कोरोटेंचा इशारा : क्रातिसूर्य बिरसा मुंडा पुतळ्याचे अनावरणदेवरी : आजच्या परिस्थितीत आपल्या जिल्ह्यातील आदिवासी व गैर आदिवासी धान उत्पादक शेतकऱ्यांवर फार मोठा दुष्काळ पडलेला असून या राज्यातील सरकार आम्हा शेतकऱ्यांना फक्त खोटी आश्वासने देऊन आमची उपेक्षा करीत आहे. याकरिता संघठीत होऊन सरकारविरुद्ध रस्त्यावर उतरुन आंदोलन करण्यास तयार व्हा, असे प्रतिपादन गोंदिया जिल्ह्याचे काँग्रेस कमिटी महासचिव सहषराम कोरोटे यांनी केले. ते देवरी तालुक्यातील मुरपार येथील क्रांतीसूर्य भगवान बिरसामुंडा यांच्या पुतळ्याचे अनावरण प्रसंगी अध्यक्षीय भाषणातून बोलत होते.या पुतळ्याचे अनावरण माजी आमदार रामरतन राऊत यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी देवरी पंचायत समिती उपसभापती संगीता भेलावे, माजी समाजकल्याण सभापती जशोदा आचले, माजी जिल्हा परिषद सदस्य मीना राऊत, मुरपारचे सरपंच सुनिता मरकाम, पुराडाचे सरपंच सुग्रता भोयर, गांधीटोलाचे उपसरपंच भुमेश्वरी मेंढे, मुरपारचे उपसरपंच नारायण लांजेवार, फुक्कीमेटाचे सामाजिक कार्यकर्ता नंदकिशोर बारसे, बळीराम कोटवार, पुराडाचे तंमुस अध्यक्ष माणिक आचले, माजी सरपंच धनपत भोयर, आकेश उईके, नरेश राऊत, कृष्णकुमार आचले, राजेश आचले, ललीता यटरे, हेमप्रकाश आचले, बुधराम भंडारी, ग्रामविस्तार अधिकारी किशोर आचले, शिवलाल पुराम, रामेश्वर कुंभलकर आणि बिरसामुंडा स्मारक समिती अध्यक्ष धनंजय आचले, उपाध्यक्ष छन्नु सलाम, सचिव भाऊलाल कुंभलकर, सहसचिव सुरेंद्र मळकाम, कोषाध्यक्ष किशोर सोरसाम व सहकोषाध्यक्ष जैपाल प्रधान आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक धनंजय आचले यांनी मांडले. संचालन भुमेश कुंभलकर यांनी केले. आभार जागेश्वर फरदे यांनी मानले. (प्रतिनिधी)
- तर दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांसाठी आंदोलन करणार
By admin | Updated: February 5, 2016 01:22 IST