शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
4
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
5
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
6
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
7
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
8
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
9
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
10
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
11
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
12
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
13
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
14
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
15
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
16
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
17
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
18
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
19
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

रानभाजी व फुलांची जैवविविधता जोपासणाºया मंदा ठरल्या आदर्श

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2017 22:11 IST

खैरी-सुकळी येथे वास्तव्य करणाºया मंदा केशव गावडकर यांनी रानभाजी व रानफुलांची जैवविविधता जोपासून उंच भरारी घेतली आहे.

ठळक मुद्देशेतीला साथ : नोव्हेंबरमध्ये दिल्ली येथे होणार सत्कार

लोकमत न्यूज नेटवर्कबाराभाटी : खैरी-सुकळी येथे वास्तव्य करणाºया मंदा केशव गावडकर यांनी रानभाजी व रानफुलांची जैवविविधता जोपासून उंच भरारी घेतली आहे. त्या गरीब कुटुंबातील असूनही शेती व्यवसायाकडे त्यांचे सर्वाधिक लक्ष आहे. रानभाजी, रानफुलांच्या लागवडीतून आदर्श महिला शेतकरी अशी त्यांची आता त्यांची ओळख निर्माण झाली आहे.त्यांचे मूळ गाव खैरी येथे असून जवळचे कुंभीटोला गाव त्यांचे माहेर आहे. लहानपणापासून शेतीकडे त्यांचा कल होता. त्यांनी पाच वर्षांपासून आपल्या ७५ डिस्मिल शेतीमध्ये १२ पध्दतीच्या मुलकी धानाची लागवड केली. यामध्ये के-१, डी-१, टी-१, एल-१, के-२, बी-१, पी-२, के-३, वाय-१, डी-२, के-४, एच-१ अशा धानाची ९०, १३०, १५० व १६५ दिवसांत पिकांची लागवड केली आहे. याआधी लुचई, ढऊर, लुळका अशा गावरान धानाची रोवणी केली. या धानाला स्वत: तयार केलेली जैविक खत व औषधी दिली.मंदाबाई यांना अनेक प्रकल्पांचे सहकार्य लाभत आहे. राजीव गांधी विज्ञान तंत्रज्ञान आयोग जनूकोष कार्यक्रमाचेही मार्गदर्शन लाभत आहे. यामधून प्रात्यक्षिक शेती, मुलकी धान बी-बियाणे शुद्धीकरण व संशोधन केले आहे. तसेच १०८ गुणधर्म तपासणे व चार प्रकारच्या नवीन बियाणांचा त्यांनी शोध केला आहे. मंदा गावडकर यांची विदर्भातून एकमेव उत्कृष्ट महिला शेतकरी म्हणून निवड झाली असून जैविक कृषी विश्वकुंभ दिल्ली येथे नोव्हेंबर महिन्यात सत्कार होणार आहे. त्यांना सुशीला स्वयं सहाय्यता महिला गट खैरी यांच्या सहकार्याने ही गरुड भरारी घेतली आहे. त्यांना टेमकला राऊत, देवेंद्र राऊत, चेतना राऊत, लिला राऊत, कल्पना राऊत, रत्नमाला राऊत, यमुना अलोणे, कृषी सखी अनिता औरासे, लालदास औरासे यांचे सहकार्य लाभले.रानभाजी : कड्डू, तरोटा, लेंगळा, वराकल्या, शेरडिरे, शिलारी, काटेभाजी, कुडवा, माढ, अंबाळी, उंदीरकाण, शेंगा, कोलारी, खापरखटी, पातूर, कोचई, मशाल, कर्मू अशा रानभाज्यांचे संकलन करुन नागरिकांना माहिती देतात व प्रशिक्षण देतात.रानफुले : हेटी, बाहवा, पिंकफर, तुटूंब, डोजबी, कुरमुळी, कमळकांदा, फुल्या, कांदा अशा नैसर्गिक फळाफुलांचे संकलन करुन त्याबाबतच्या माहितीचा त्या प्रसार-प्रचार करतात.त्यांचे ध्येय : जैवविविधता टिकविणे, विषमुक्त अन्न तयार करणे, जैविक खत व औषधी तयार करणे, नैसर्गिक संपत्ती जोपासणे, नव्या पिढीला शेतीकडे वळवून तयार करणे व प्रशिक्षण देणे.