शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

पलटू पहाडीवर गिट्टीचे अवैध खनन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2018 00:35 IST

येथील पलटू पहाडीवर मागील काही महिन्यांपासून गिट्टीचे अवैधपणे खनन सुरु आहे. महसूल व वनविभागाच्या अधिकाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष असल्याने लाखो रुपयांची वनसंपदा नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. सदर पहाडीवर मोठ्या वृक्षांचे जंगल आहे.

ठळक मुद्देगावकऱ्यांची कारवाईची मागणी : परवाना एका जागेचा, खनन दुसऱ्या जागेतून

लोकमत न्यूज नेटवर्कनवेगावबांध : येथील पलटू पहाडीवर मागील काही महिन्यांपासून गिट्टीचे अवैधपणे खनन सुरु आहे. महसूल व वनविभागाच्या अधिकाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष असल्याने लाखो रुपयांची वनसंपदा नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. सदर पहाडीवर मोठ्या वृक्षांचे जंगल आहे. त्यामुळे वृक्षसंपदा ही नष्ट होत असल्याची बाब उघडकीस आली आहे. वनाचे संवर्धन आणि अवैध खनन थांबविण्यासाठी स्थानिक गावकऱ्यांनी याबाबत तक्रार केली. मात्र संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी अवैध खनन करणाऱ्यांवर कारवाई करण्याऐवजी गावकºयांनाच आपसांत समझोता करण्याचा सल्ला दिल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे.एका गट क्रमांकाचा परवाना घेवून दुसऱ्या गट क्रमांकातून अवैध खनन करण्याचा येथे गोरखधंदा सुरु असल्याची बाब देखील पुढे आली आहे. संबंधित कंत्राटदारावर कारवाई करुन अवैध खनन थांबविण्याची मागणी नवेगावबांध येथील नागरिकांनी केली आहे.येथील पलटू पहाडीवरील गट क्र. १२२३ मधून गिट्टी खनन करण्याचा परवाना कंंत्राटदाराने घेतला. परंतु त्यांनी गट क्रमांक १२२३ मधून गिट्टी (बोल्डर) खनन न करता गट क्र. १२६२/१ या शासकीय जागेतून आराजी १५५.७६ हेक्टर आर पैकी १ हेक्टर मधून अवैधरित्या खनन केले आहे. हा प्रकार मागील काही महिन्यांपासून सुरु आहे. सदर प्र्रकार गावकऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी महसूल विभागाचे प्रभारी तहसीलदार भंडारी यांना तक्रार केली. त्यांनी ३१ जानेवारी रोजी प्रत्यक्ष घटनास्थळावर भेट दिली व सदर अवैध खनन प्रकाराची पाहणी केली. यावेळी सरपंच अनिरुद्ध शहारे, संयुक्त वनव्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रामदास बोरकर, सतिश कोसरकर, बाबुराव नेवारे, प्रकाश तरोणे, अहमद सय्यद, वरक्षक भोयर उपस्थित होते. या सर्वांच्या उपस्थितीत पंचनामा करण्यात आला.कंत्राटदाराला १२२३ गट क्रमांकाचा गिट्टी खननाचा परवाना असून लगतच्या १२६२/१ या गट क्रमांकात अवैध खनन केल्याची बाब निदर्शनास आली. पंचनाम्यात २० ब्रास गिट्टी असल्याचे निदर्शनास आले. मात्र कंत्राटदारावर कारवाई करण्याचे सोडून गावपातळीवर समझोता करण्याचा सल्ला अधिकाऱ्यांनी दिल्याचा आरोप आहे. तहसीलदार हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे.वनसंपदा नष्ट होण्याच्या मार्गावरगट क्रमांक १२६२/१ हे मोठ्या वृक्षांचे जंगल आहे. यावर गावकऱ्यांचा निस्तार हक्क आहे. या अवैध खननाबरोबरच मोठ्या वृक्षांचे नुकसान होत असल्याने मौल्यवान वनसंपदा नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. काही वृक्षांच्या मुळांना खननादरम्यान धक्का बसून त्यांचे नुकसान होत आहे. यामुळे या भागातील वृक्ष देखील समूळ वाळत आहे. यावर वन विभागाची देखरेख असते. याबाबत उत्तर वनविभागाचे वनरक्षक भोयर यांना विचारणा केली असता त्यांनी काही माहिती नसल्याचे सांगितले. गावच्या नैसर्गिक संपत्तीची लूट होत असल्याने गावकऱ्यांमध्ये रोष व्याप्त आहे.