शहरं
Join us  
Trending Stories
1
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
2
सीरियावरील हल्ल्यांमुळे इराण संतापला; इस्रायलला जन्माची अद्दल घडवण्यासाठी आखला प्लॅन
3
ना कॉल ना गिफ्ट...! शमीची पोस्ट बघून हसीन जहाँच्या मनात आली ही गोष्ट, म्हणाली...
4
STनेच होणार विदर्भातील नागरिकांची नागद्वार यात्रा, दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची फोनवर चर्चा
5
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
6
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
7
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
8
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
9
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
10
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
11
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
12
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
13
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
14
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
15
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
16
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
17
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
18
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
19
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
20
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी

‘एक गाव एक गणपती’ ची संकल्पना राबवा

By admin | Updated: August 22, 2016 00:20 IST

गावांना शांततेकडून समृध्दीकडे वाटचाल करण्यास प्रोत्साहन देणाऱ्या महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेत जिल्ह्याने चांगली कामगिरी केली आहे.

पालकमंत्री बडोले : जिल्हा अंमलबजावणी समितीची बैठकगोंदिया : गावांना शांततेकडून समृध्दीकडे वाटचाल करण्यास प्रोत्साहन देणाऱ्या महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेत जिल्ह्याने चांगली कामगिरी केली आहे. तंटामुक्त गाव समित्यांनी यासाठी निश्चित कौतुकास्पद काम केले आहे. यापुढेही गावाच्या विकासासाठी तंटामुक्त समित्यांना प्रशिक्षण देऊन एक गाव एक गणपती बरोबर विविध उपक्रम राबवावे असे आवाहन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.पोलीस अधीक्षक कार्यालयातील सभागृहात पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या अध्यक्षतेखाली महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीची बैठकीत ते बोलत होते. सभेला समितीचे सदस्य जि.प.अध्यक्ष उषा मेंढे, जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी, सदस्य सचिव तथा पोलीस अधीक्षक डॉ.दिलीप पाटील-भुजबळ, सदस्य प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी जयवंत पाडवी, अपर जिल्हाधिकारी मंगेश मोहिते, अपर पोलीस अधीक्षक संदीप पखाले, निवासी उपजिल्हाधिकारी प्रविण महीरे, उपविभागीय पोलीस अधिकारी देविदास इलमकर, दिपाली खन्ना, समाजकल्याणचे सहायक आयुक्त मंगेश वानखेडे, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, प्रभारी जिल्हा व्यसनमुक्ती अधिकारी मिलींद रामटेके, जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष राधेशाम शर्मा यांच्यासह अन्य सदस्यांची उपस्थिती होती.पालकमंत्री बडोले पुढे म्हणाले, महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेच्या गाव पातळीवरील समित्यांचे गठण शासन निर्णयानुसार करण्यात यावे. समितीच्या माध्यमातून एक गाव एक गणपती स्थापन करण्यासाठी ग्रामस्थांना प्रोत्साहित करावे. हया समित्या गठण करतांना योग्य व्यक्तीची निवड करावी. समितीचे कार्य प्रभावीपणे करण्यासाठी पोलीस पाटील, समितीचे सचिव, पोलीस कर्मचारी-अधिकारी यांच्या कार्यशाळा आयोजित करण्यात यावे, प्रत्येक पोलीस स्टेशन अंतर्गत दारुबंदी झालेल्या गावांची, गुन्हे घडणाऱ््या गावांची यादी तयार करावीे, ज्या गावामधून समित्याच्या माध्यमातून चांगले काम झाले असेल त्या गावातील संबंधितांची दखल घेवून त्यांचा सन्मान करण्यात यावा असेही त्यांनी सांगितले. डॉ.सूर्यवंशी म्हणाले, एक गाव एक गणपती ही अत्यंत चांगली संकल्पना असून गावाला एकजूट करण्यासाठी तंटामुक्त समित्यांनी यासाठी पुढाकार घ्यावा. तंटामुक्त समित्या हया सक्र ीयपणे कशाप्रकारे काम करतील याचे नियोजन करावे. डॉ.भूजबळ म्हणाले, महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेच्या कामात जिल्ह्याने आघाडी घेतली आहे. भविष्यात जिल्ह्यात गाव पातळीवर तंटे होवूच नये यादृष्टीने प्रयत्न करण्यात येतील. गाव पातळीवर सुरक्षा दल तयार करण्यात येतील. पोलिसांना सहकार्य करण्यासाठी ग्रामस्थांनी पुढे आले पाहिजे. गावाची सुरक्षा गावकऱ्यांच्या हाती देण्याचा आपला प्रयत्न असून याबाबत नियोजन करण्यात येत आहे. जिल्ह्यातील २५६ गावे तंटामुक्त झाले आहेत. यामध्ये नक्षलदृष्ट्या अतिसंवेदनशील असलेल्या भागातील ११४ गावांचा समावेश आहे. ६२ ग्रामपंचायतींना विशेष पुरस्कार देण्यात आला आहे. या ५५६ गावांना १४ कोटी ७ लक्ष २५ हजार रुपयाचे पुरस्कार देण्यात आला आहे. २०१५-१६ यावर्षात जुलै अखेर दिवाणी, महसूली, फौजदारी व इतर दाखल ६ हजार ३२० तंट्यांपैकी ४३९१ तंटे निकाली काढण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ.भूजबळ यांनी दिली. यावेळी पोलीस विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. आभार पोलीस अधीक्षक डॉ.दिलीप पाटील-यांनी मानले.(तालुका प्रतिनिधी)