शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
4
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
5
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
6
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
7
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
8
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
9
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
10
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
11
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
12
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
13
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
14
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
15
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
16
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
17
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
18
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
19
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
20
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!

रेतीमाफियांकडून रेतीचा अवैध उपसा सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2019 06:00 IST

जिल्ह्यात छोटे मोठे असे एकूण ६२ रेती घाट असून दरवर्षी जिल्हा खनिकर्म विभागातर्फे या रेती घाटांचा लिलाव केला जातो. मागील वर्षीपासून रेतीघाटाच्या लिलावातून मिळणाऱ्या महसुलात वाढ झाली आहे.६२ रेतीघाटांपैकी २५ रेती घाटांचा लिलाव केला जात असून त्यातून शासनाला १५ कोटी रुपयांचा महसूल मिळतो. रेती घाटांचा लिलाव करण्यापूर्वी मायनिंग विभागातर्फे त्याचे सर्वेक्षण केले जाते.

ठळक मुद्देशासनाचा महसूल पाण्यात : महसूल यंत्रणेचे दुर्लक्ष, सर्वेक्षणानंतर लिलाव

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात २५ हून अधिक रेती घाटांचा लिलाव अद्यापही झाला नाही. मात्र दुसरीकडे रेती माफियांकडून रेती घाट पोखरुन मोठ्या प्रमाणात तस्करी केली जात आहे.त्यामुळे शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडत असून पोखरलेल्या रेती घाटांच्या लिलावासाठी तयार कोण होणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. वृत्तपत्रात बातम्या प्रकाशित होताच कारवाई केली जात असून पुन्हा मात्र जैसे थे परिस्थिती निर्माण होत असल्याचे चित्र आहे.जिल्ह्यात छोटे मोठे असे एकूण ६२ रेती घाट असून दरवर्षी जिल्हा खनिकर्म विभागातर्फे या रेती घाटांचा लिलाव केला जातो. मागील वर्षीपासून रेतीघाटाच्या लिलावातून मिळणाऱ्या महसुलात वाढ झाली आहे.६२ रेतीघाटांपैकी २५ रेती घाटांचा लिलाव केला जात असून त्यातून शासनाला १५ कोटी रुपयांचा महसूल मिळतो. रेती घाटांचा लिलाव करण्यापूर्वी मायनिंग विभागातर्फे त्याचे सर्वेक्षण केले जाते.जिल्ह्यातील रेती घाटांचा लिलाव करण्यासाठी जिल्हा खनिकर्म विभागाने नागपूर मायनिंग विभागाला सर्व्हेक्षण करण्यासाठी पत्र दिले. पुढील आठवड्यात रेती घाटांचे सर्वेक्षण करण्यात येणार असून त्यानंतरच लिलावाची प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याचे जिल्हा खनिकर्म विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र रेती घाटांचा लिलाव करण्यास विलंब होत असल्याने रेती माफीयांचे चांगलेच फावले आहे.तिरोडा, सडक अर्जुनी, आमगाव आणि गोंदिया तालुक्यातील रेतीघाटांवरुन दररोज शेकडो ट्रॅक्टर रेतीची मध्यरात्रीच्या सुमारास तस्करी केली जात आहे. यामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे. रेतीघाटांचा लिलाव होण्यापूर्वी रेतीमाफीयांकडून रेतीघाट पोखरले जात असल्याने हे पोखरलेले रेतीघाट घेण्यास तयार कोण होणार असा सुध्दा प्रश्न उपस्थित केला जात आहे.प्रत्येक तालुकास्तरावर पथकेरेतीघाटावरुन रेती तस्करीला आळा घालण्यासाठी प्रत्येक तालुक्यात उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांच्या नेतृत्त्वात भरारी पथके तयार करण्यात आली आहे. रेतीघाटावर लक्ष ठेवण्याची जवाबदारी ही पूर्णपणे तहसीलदारांची असल्याचे खनिकर्म विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.कर्मचाऱ्यांचा अभावजिल्ह्यातील रेतीघाटावरुन होत असलेल्या रेती तस्करीला आळा घालण्यासाठी प्रत्येक तालुक्यात आणि रेतीघाट असलेल्या परिसरात तपासणी नाके स्थापन करण्यात येणार होते. तश्या सूचना देखील जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या होत्या. मात्र त्यासाठी लागणारे मनुष्यबळ खनिकर्म विभागाकडे उपलब्ध नसल्याने तपासणी नाके स्थापन करण्याचे काम प्रलबिंत असल्याची माहिती आहे.रेती तस्करांना पाठबळ कुणाचेजिल्ह्यात दररोज कुठल्या ना कुठल्या अवैध रेतीची वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. तसेच यासाठी दंड देखील आकारला जात आहे. मात्र यानंतरही रेतीची तस्करी सुरू आहे.त्यामुळे रेती तस्करांना नेमके कुणाचे पाठबळ मिळत आहे. राजकीय दबावामुळे महसूल विभागाचे अधिकारी,कर्मचारी याकडे कानाडोळा करीत आहे का अशी शंका उपस्थित केली जात आहे.

टॅग्स :sandवाळू