ह केलं; पती म्हणाला, "हिचे बॉयफ्रेंड पळून गेले..." 
8
शुबमन गिलच्या फोटोपेक्षा हातातल्या घड्याळ्याची रंगली चर्चा, किंमत ऐकाल तर अवाक् व्हाल...
9
क्रूरतेचा कळस! मिठाई ताजी नाही हे ऐकताच दुकानदार संतापला; १० वर्षांच्या मुलाला बेदम मारहाण
10
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात जन्मलेल्या बाळांचे भविष्य कसे असते? शुभ की? ज्योतिष शास्त्राने केला उलगडा!
11
४०००० कोटींचे उत्पन्न, ७० लाख नोकऱ्या; नितीन गडकरींनी दिला कमाईचा नवा मंत्र, कुणाला फायदा?
12
उमेश सहकलाकार नसता तर मी हा सिनेमा केला नसता, प्रिया बापटने सांगितलं कारण
13
२, ३, ४BHK घर बांधायचेय? जीएसटीचा किती फायदा होणार? सिमेंट, सळ्या, टाईल्स कितीने स्वस्त झाल्या
14
गर्लफ्रेंडने ब्लॉक केलं, प्रेमभंग जीवावर बेतला, तरुणाने उचलले टोकाचे पाऊल; उपचारादरम्यान मृत्यू
15
१०% नं घसरलाय हा शेअर, पण अजूनही IPO च्या किंमतीपेक्षा ६०% नं अधिक; काय म्हणाले एक्सपर्ट?
16
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
17
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
18
ऑपरेशन मध्यातच सोडून पाकिस्तानी डॉक्टर झाला गायब! नर्सने दुसऱ्या रूमचा दरवाजा उघडताच दिसला धक्कादायक प्रकार
19
अंकिता लोखंडेचा नवरा रुग्णालयात दाखल; हाताला ४५ टाके अन्... मित्राने शेअर केली पोस्ट
20
प्रेम कहाणीचा दुर्दैवी अंत! ६ महिन्यापूर्वी प्रियकरासोबत लग्न केलेल्या युवतीने उचललं टोकाचं पाऊल

नवेगावबांध येथे अशुद्ध पाणी पुरवठा

By admin | Updated: August 2, 2015 01:59 IST

येथील ग्राम पंचायतमार्फत नळ योजना चालविण्यात येत आहे. सदर योजनेला जल शुध्दीकरणाची व्यवस्था नसल्याकारणाने तलावातील पाणी सरळसरळ नळाद्वारे पुरविल्या जाते.

प्रश्न आरोग्याचा : डायरियासह विविध आजार जडू शकतात नवेगावबांध : येथील ग्राम पंचायतमार्फत नळ योजना चालविण्यात येत आहे. सदर योजनेला जल शुध्दीकरणाची व्यवस्था नसल्याकारणाने तलावातील पाणी सरळसरळ नळाद्वारे पुरविल्या जाते. पावसाळ्याच्या दिवसात तलावाचे पाणी गढूळ असते. त्यामुळे गावातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. नवेगावबांध येथे अनेक वर्षापासून ग्रामपंचायतीद्वारे नळ योजना राबविण्यात येत आहे. यामध्ये नवेगावबांध जलाशयाचे पाणी मोटारपंपाद्वारे गावातील पाणी टाकीमध्ये भरले जाते. तेच पाणी नळाद्वारे नागरिकांना पुरविले जाते. वास्तविकपणे पावसाळ्याच्या दिवसात विविध ठिकाणचे पाणी तलावात वाहून येते. त्यामुळे तलावाचे पाणी गढूळ झाले आहे. त्याच पाण्याचा पुरवठा नळ योजनेद्वारे नागरिकांना केला जातो. विशेषत: पावसाळ्यामध्ये अनेक संक्रामक रोग पाण्याद्वारे पसरत असतात. अशातच पाणी जर अशुध्द येत असेल तर त्याची शक्यता अधिक असते. वास्तविकपणे नवेगावबांध जलाशयावर खांबी प्रादेशिक पाणी पुरवठा योजना व सिरेगावबांध प्रादेशिक पाणी पुरवठा योजना सध्या सुरू आहेत. या दोन्ही योजनांद्वारे परिसरातील २२ गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. परंतु या योजनांमध्ये नवेगावबांधचा समावेश करण्यात आला नाही. ज्या गावच्या तलावावर दोन-दोन पाणी पुरवठा योजनेचे पंप आहेत. त्याच गावाचा योजनेत समावेश करण्यात आला नाही याबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. शुध्द पिण्याचे पाणी मिळणे हा नागरिकांचा अधिकार आहे. त्या अधिकारालाच डावलण्यात येत असल्याचे बोलले जाते. पिण्याच्या पाण्याच्या बदल्यात नागरिक पाणीपट्टी कर देखील देतात परंतु सदर पाण्याच्या शुध्दतेकडे विशेषत: लक्ष दिले जात नाही याचेही आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. चांगल्या बाबीसाठी ग्रामपंचायतने धाडसी निर्णय घेणे आवश्यक आहे. परंतु येथे देखील मतांचे राजकारण होत असल्यामुळे तसे निर्णय घेतले जात नाहीत असा अनेकांचा आरोप आहे. त्यामुळे ग्रामपंचायतने आता तरी शुध्द पाण्याचा पुरवठा करून नागरिकांच्या आरोग्याची काळजी घ्यावी अशी नागरिकांची मागणी आहे. (वार्ताहर)