शहरं
Join us  
Trending Stories
1
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
2
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
3
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
4
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
5
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
6
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
7
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
8
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
9
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
10
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
11
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
12
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
13
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?
14
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
15
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
16
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
17
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
18
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
19
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
20
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?

रेतीमाफियांकडून रेतीचा अवैध उपसा सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2019 06:00 IST

जिल्ह्यात छोटे मोठे असे एकूण ६२ रेती घाट असून दरवर्षी जिल्हा खनिकर्म विभागातर्फे या रेती घाटांचा लिलाव केला जातो. मागील वर्षीपासून रेतीघाटाच्या लिलावातून मिळणाऱ्या महसुलात वाढ झाली आहे.६२ रेतीघाटांपैकी २५ रेती घाटांचा लिलाव केला जात असून त्यातून शासनाला १५ कोटी रुपयांचा महसूल मिळतो. रेती घाटांचा लिलाव करण्यापूर्वी मायनिंग विभागातर्फे त्याचे सर्वेक्षण केले जाते.

ठळक मुद्देशासनाचा महसूल पाण्यात : महसूल यंत्रणेचे दुर्लक्ष, सर्वेक्षणानंतर लिलाव

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात २५ हून अधिक रेती घाटांचा लिलाव अद्यापही झाला नाही. मात्र दुसरीकडे रेती माफियांकडून रेती घाट पोखरुन मोठ्या प्रमाणात तस्करी केली जात आहे.त्यामुळे शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडत असून पोखरलेल्या रेती घाटांच्या लिलावासाठी तयार कोण होणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. वृत्तपत्रात बातम्या प्रकाशित होताच कारवाई केली जात असून पुन्हा मात्र जैसे थे परिस्थिती निर्माण होत असल्याचे चित्र आहे.जिल्ह्यात छोटे मोठे असे एकूण ६२ रेती घाट असून दरवर्षी जिल्हा खनिकर्म विभागातर्फे या रेती घाटांचा लिलाव केला जातो. मागील वर्षीपासून रेतीघाटाच्या लिलावातून मिळणाऱ्या महसुलात वाढ झाली आहे.६२ रेतीघाटांपैकी २५ रेती घाटांचा लिलाव केला जात असून त्यातून शासनाला १५ कोटी रुपयांचा महसूल मिळतो. रेती घाटांचा लिलाव करण्यापूर्वी मायनिंग विभागातर्फे त्याचे सर्वेक्षण केले जाते.जिल्ह्यातील रेती घाटांचा लिलाव करण्यासाठी जिल्हा खनिकर्म विभागाने नागपूर मायनिंग विभागाला सर्व्हेक्षण करण्यासाठी पत्र दिले. पुढील आठवड्यात रेती घाटांचे सर्वेक्षण करण्यात येणार असून त्यानंतरच लिलावाची प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याचे जिल्हा खनिकर्म विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र रेती घाटांचा लिलाव करण्यास विलंब होत असल्याने रेती माफीयांचे चांगलेच फावले आहे.तिरोडा, सडक अर्जुनी, आमगाव आणि गोंदिया तालुक्यातील रेतीघाटांवरुन दररोज शेकडो ट्रॅक्टर रेतीची मध्यरात्रीच्या सुमारास तस्करी केली जात आहे. यामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे. रेतीघाटांचा लिलाव होण्यापूर्वी रेतीमाफीयांकडून रेतीघाट पोखरले जात असल्याने हे पोखरलेले रेतीघाट घेण्यास तयार कोण होणार असा सुध्दा प्रश्न उपस्थित केला जात आहे.प्रत्येक तालुकास्तरावर पथकेरेतीघाटावरुन रेती तस्करीला आळा घालण्यासाठी प्रत्येक तालुक्यात उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांच्या नेतृत्त्वात भरारी पथके तयार करण्यात आली आहे. रेतीघाटावर लक्ष ठेवण्याची जवाबदारी ही पूर्णपणे तहसीलदारांची असल्याचे खनिकर्म विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.कर्मचाऱ्यांचा अभावजिल्ह्यातील रेतीघाटावरुन होत असलेल्या रेती तस्करीला आळा घालण्यासाठी प्रत्येक तालुक्यात आणि रेतीघाट असलेल्या परिसरात तपासणी नाके स्थापन करण्यात येणार होते. तश्या सूचना देखील जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या होत्या. मात्र त्यासाठी लागणारे मनुष्यबळ खनिकर्म विभागाकडे उपलब्ध नसल्याने तपासणी नाके स्थापन करण्याचे काम प्रलबिंत असल्याची माहिती आहे.रेती तस्करांना पाठबळ कुणाचेजिल्ह्यात दररोज कुठल्या ना कुठल्या अवैध रेतीची वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. तसेच यासाठी दंड देखील आकारला जात आहे. मात्र यानंतरही रेतीची तस्करी सुरू आहे.त्यामुळे रेती तस्करांना नेमके कुणाचे पाठबळ मिळत आहे. राजकीय दबावामुळे महसूल विभागाचे अधिकारी,कर्मचारी याकडे कानाडोळा करीत आहे का अशी शंका उपस्थित केली जात आहे.

टॅग्स :sandवाळू