शहरं
Join us  
Trending Stories
1
"तर मी फडणवीसांना या जन्मी माफ करणार नाही", अंजली दमानियांची पोस्ट, 'तो' फोटोही केला शेअर
2
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
3
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
4
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
5
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
6
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
7
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
8
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
9
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
10
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
11
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
12
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
13
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
14
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
15
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
16
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
17
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
18
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
19
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
20
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
Daily Top 2Weekly Top 5

अंतर्गत बंडखोरीवर औषध न मिळल्यास आजार वाढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2021 05:00 IST

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी सर्वच प्रमुख राजकीय पक्षांचे उमेदवार निश्चित झाले आहे. राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना या तीन पक्षांचे मिळून महाविकास आघाडीचे सरकार आहे; पण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याचा सर्वच पक्षांनी सूर आळवला, त्यामुळे अद्यापही या निवडणुकीत युती किंवा आघाडी झाली नाही. त्यामुळे या निवडणुका स्वतंत्र लढल्या जाणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.

 अंकुश गुंडावार लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्हा परिषद निवडणुकीची उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आहे. सोमवारी (दि.६) जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. यानंतर सर्वच क्षेत्रांतील लढतींचे चित्र स्पष्ट होणार आहे. अनेक इच्छुक उमेदवारांना तिकीट न मिळाल्याने ते बंडखोरीच्या पावित्र्यात आहेत, तर काही जण नाराज असूनदेखील उघड बंडखोरी न करता पक्षात राहूनच ती निवडणुकीदरम्यान काय करायचे आहे हे ठरविले आहे. त्यामुळे उघड बंडखोरीचे ठीक, पण ही अंतर्गत बंडखोरी सर्वच पक्षांसाठी चांगलीच डोकेदुखीची ठरणार आहे. यावर सर्वच पक्षांनी वेळीच उपचार न केल्यास पक्षांचा आजार वाढण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी सर्वच प्रमुख राजकीय पक्षांचे उमेदवार निश्चित झाले आहे. राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना या तीन पक्षांचे मिळून महाविकास आघाडीचे सरकार आहे; पण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याचा सर्वच पक्षांनी सूर आळवला, त्यामुळे अद्यापही या निवडणुकीत युती किंवा आघाडी झाली नाही. त्यामुळे या निवडणुका स्वतंत्र लढल्या जाणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी न झाल्याने त्याचा फायदा नेमका कुणाला होणार, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. त्यामुळे ज्यांना ही महाविकास आघाडी नको होती ते मात्र मनातल्या मनात खुश होऊन जिल्हा परिषदेवर आपल्या पक्षाचा झेंडा रोवण्याचे स्वप्न रंगवीत आहे. त्यातच जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपंचायत समिती निवडणुकीसाठी तिकीट वाटपांवरून चांगलीच खदखद आहे. पक्षाने ज्यांना मागील दोन-तीन वर्षांपासून या निवडणुकांमध्ये तुमचा नक्कीच विचार करू, असे आश्वासन दिले होते. त्यांचा मात्र तिकीट वाटताना साधा विचारही झाला नाही. अनेक नवख्या आणि चर्चेत नसलेल्या उमेदवारांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे इच्छुकांचा हिरमोड झाला आहे. काहींनी ते उघडपणे बोलून दाखविले. काहींनी या विरोधात उघडपणे बंड न करता पक्षात राहूनच निवडणुकीत पक्षाला कसे नुकसान पाेहोचवायचे हे ठरविले आहे. त्यामुळे ही बाब सर्वच पक्षांसाठी घातक ठरणार असून निवडणुकीचे समीकरण बिघडविणारी आहे. पक्षांचे वरिष्ठ नेते असंतुष्टांना संतुष्ट करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे त्यांची ही ‘समझोता एक्स्प्रेस’ कितपत यशस्वी होते हे महत्त्वपूर्ण ठरणार आहे. ‘चावी कुणाला भरणार, की काटे फिरविणार’ n जिल्हा परिषद निवडणुकीत सर्वच प्रमुख राजकीय पक्षांसह गोंदिया विधानसभेच्या स्थानिक आमदारांच्या चावी संघटनेने सर्वच जागा लढविण्याची तयारी केली आहे. यासाठी त्यांनी दोन दिवसांपूर्वीच उमेदवारांची यादी जाहीर केली. त्यामुळे गोंदिया तालुक्यातील विजयाचे समीकरण बदलणार आहे. ‘चावी कुणाला भरणार, की काटे फिरविणार’ याची सध्या मतदारांमध्ये चर्चा आहे. 

‘हम से का भूल हुयी, जो ये सजा हमका मिली...’ - पक्षाने आजवर केवळ ज्यांना आश्वासन दिले, पण तिकीट वाटप करताना त्यांना विचारातही घेतले नाही. अशांची संख्या सर्वच पक्षात डझनावर आहे. त्यांना उमेदवारी न मिळाल्याने ते पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना ‘हम से क्या भूल हुयी जो ये सजा हमका मिली’ असे विचारत आहेत. नेतेमंडळी यालाच राजकारण म्हणत असल्याचे सांगत त्यांची समजूत काढत आहेत. 

आज हाेणार जम्बो अर्ज दाखल - जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी आतापर्यंत १६४ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत, तर सोमवारी (दि.६) या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे सोमवारी चारशेवर उमेदवारी अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे. निवडणूक यंत्रणेवरील ऑनलाइन ताण वाढण्याची शक्यता आहे.

 

टॅग्स :ZP Electionजिल्हा परिषद