शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

बिघडलेली आरोग्य सेवा सुधारा

By admin | Updated: May 25, 2017 00:47 IST

जिल्ह्याचे शेवटच्या टोकापासून येणाऱ्या महिला प्रसूती व इतर आजाराकरीता दाखल होतात. महिलांसाठी असलेल्या या एकमेव रुग्णालयाची परिस्थिती सद्या विदारक आहे.

बीजीडब्ल्यूतील बालमृत्यूची चौकशी करा : प्रफुल्ल पटेलांच्या नेतृत्वात १ जूनला आंदोलनलोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्याचे शेवटच्या टोकापासून येणाऱ्या महिला प्रसूती व इतर आजाराकरीता दाखल होतात. महिलांसाठी असलेल्या या एकमेव रुग्णालयाची परिस्थिती सद्या विदारक आहे. बालमृत्यू दर हा कमी व्हावा हा शासनाचा दृष्टीकोण असला तरी या रुग्णालयात १ एप्रिल ते १३ मे २०१७ पर्यंत ३४ बालकांचा मृत्यू झाल्याचे प्रकरण बाहेर आल्याने शासन व जिल्हा प्रशासन या विषयावर किती गंभीर आहे हे स्पष्ट होते. याची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी खा. प्रफुल पटेल यांनी केली आहे.जिल्हास्तरावर महिलांसाठी शासनाच्या वतीने चालविण्यात येणारे बाई गंगाबाई हे एकमेव महिला रुग्णालय आहे. या रुग्णालयासारखी जिल्ह्यातील इतर आरोग्य केंद्रात परिस्थिती आहे यात शंका नाही. गंगाबाईतील बालमृत्यू प्रकरणाची शासनाने वरिष्ठ पातळीवरून तातडीने चौकशी करावी व दोषीवर कारवाई करावी, मृत्यूमुखी पडलेल्या बालकांच्या कुटुंबाला तातडीने शासनाने आर्थिक मदत करावी, अशी मागणी खा. प्रफुल पटेल यांनी शासनाकडे केली आहे. गंगाबाईचे बालमृत्यू प्रकरण शासनाला काळीमा फासणारे आहे. या गंभीर प्रकरणाच्या बाबतीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष १ जूनला गोंदिया येथे धरणे आंदोलन करून या प्रकरणाला वाचा फोडण्याचे काम करणार, अशी माहिती खा. पटेल यांनी दिली. जिल्हास्तरावरील महिलांसाठी असलेले बाई गंगाबाई रुग्णालय गोरगरीब व सामान्य माणसाचे आशा स्थान आहे. जिल्ह्यातील विविध प्राथमिक आरोग्य केंद्रामधून व नागरिकांकडून महिलांना प्रसूतीसाठी व इतर आजारासाठी या रुग्णालयात दाखल केले जाते. सद्याच्या काळात या महिला रुग्णालयाची परिस्थिती विदारक असल्याचे जाणवत आहे. सद्या हे रुग्णालय जिल्ह्यात चर्चेचा विषय झाला आहे. या रुग्णालयात तातडीने सुधारणा करणे गरजेचे आहे. एकीकडे राज्य सरकार व केंद्र सरकार प्रसिध्दी माध्यमाच्या वतीने सर्वांना आरोग्याकडे विशेष लक्ष असल्याचे सांगते मात्र या रुग्णालयात दिड महिन्यात ३४ बालकांचा मृत्यू होणे ही जिल्हा प्रशासनाला, केंद्र आणि राज्याला काळीमा फासणारी गोष्ट आहे. कुपोषण मुक्त भारत करण्याची घोषणा करणाऱ्या शासनाला याचा विसर पडला असेच म्हणावे लागेल. आरोग्य सुविधा ही आवश्यक सेवा असून ही गोंदिया जिल्ह्यात ही परिस्थिती निर्माण व्हावी ही सुध्दा शरमेची बाब आहे. ज्यांचे मूल दगावलीत त्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळलेला आहे. जिल्हा स्तरावरील रुग्णालयात ही परिस्थिती निर्माण झाली आहे. ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद व उपकेंद्रात काय अवस्था असेल याची कल्पनाच न केलेली बरी. जिल्ह्यातील संपूर्ण आरोग्य सेवा कोलमडून पडलेली आहे असेच म्हणावे लागेल. सदर प्रकार अत्यंत धक्कादायक व मनसुन्न करणारा आहे. या प्रकरणाची शासनाने वरिष्ठ पातळीवरुन तातडीने चौकशी करावी, दोषींवर तातडीने कारवाई करावी, कर्मचाऱ्यांची रिक्त पदे तातडीने भरावी, मूल दगावली त्या परिवाराला शासनाने तातडीने आर्थिक मदत द्यावी, शासनाने संबधितांना न्याय दिला नाही तर १ जून रोजी गोंदिया येथे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने धरणे आंदोलन करून न्याय देण्यास शासनाला भाग पाडू, असे ही प्रफुल पटेल म्हणाले.