शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

शाळेत मोबाईल वापरला तर मिळेल टीसी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2018 00:29 IST

अलीकडे विद्यार्थ्यांमध्ये मोबाईलचा वापर करण्याचे प्रमाण वाढले आहे. मात्र बरेच विद्यार्थी मोबाईलचा योग्य वापर करण्याऐवजी त्याचा दुरूपयोगच अधिक करीत आहे. यामुळे काही अप्रिय घटना सुद्धा घडल्या आहेत.

ठळक मुद्देतीनदा हजेरी : जि.प. सदस्याने दिले शाळेला पत्र

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : अलीकडे विद्यार्थ्यांमध्ये मोबाईलचा वापर करण्याचे प्रमाण वाढले आहे. मात्र बरेच विद्यार्थी मोबाईलचा योग्य वापर करण्याऐवजी त्याचा दुरूपयोगच अधिक करीत आहे. यामुळे काही अप्रिय घटना सुद्धा घडल्या आहेत. अशा घटनांना पायबंद लावण्यासाठी शाळेत मोबाईल आणण्यास आणि त्याचा वापर करण्यास जिल्हा परिषद सदस्य रजनी कुंभरे यांनी बंदी घातली आहे. तसेच या नियमाचे उल्लघंन करणाºया विद्यार्थ्याला थेट हातात टिसी (शाळा सोडण्याचे प्रमाणपत्र) देण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहे.आठवडाभरापूर्वी तिरोडा तालुक्यातील सुकडी-डाकराम येथील दोन शालेय विद्यार्थ्यांनी विष प्राशन करुन आत्महत्या केली होती. या घटनेनंतर शाळेत विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेवर प्रश्न चिन्ह निर्माण झाले होते. सुकडी-डाकराम येथील पालक व गावकऱ्यांनी या घटनेला शिक्षकांना जबाबदार धरुन त्यांच्यावर संताप व्यक्त केला होता. विद्यार्थी शाळेत उपस्थित आहे किंवा नाही याची देखील माहिती शिक्षकांना नसल्याचे सांगत आमचे पाल्य सुरक्षित नसल्याचा आरोप केला होता. यासर्व बाबींची दखल घेत जि.प.सदस्य रंजनी कुंभरे यांनी शाळेला भेट देऊन पालकांनी उपस्थित केलेले मुद्दे योग्य असल्याचे सांगत शिक्षकांना धारेवर धरले. तसेच यापुढे शाळेत मोबाईलचा वापर करण्यास विद्यार्थ्यांना पूर्णपणे बंदी घालण्याचे निर्देश दिले.या नियमांचे उल्लघंन करणाºयास आधी तंबी व ५०० रुपयांचा दंड आकारण्यास सांगितले. यानंतरही मोबाईलचा वापर करणाºया विद्यार्थ्यांना थेट टीसी देण्याचे निर्देश दिले. शालेय वेळेत विद्यार्थी शाळेत उपस्थित आहेत अथवा नाही याची खात्री करण्यासाठी सकाळी, दुपारी आणि शाळा सुटण्याच्या वेळेत हजेरी घेण्यात यावी. जे विद्यार्थी शाळेत आले नाहीत त्यांची माहिती विद्यार्थ्यांच्या पालकांना त्वरीत द्यावी, शालेय वेळेत विद्यार्थी बाहेर भटकू नयेत यासाठी शाळेच्या मुख्य प्रवेशद्वाराला कुलूप लावून ठेवा, मध्यान्ह सुट्टीत विद्यार्थ्यांनी घरी जाण्याऐवजी त्यांनी शाळेतच टिफीन आणावे, प्रत्येक वर्गातील विद्यार्थ्यांवर नजर ठेवण्याची जबाबदारी त्या-त्या वर्गातील वर्गप्रमुख विद्यार्थ्याला द्यावी, एखाद्या विद्यार्थ्याचे वर्तन योग्य नसल्यास त्याची सूचना त्वरीत त्यांच्या पालकांना द्यावी. आदी उपाययोजनाची त्वरीत अंमलबजावणी करण्याचे निर्देश शाळेच्या मुख्याध्यापक व शिक्षकांना दिले आहे. या उपाय योजना हळूहळू जि.प.च्या सर्वच शाळेत केल्या जाणार असल्याची माहिती आहे.दर आठवड्याला होणार पालकसभाशिक्षक आणि पालक यांच्यात समन्वय राहावे. तसेच पाल्यांसंबंधी काही सूचना असल्यास त्याची माहिती पालकांना देता यावी. यासाठी दर आठवड्याला प्रत्येक वर्गातील विद्यार्थ्यांची पालकसभा घेण्यात येणार आहे.सूचनांकडे दुर्लक्ष करणाºया शिक्षकांवर कारवाईविद्यार्थ्यांसंबंधी दिलेल्या सूचनांची अंमलबजावणी न करणाऱ्या मुख्याध्यापक आणि शिक्षकांवर सुद्धा बदलीची कारवाई केली जाणार आहे. यासंबंधीचे लेखी पत्र सुकडी येथील शाळेला दिले असल्याचे जि.प.सदस्य कुंभरे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.