शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

लवकरच मी राज्य मंत्रिमंडळात

By admin | Updated: January 2, 2016 08:35 IST

गेल्या २५ वर्षांपासून येथील प्राथमिक शाळेला अनुदान मिळाले नाही. हा प्रश्न अनेक वर्षांपासून ऐरणीवर आहे.

अर्जुनी मोरगाव : गेल्या २५ वर्षांपासून येथील प्राथमिक शाळेला अनुदान मिळाले नाही. हा प्रश्न अनेक वर्षांपासून ऐरणीवर आहे. मी लवकरच महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात परतणार आहे. तेव्हा ही समस्या सोडवेन, असे वक्तव्य खासदार नाना पटोले यांनी करून उपस्थितांना आश्चर्याचा धक्का दिला. येथील सरस्वती विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय तसेच जी.एम.बी. हायस्कुल व विज्ञान उच्च माध्यमिक विद्यालयातर्फे आयोजित वार्षिकोत्सव कार्यक्रमात उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष डॉ.बल्लभदास भुतडा तर प्रमुख पाहुणे म्हणून साकोलीचे आ.बाळा काशीवार, नागपूरच्या लेखिका शुभांगी भडभडे, साहित्यिक व लेखिका ज्योती पुजारी, प्रमोद लांजेवार, सुरेश भय्या, हरिदास गहाणे, पर्यवेक्षिका विणा नानोटी, लिना मिसार व सरिता शुक्ला आदी मंचावर उपस्थित होते.वर्तमान शिक्षण पद्धतीत बदल होत आहेत. सध्या कौशल्य विकास शिक्षण येत आहे. हे शिक्षण प्रत्येक शाळेत दिले जाणार आहे. यासाठी जिल्हास्तरावर बैठक आयोजित केली जाणार आहे. कौशल्य विकास शिक्षणाच्या माध्यमातून शिक्षित युवापिढीला रोजगाराची संधी उपलब्ध होईल, असे खा.पटोले म्हणाले. संविधानात मोफत शिक्षणाचा कायदा आहे. मात्र शिक्षणाचा बाजार व व्यापारीकरणामुळे सर्वसामान्यांना दर्जेदार शिक्षणापासून वंचित राहावे लागते. शिक्षणात सुसूत्रीकरण, एकवाक्यता व समानता आणण्यासाठी विद्धत्तेवर आधारीत शिक्षणपद्धी असली पाहिजे. आ.काशिवार म्हणाले, विचारांनी मैत्रीचे नाते तयार होते. जीवनात मस्ती जरुर केली पाहिजे. मात्र स्वत:चे ध्येय ठरवावे लागते. जगाचा संरक्षणकर्ता युवक आहे. युवाशक्तीच आधारस्तंभ आहे. युवाशक्तीत प्रचंड ऊर्जा आहे. मात्र त्यांनी आपली बलस्थाने ओळखली पाहिजेत. शिक्षणाचे माणूस कितीही मोठा झाला असला तरी सुसंस्कृतपणा हवाच. संस्काराच्या उणिवेमुळे गुन्हेगारी प्रवृत्ती वाढली आहे. शिक्षक संघटना स्वत:च्या मागण्यांसाठी आंदोलन करतात, मात्र विकसित शैक्षणिक अजेंडासाठी आंदोलन का केली जात नाही याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली. शुभांगी भडभडे म्हणाल्या, शाळा म्हणजे संस्कार मुल्ये रुजविण्याचे केंद्र आहेत. प्रवृत्ती, विकृती व संस्कृती यातील भेद ओळखता आला पाहिजे. संस्कार घडविणे ही केवळ शाळेचीच जबाबदारी नसून ती पालकांचीही आहे. यावेळी अतिथींच्या हस्ते फ्रॅगरन्स, नवप्रभा व स्पेक्ट्रम या शालेय हस्तलिखिताचे विमोचन करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन छाया घाटे व शशीकांत लोणारे यांनी केले. प्रास्ताविक प्राचार्य अनिलकुमार मंत्री यांनी, शालेय प्रगतीचा अहवाल वाचन पर्यवेक्षीका वीणा नानोटी यांनी केले. छाया घाटे यांनी उपस्थितांचे आभार मानले. अतिथींचा परिचय इंद्रनिल काशीवार यांनी करुन दिला. (तालुका प्रतिनिधी)घर व शाळा हे संस्काराचे पीठ४संस्काराचे पहिले पीठ घर आहे तर शाळा हे दुसरे पीठ आहे. संस्क़ार घडविण्याचे हे दोन्ही मुख्य केंद्र आहेत. आई-बाबा हे प्रथम आदर्श असतात. जीवनात त्यांचे महात्म्य फार मोठे आहे. आपल्याला घडविण्यासाठी त्यांनी केलेल्या त्यागाचा आदर प्रत्येकाने केला पाहिजे. शिक्षक हा तिसरा गुरु आहे. त्यांचेशी निरपेक्षवृत्तीने वागले पाहिजे. याव्यतिरिक्त मित्र हा सुद्धा चांगला गुरु ठरू शकतो. त्यांच्या चांगल्या गुणांचा लाभ घेतला पाहिजे, असा सल्ला ज्योती पुजारी यांनी दिला.गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार४याप्रसंगी राष्ट्रीय विज्ञान प्रदर्शनीत सहभागी झालेला विद्यार्थी जयेश रुखमोडे, प्रभारी शिक्षक एस.डी. कुंभारे यांचा सत्कार करण्यात आला. याशिवाय अंकिता सोनवाने, नितीन तिरपुडे, जयेंद्र डोंगरवार, श्वेता बोरकर, रिना गभणे, प्राची पवार, सावी गाडेगोणे, पल्लवी ढोमणे, स्रेहा पाटणकर, गायत्री कापगते, मयंक बारापात्रे, गोविंद पनपालीया या गुणवंत विद्यार्थ्यांचा देखील सत्कार खा. नाना पटोले व आ. बाळा काशिवार यांच्या हस्ते करण्यात आला.