शहरं
Join us  
Trending Stories
1
'संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना NDRF निधीतून भरीव मदत द्या'; CM फडणवीसांची अमित शाहांकडे मागणी
2
इस्रायलची राजधानी तेलअवीव येथे कारमध्ये मोठा स्फोट, अनेक जण जखमी झाल्याची शक्यता
3
संकट अद्याप टळलेले नाही, पुढील २ दिवस पाऊस वाढण्याचा अंदाज; विदर्भ, मराठवाड्यात काय होणार?
4
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
5
Saim Ayub : आफ्रिदीच्या जावयाला टक्कर देण्याच्या नादात फजिती; सर्वाधिक वेळा पदरी पडला भोपळा!
6
कोथरूड मारहाण प्रकरणात निलेश घायवळही आरोपी; दहशत वाढवण्यासाठी दिली होती पिस्तुल
7
Suryakumar Yadav Hearing On PCB Complaint : सूर्याला फक्त वॉर्निंग की... फायनल आधी होणार फैसला!
8
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
9
कपड्यांवरून ट्रोलिंगबाबत अखेर अमृता फडणवीस यांनी सोडलं मौन, म्हणाल्या- "ज्या महिलेकडे..."
10
झुबिन गर्गच्या मृत्यू प्रकरणात नवं वळण; संगीतकार ज्योती गोस्वामीला अटक, अनेकांची चौकशी सुरु
11
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
12
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
13
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
14
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
15
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
16
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
17
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
18
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक
19
Pranjal Khewalkar: रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर
20
कोण आहे Jolly LLB 2 मधील इक्बाल कादरी? पाकिस्तानी समजून नाकारले गेले चित्रपट, ओळख पटवण्यासाठी मागितला व्हिसा

रानभाजी व फुलांची जैवविविधता जोपासणाºया मंदा ठरल्या आदर्श

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2017 22:11 IST

खैरी-सुकळी येथे वास्तव्य करणाºया मंदा केशव गावडकर यांनी रानभाजी व रानफुलांची जैवविविधता जोपासून उंच भरारी घेतली आहे.

ठळक मुद्देशेतीला साथ : नोव्हेंबरमध्ये दिल्ली येथे होणार सत्कार

लोकमत न्यूज नेटवर्कबाराभाटी : खैरी-सुकळी येथे वास्तव्य करणाºया मंदा केशव गावडकर यांनी रानभाजी व रानफुलांची जैवविविधता जोपासून उंच भरारी घेतली आहे. त्या गरीब कुटुंबातील असूनही शेती व्यवसायाकडे त्यांचे सर्वाधिक लक्ष आहे. रानभाजी, रानफुलांच्या लागवडीतून आदर्श महिला शेतकरी अशी त्यांची आता त्यांची ओळख निर्माण झाली आहे.त्यांचे मूळ गाव खैरी येथे असून जवळचे कुंभीटोला गाव त्यांचे माहेर आहे. लहानपणापासून शेतीकडे त्यांचा कल होता. त्यांनी पाच वर्षांपासून आपल्या ७५ डिस्मिल शेतीमध्ये १२ पध्दतीच्या मुलकी धानाची लागवड केली. यामध्ये के-१, डी-१, टी-१, एल-१, के-२, बी-१, पी-२, के-३, वाय-१, डी-२, के-४, एच-१ अशा धानाची ९०, १३०, १५० व १६५ दिवसांत पिकांची लागवड केली आहे. याआधी लुचई, ढऊर, लुळका अशा गावरान धानाची रोवणी केली. या धानाला स्वत: तयार केलेली जैविक खत व औषधी दिली.मंदाबाई यांना अनेक प्रकल्पांचे सहकार्य लाभत आहे. राजीव गांधी विज्ञान तंत्रज्ञान आयोग जनूकोष कार्यक्रमाचेही मार्गदर्शन लाभत आहे. यामधून प्रात्यक्षिक शेती, मुलकी धान बी-बियाणे शुद्धीकरण व संशोधन केले आहे. तसेच १०८ गुणधर्म तपासणे व चार प्रकारच्या नवीन बियाणांचा त्यांनी शोध केला आहे. मंदा गावडकर यांची विदर्भातून एकमेव उत्कृष्ट महिला शेतकरी म्हणून निवड झाली असून जैविक कृषी विश्वकुंभ दिल्ली येथे नोव्हेंबर महिन्यात सत्कार होणार आहे. त्यांना सुशीला स्वयं सहाय्यता महिला गट खैरी यांच्या सहकार्याने ही गरुड भरारी घेतली आहे. त्यांना टेमकला राऊत, देवेंद्र राऊत, चेतना राऊत, लिला राऊत, कल्पना राऊत, रत्नमाला राऊत, यमुना अलोणे, कृषी सखी अनिता औरासे, लालदास औरासे यांचे सहकार्य लाभले.रानभाजी : कड्डू, तरोटा, लेंगळा, वराकल्या, शेरडिरे, शिलारी, काटेभाजी, कुडवा, माढ, अंबाळी, उंदीरकाण, शेंगा, कोलारी, खापरखटी, पातूर, कोचई, मशाल, कर्मू अशा रानभाज्यांचे संकलन करुन नागरिकांना माहिती देतात व प्रशिक्षण देतात.रानफुले : हेटी, बाहवा, पिंकफर, तुटूंब, डोजबी, कुरमुळी, कमळकांदा, फुल्या, कांदा अशा नैसर्गिक फळाफुलांचे संकलन करुन त्याबाबतच्या माहितीचा त्या प्रसार-प्रचार करतात.त्यांचे ध्येय : जैवविविधता टिकविणे, विषमुक्त अन्न तयार करणे, जैविक खत व औषधी तयार करणे, नैसर्गिक संपत्ती जोपासणे, नव्या पिढीला शेतीकडे वळवून तयार करणे व प्रशिक्षण देणे.