शहरं
Join us  
Trending Stories
1
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
2
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
3
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
4
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
5
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
6
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
7
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
8
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
9
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
10
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
11
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
12
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
13
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
15
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
16
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
17
लेख: वीस हजार बेवारस चपलांना नव्या झिंगाट नशेचं व्यसन !
18
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
19
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
20
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 

धानपिकाच्या नुकसानीचे पंचनामे त्वरित करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2019 06:00 IST

आठवडाभरापूर्वी सडक अर्जुनी, अर्जुनी मोरगाव तालुक्यात जोरदार अवकाळी पाऊस झाला. या पावसाचा सर्वाधिक फटका धानपिकांना बसला. पावसामुळे धानाचे पीक भूईसपाट झाले तर धान पाखड झाल्याने शेतकऱ्यांचा तोंडचा घास हिरावला गेल्याने त्यांच्यावर उपासमारीचे संकट ओढावले आहे. त्यामुळे शेतकरी पूर्णपणे खचला आहे.

ठळक मुद्देमनोहर चंद्रिकापुरे : जिल्हाधिकाऱ्यांनी यंत्रणा कामाला लावावी

लोकमत न्यूज नेटवर्कअर्जुनी मोरगाव : अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावला. जिल्ह्यातील धानपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. जिल्हाधिकारी यांनी याची दखल घेऊन नुकसानीचे त्वरीत पंचनामे सुरू करण्याचे निर्देश उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांच्या अधिनस्त येणाऱ्या यंत्रणेला द्यावे असे अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राचे आ.मनोहर चंद्रिकापुरे यांनी म्हटले आहे.आठवडाभरापूर्वी सडक अर्जुनी, अर्जुनी मोरगाव तालुक्यात जोरदार अवकाळी पाऊस झाला. या पावसाचा सर्वाधिक फटका धानपिकांना बसला. पावसामुळे धानाचे पीक भूईसपाट झाले तर धान पाखड झाल्याने शेतकऱ्यांचा तोंडचा घास हिरावला गेल्याने त्यांच्यावर उपासमारीचे संकट ओढावले आहे. त्यामुळे शेतकरी पूर्णपणे खचला आहे. शेतकरी दिवाळीपूर्वी हलक्या धानाची कापणी आणि मळणी करुन विक्री करुन दिवाळी साजरी करतात. मात्र दिवाळीपूर्वीच अवकाळी पाऊस झाल्याने त्याचा कापणी केलेला धानाला सर्वाधिक फटका बसला.पावसामुळे मोठ्या प्रमाणात धान पाखड झाले तर काही प्रमाणात सडले. त्यामुळे शेतकऱ्यांवर अस्मानी संकट ओढावले आहे.अर्जुनी मोरगाव आणि सडक अर्जुनी तालुक्याचा दौऱ्या दरम्यान अनेक शेतांना भेटी देऊन नुकसानीची पाहणी केली. या दरम्यान अवकाळीमुळे धानपिकाचे मोठे नुकान झाल्याची बाब पुढे आली. शेतकऱ्यांनी सुध्दा आपल्या व्यथा मांडल्या.त्यामुळे प्रशासनाने अवकाळी पावसामुळे झालेल्या धानपिकाच्या नुकसानीचे पंचनामे त्वरीत करुन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी. असे पत्र सुध्दा चंद्रिकापुरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे. अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करताना मनोहर चंद्रिकापुरे यांच्यासह उद्धव मेंहदळे, इंद्रदास झिलपे, सुभाष देशमुख, चेतन शेंडे, यादोराव भावे, पंढरी वकेकार, तुकाराम मडावी, सर्वेश धांडे, मोरेश्वर भावे, विलास भावे, देवराव रोकडे, सचिन लांजेवार, गोपीचंद कावळे, संतोष कुळमेथे, महादेव शहारे, गोपाल अवराशे उपस्थित होते.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी