शहरं
Join us  
Trending Stories
1
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
2
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
3
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
4
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
5
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
6
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
7
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
8
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
9
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
10
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
11
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
13
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
14
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
15
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
16
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
17
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
18
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
19
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
20
सहाव्या वर्षी वडिलांना एक चाल सांगितली अन्...; कोनेरू हम्पीची खास आठवण

बिघडलेली आरोग्य सेवा सुधारा

By admin | Updated: May 25, 2017 00:47 IST

जिल्ह्याचे शेवटच्या टोकापासून येणाऱ्या महिला प्रसूती व इतर आजाराकरीता दाखल होतात. महिलांसाठी असलेल्या या एकमेव रुग्णालयाची परिस्थिती सद्या विदारक आहे.

बीजीडब्ल्यूतील बालमृत्यूची चौकशी करा : प्रफुल्ल पटेलांच्या नेतृत्वात १ जूनला आंदोलनलोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्याचे शेवटच्या टोकापासून येणाऱ्या महिला प्रसूती व इतर आजाराकरीता दाखल होतात. महिलांसाठी असलेल्या या एकमेव रुग्णालयाची परिस्थिती सद्या विदारक आहे. बालमृत्यू दर हा कमी व्हावा हा शासनाचा दृष्टीकोण असला तरी या रुग्णालयात १ एप्रिल ते १३ मे २०१७ पर्यंत ३४ बालकांचा मृत्यू झाल्याचे प्रकरण बाहेर आल्याने शासन व जिल्हा प्रशासन या विषयावर किती गंभीर आहे हे स्पष्ट होते. याची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी खा. प्रफुल पटेल यांनी केली आहे.जिल्हास्तरावर महिलांसाठी शासनाच्या वतीने चालविण्यात येणारे बाई गंगाबाई हे एकमेव महिला रुग्णालय आहे. या रुग्णालयासारखी जिल्ह्यातील इतर आरोग्य केंद्रात परिस्थिती आहे यात शंका नाही. गंगाबाईतील बालमृत्यू प्रकरणाची शासनाने वरिष्ठ पातळीवरून तातडीने चौकशी करावी व दोषीवर कारवाई करावी, मृत्यूमुखी पडलेल्या बालकांच्या कुटुंबाला तातडीने शासनाने आर्थिक मदत करावी, अशी मागणी खा. प्रफुल पटेल यांनी शासनाकडे केली आहे. गंगाबाईचे बालमृत्यू प्रकरण शासनाला काळीमा फासणारे आहे. या गंभीर प्रकरणाच्या बाबतीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष १ जूनला गोंदिया येथे धरणे आंदोलन करून या प्रकरणाला वाचा फोडण्याचे काम करणार, अशी माहिती खा. पटेल यांनी दिली. जिल्हास्तरावरील महिलांसाठी असलेले बाई गंगाबाई रुग्णालय गोरगरीब व सामान्य माणसाचे आशा स्थान आहे. जिल्ह्यातील विविध प्राथमिक आरोग्य केंद्रामधून व नागरिकांकडून महिलांना प्रसूतीसाठी व इतर आजारासाठी या रुग्णालयात दाखल केले जाते. सद्याच्या काळात या महिला रुग्णालयाची परिस्थिती विदारक असल्याचे जाणवत आहे. सद्या हे रुग्णालय जिल्ह्यात चर्चेचा विषय झाला आहे. या रुग्णालयात तातडीने सुधारणा करणे गरजेचे आहे. एकीकडे राज्य सरकार व केंद्र सरकार प्रसिध्दी माध्यमाच्या वतीने सर्वांना आरोग्याकडे विशेष लक्ष असल्याचे सांगते मात्र या रुग्णालयात दिड महिन्यात ३४ बालकांचा मृत्यू होणे ही जिल्हा प्रशासनाला, केंद्र आणि राज्याला काळीमा फासणारी गोष्ट आहे. कुपोषण मुक्त भारत करण्याची घोषणा करणाऱ्या शासनाला याचा विसर पडला असेच म्हणावे लागेल. आरोग्य सुविधा ही आवश्यक सेवा असून ही गोंदिया जिल्ह्यात ही परिस्थिती निर्माण व्हावी ही सुध्दा शरमेची बाब आहे. ज्यांचे मूल दगावलीत त्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळलेला आहे. जिल्हा स्तरावरील रुग्णालयात ही परिस्थिती निर्माण झाली आहे. ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद व उपकेंद्रात काय अवस्था असेल याची कल्पनाच न केलेली बरी. जिल्ह्यातील संपूर्ण आरोग्य सेवा कोलमडून पडलेली आहे असेच म्हणावे लागेल. सदर प्रकार अत्यंत धक्कादायक व मनसुन्न करणारा आहे. या प्रकरणाची शासनाने वरिष्ठ पातळीवरुन तातडीने चौकशी करावी, दोषींवर तातडीने कारवाई करावी, कर्मचाऱ्यांची रिक्त पदे तातडीने भरावी, मूल दगावली त्या परिवाराला शासनाने तातडीने आर्थिक मदत द्यावी, शासनाने संबधितांना न्याय दिला नाही तर १ जून रोजी गोंदिया येथे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने धरणे आंदोलन करून न्याय देण्यास शासनाला भाग पाडू, असे ही प्रफुल पटेल म्हणाले.