शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
4
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
5
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
6
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
7
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
8
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
9
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
10
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
11
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
12
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
13
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
14
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
15
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
16
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
17
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
18
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
19
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
20
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक

नवेगावबांध येथे अशुद्ध पाणी पुरवठा

By admin | Updated: August 2, 2015 01:59 IST

येथील ग्राम पंचायतमार्फत नळ योजना चालविण्यात येत आहे. सदर योजनेला जल शुध्दीकरणाची व्यवस्था नसल्याकारणाने तलावातील पाणी सरळसरळ नळाद्वारे पुरविल्या जाते.

प्रश्न आरोग्याचा : डायरियासह विविध आजार जडू शकतात नवेगावबांध : येथील ग्राम पंचायतमार्फत नळ योजना चालविण्यात येत आहे. सदर योजनेला जल शुध्दीकरणाची व्यवस्था नसल्याकारणाने तलावातील पाणी सरळसरळ नळाद्वारे पुरविल्या जाते. पावसाळ्याच्या दिवसात तलावाचे पाणी गढूळ असते. त्यामुळे गावातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. नवेगावबांध येथे अनेक वर्षापासून ग्रामपंचायतीद्वारे नळ योजना राबविण्यात येत आहे. यामध्ये नवेगावबांध जलाशयाचे पाणी मोटारपंपाद्वारे गावातील पाणी टाकीमध्ये भरले जाते. तेच पाणी नळाद्वारे नागरिकांना पुरविले जाते. वास्तविकपणे पावसाळ्याच्या दिवसात विविध ठिकाणचे पाणी तलावात वाहून येते. त्यामुळे तलावाचे पाणी गढूळ झाले आहे. त्याच पाण्याचा पुरवठा नळ योजनेद्वारे नागरिकांना केला जातो. विशेषत: पावसाळ्यामध्ये अनेक संक्रामक रोग पाण्याद्वारे पसरत असतात. अशातच पाणी जर अशुध्द येत असेल तर त्याची शक्यता अधिक असते. वास्तविकपणे नवेगावबांध जलाशयावर खांबी प्रादेशिक पाणी पुरवठा योजना व सिरेगावबांध प्रादेशिक पाणी पुरवठा योजना सध्या सुरू आहेत. या दोन्ही योजनांद्वारे परिसरातील २२ गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. परंतु या योजनांमध्ये नवेगावबांधचा समावेश करण्यात आला नाही. ज्या गावच्या तलावावर दोन-दोन पाणी पुरवठा योजनेचे पंप आहेत. त्याच गावाचा योजनेत समावेश करण्यात आला नाही याबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. शुध्द पिण्याचे पाणी मिळणे हा नागरिकांचा अधिकार आहे. त्या अधिकारालाच डावलण्यात येत असल्याचे बोलले जाते. पिण्याच्या पाण्याच्या बदल्यात नागरिक पाणीपट्टी कर देखील देतात परंतु सदर पाण्याच्या शुध्दतेकडे विशेषत: लक्ष दिले जात नाही याचेही आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. चांगल्या बाबीसाठी ग्रामपंचायतने धाडसी निर्णय घेणे आवश्यक आहे. परंतु येथे देखील मतांचे राजकारण होत असल्यामुळे तसे निर्णय घेतले जात नाहीत असा अनेकांचा आरोप आहे. त्यामुळे ग्रामपंचायतने आता तरी शुध्द पाण्याचा पुरवठा करून नागरिकांच्या आरोग्याची काळजी घ्यावी अशी नागरिकांची मागणी आहे. (वार्ताहर)